शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

काळबा गायकवाडसह पाचजणांच्या घरांवर सशस्त्र हल्ला; तीन जखमी-: परिसरात दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 01:17 IST

गेल्यावर्षी महाडिक माळ येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीतील गोळीबारात काळबा ऊर्फ विजय गायकवाड हा संशयित जखमी झाला होता. त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. गुरुवारी दुपारी टेंबलाई देवीची ‘कोहाळ पंचमी’ यात्रा होती. परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होती.

ठळक मुद्दे रेल्वे फाटक झोपडपट्टीत भरदिवसा प्रकार

कोल्हापूर : येथील टेंबलाई रेल्वे फाटक झोपडपट्टीमध्ये अज्ञात १५ ते १७ हल्लेखोरांनी हातात नंग्या तलवारी, काठ्या, दगड घेऊन काळबा गायकवाड याच्या घरासह एकूण पाच घरांवर सशस्त्र हल्ला केला. हल्ल्यात तिघेजण जखमी झाले. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुरुवारी दुपारी झालेल्या हल्ल्यानंतर झोपडपट्टीतील भीतीने गर्भगळीत झालेल्या महिलांनी सायंकाळी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या परिसरात ठाण मांडून हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली; पण रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

गेल्यावर्षी महाडिक माळ येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीतील गोळीबारात काळबा ऊर्फ विजय गायकवाड हा संशयित जखमी झाला होता. त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. गुरुवारी दुपारी टेंबलाई देवीची ‘कोहाळ पंचमी’ यात्रा होती. परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होती.

दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक सुमारे १५ ते १७ जण हातात नंग्या तलवारी, काठ्या, दगड घेऊन टेंबलाई रेल्वे फाटक झोपडपट्टीत शिरले. त्यांनी अनेक घरांवर दगडफेक केली. अरुंद गल्लीत घुसून अनेकांच्या दारावर तलवारीचे घाव घातल्याने दरवाज्यांची तोडफोड झाली. काही घरात घुसून साहित्यांची मोडतोड केली. त्यानंतर हे हल्लेखोर निघून गेले. सुमारे तासभरानंतर पुन्हा त्याच हल्लेखोरांनी पुन्हा सशस्त्र हल्ला केला.

यामध्ये सुनीता विजय पांढरे यांच्या किराणा माल दुकानातील साहित्य विस्कटले, तर काळबा ऊर्फ विजय गायकवाड यांच्या घरासह सोनाबाई वसंत कटके, वंदना महादेव कुरणे, नरेंद्र तमायचेकर यांच्या घरात घुसून प्रापंचिक साहित्यांची मोडतोड केली. सुमारे तासभर हा हल्लेखोरांचा धुमाकूळ सुरू होता. हल्लेखोरांनी प्रत्येकाच्या दारावर पुन्हा दगड टाकले, दारातील घागरी, सायकलींची मोडतोड केली. हल्लेखोरांनी परिसरात ब्रीजखाली असलेल्या मंडळाच्या बेंचचेही मोडतोड केली. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.हल्ल्यात जखमी हल्लेखोरांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात दादू कसबेकर (२८), अरुणा आखाडे (३४), शमा रियाज शेख (४८) हे तिघे जखमी झाले.

  • हल्लेखोरांच्या भीतीने काळबा गायकवाड यांच्या घरात त्याची मुलगी अश्विनीसह परिसरातील पाच-सहा मुली लपून बसल्या होत्या. हल्लेखोरांनी त्यांच्या घराच्या दारांवरही तलवारीचे घाव घातले. त्यावेळी अरुणा आखाडे या महिलेने धाडसाने पुढे येऊन हल्लेखोरांना विरोध केला; पण हल्लेखोरांनी त्यांनाही धक्काबुक्की केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे सशस्त्र हल्ला होऊनही पोलीस मात्र यात्रा बंदोबस्तात व्यस्त होते, फक्त दोनच पोलिसांनी परिसरात फेरफटका मारून निघून गेले.
  • पोलीस ठाण्याच्या आवारात महिलांचा ठाण

हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यानंतर तेथील भयभीत झालेल्या महिलांनी हल्लेखोरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात ठाण मांडला.कारण गुलदस्त्यात

  • हल्ला कोणी केला? कशासाठी केला? याबाबत या परिसरातील महिला संभ्रमावस्थेत होत्या. हल्ला करण्यामागचे ठोस कारणही सांगता येत नव्हते.

कोल्हापुरात रेल्वे फाटक उड्डाणपुलानजीक टेंबलाई झोपडपट्टीत अज्ञात हल्लेखोरांनी अनेक घरांवर सशस्त्र हल्ला केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी