शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

करवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 15:11 IST

देशात १२ ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळा, महापर्वकालांची नेहमी चर्चा होते. मात्र या महापर्वकालात करवीरातील विशालतीर्थ भोगावती नदी शिंगणापूरचा समावेश असून गुरूने वृश्चिक राशीत प्रवेश केल्यानंतर होणारा वृश्चिक महापर्वकाल १२ आॅक्टोबरपासून करवीरक्षेत्री होत आहे. पंचांगकर्त्यांनी यंदाच्या पंचांगात त्याचा समावेश करून त्यावर मोहोर उमटविली आहे. यंदा मात्र ‘नमामी पंचगंगा’ या संस्थेच्या वतीने महापर्वकालाचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकालदेशातील १२ पर्वकालामध्ये भोगावती नदीचा समावेश

इंदुमती गणेश

कोल्हापूर : देशात १२ ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळा, महापर्वकालांची नेहमी चर्चा होते. मात्र या महापर्वकालात करवीरातील विशालतीर्थ भोगावती नदी शिंगणापूरचा समावेश असून गुरूने वृश्चिक राशीत प्रवेश केल्यानंतर होणारा वृश्चिक महापर्वकाल १२ आॅक्टोबरपासून करवीरक्षेत्री होत आहे.

पंचांगकर्त्यांनी यंदाच्या पंचांगात त्याचा समावेश करून त्यावर मोहोर उमटविली आहे. यंदा मात्र ‘नमामी पंचगंगा’ या संस्थेच्या वतीने महापर्वकालाचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे.गुरूने विशिष्ट राशीत प्रवेश केल्यानंतर देशातील बारा ठिकाणी कुंभमेळा, महापर्वकाल सुरू होतो. गुरूचा प्रत्येक राशीत वर्षभर मुक्काम असल्याने हा कालावधी वर्षाचा असतो. गुरूने सिंह राशीत प्रवेश केला की नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा, कुंभ राशीत प्रवेश केला की हरिद्वारमध्ये कुंभमेळा, कन्या राशीत प्रवेश केला की नृसिंहवाडीत कन्यागत महापर्वकाल होतो.

या काळात स्थानिक नदीमध्ये गंगा नदीचे अवतरण होते. ती वर्षभर या नदीच्या सान्निध्यात राहते आणि भक्त तिच्या भेटीला येतात, अशी संकल्पना आहे. निसर्ग, नदी, पर्यावरण आणि मानवाला जोडणारी सांस्कृतिक साखळी म्हणून महापर्वकालाचे महत्त्व आहे.या महापर्वकालामध्ये करवीरातील भोगावती नदीचा समावेश असल्याने शंकराचार्यांसह धार्मिक बाबींचे ज्ञान असलेल्या व्यक्ती या कालावधीत तेथे जाऊन स्नान करतात. हीच भोगावती नदी पुढे येऊन पंचगंगेला मिळते. नदीची स्वच्छता आणि तिचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘नमामी पंचगंगा’ नावाची संस्था स्थापन करण्यात येत असून, त्या संस्थेच्या वतीने या महापर्वकालाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी देशातील सर्व पीठांचे शंकराचार्य, धर्मपीठांचे गुरू, आखाडे यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

दोन भागांत महापर्वकालधार्मिक ग्रंथ व यंदाच्या वर्षीच्या मराठी पंचांगांमध्ये नकाशासहित महापर्वकालात भोगावतीचे स्थान विशद करण्यात आले आहे. यंदा ११ आॅक्टोबरला सायंकाळी ७ वाजून १९ मिनिटांनी गुरू वृश्चिक राशीत प्रवेश करीत आहे. तेव्हापासून शिंगणापूर येथे महापर्वकाल असतो. १२ आॅक्टोबरला येथील हटकेश्वराच्या मंगल स्नान महापर्वाची सुरुवात होईल. हा महापर्वकाल ११ आॅक्टोबर ते २९ मार्च २०१९ व २३ एप्रिल ते ५ नोव्हेंबर २०१९ या दोन कालावधींत होत आहे. 

देशातील १२ महापर्वकालांमध्ये करवीरातील भोगावती व पर्यायाने पंचगंगा नदीचा समावेश ही धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही खूूप मोठी गोष्ट आहे. अज्ञानामुळे आजवर येथे महापर्वकाल साजरा झाला नाही. यंदा मात्र त्याचे आयोजन करून नदीचे महत्त्व आणि तिची स्वच्छता यांबद्दल जागृती करण्याचा प्रयत्न करणार आहे.- उमाकांत राणिंगा ‘नमामी पंचगंगा’ उपक्रमाचे मार्गदर्शक 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHinduismहिंदुइझमReligious programmeधार्मिक कार्यक्रम