शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रस्ते खराब झाले, अधिकारी करतात काय?, स्थायी सभेत अधिकाऱ्यांना विचारला जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 18:13 IST

पावसामुळे शहरातील बहुसंख्य डांबरी रस्ते खराब झालेले आहेत. रस्त्यांची गुणवत्ता तपासली जात नसल्यामुळे एका वर्षातच रस्ते खराब होतात. महापालिकेचे अभियंता यांचे रस्त्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाले आहे. अधिकारी करतात तरी काय? अशी शब्दांत शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. शहरातील खराब रस्त्यांबाबत सदस्यांनी सभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती शारंगधर देशमुख होते.

ठळक मुद्देरस्ते खराब झाले, अधिकारी करतात काय?स्थायी सभेत अधिकाऱ्यांना विचारला जाब

कोल्हापूर : पावसामुळे शहरातील बहुसंख्य डांबरी रस्ते खराब झालेले आहेत. रस्त्यांची गुणवत्ता तपासली जात नसल्यामुळे एका वर्षातच रस्ते खराब होतात. महापालिकेचे अभियंता यांचे रस्त्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाले आहे. अधिकारी करतात तरी काय? अशी शब्दांत शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. शहरातील खराब रस्त्यांबाबत सदस्यांनी सभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती शारंगधर देशमुख होते.‘आयआरबी’ने केलेले रस्ते तसेच काही ठरावीक रस्ते चांगल्या दर्जाचे झाले आहेत. तर मग महापालिकेने केलेले रस्ते लवकर खराब का होतात, रस्त्यांचा दर्जा तपासण्याची जबाबदारी कोणाची आहे? असा सवाल सत्यजित कदम, सचिन पाटील यांनी उपस्थित केला. डांबराचे प्रमाण कमी वापरले जाते. रस्ते दोन वर्षेही टिकत नाहीत. ज्या रस्त्यांवर वाहतूक जास्त आहे, त्या ठिकाणी मुरमाऐवजी कॉँक्रीटीकरण करून खड्डे मुजविता येतात याची माहिती घ्यावी अथवा नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे पावसाळ्यात डांबरीकरणाद्वारे खड्डा भरून घ्या, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.शहरात भटक्या गाई, कुत्री व घोड्यांची संख्या वाढलेली असून वॉर्डनिहाय नियोजन करून कारवाईची मोहीम राबविली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्त्यावर बेवारस वाहनांची संख्या पुन्हा वाढलेली असून, त्यांच्यावर कारवाई करा, अशी सूचना माधुरी लाड यांनी केली. महापालिकेच्या बऱ्याच शाळांमध्ये गळती असून, काही ठिकाणी दरवाजे खराब झालेले आहेत. शाळेच्या छताची स्वच्छता करून गळती थांबवा, अशी मागणी सविता भालकर यांनी केली.पाण्याची साडेतीन हजार मीटर बंदशहरात सुमारे ३४०० पाण्याची मीटर बंद असल्याची माहिती सभेत समोर आली. सदर मीटरचे क्रॉस चेकिंग करण्यात येईल.मीटर रीडरला कमिशन मिळत असल्याने पाणी मीटर बंद आहेत, असा शिक्का मारून मीटर बदलण्यास भाग पाडले जात आहे. संबंधित मीटर रीडरवर कारवाई करावी, अशी मागणी सविता भालकर यांनी सभेत केली. यापुढे स्थायी समितीमार्फत क्रॉस चेकिंग करण्यात येईल. जर यामध्ये कोणी चूक केली असेल तर त्यांंच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा सभापती शारंगधर देशमुख यांनी दिला.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर