शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

कोल्हापूर जिल्ह्याच्या ५२५ कोटींच्या खर्चाला मान्यता, निधी शंभर टक्के खर्च करण्याची पालकमंत्र्यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 14:16 IST

पावसाळ्यात परिख पुलाखाली पावसाचे पाणी साचू नये यासाठी पाणी उपशासाठी दर्जेदार पंप बसवा

कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात शंभर टक्के निधी खर्च होईल, याची दक्षता घ्या, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मार्च २०२३ अखेर ५२५.१४ कोटींच्या झालेल्या खर्चाला मान्यता देण्यात आली. २०२३-२४च्या अर्थसंकल्पित ५९८.६७ कोटींपैकी मिळालेल्या ४८.३४ कोटींच्या तरतुदीचा आढावा घेण्यात आला.यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार हसन मुश्रीफ, राजेश पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, पी.एन. पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार उपस्थित अधिकारी उपस्थित होते.विविध योजनांसाठी राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आलेल्या अतिरिक्त मागणीनुसार २०२२-२३ मधील ४२५ कोटींच्या अर्थसंकल्पित निधीत ५५ कोटींची वाढ करुन जिल्ह्याला ४८० कोटींचा निधी अर्थसंकल्पीत करण्यात आल्याची माहिती दिली. जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी तरतुदीची माहिती दिली.

परिख पुलाखाली पंप लावा रे..पावसाळ्यात परिख पुलाखाली पावसाचे पाणी साचू नये यासाठी पाणी उपशासाठी दर्जेदार पंप बसवा. तोपर्यंत रोडओव्हर ब्रीजचा प्रस्ताव तयार करा, अशा सूचना पालकमंत्री केसरकर यांनी दिल्या.

प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगा नाही : जिल्हाधिकारीकेंद्र शासनाच्या प्रदूषित नद्यांमधील यादीतून आता पंचगंगा नदीचे नाव वगळण्यात आल्याची बाब आनंदाची असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महापालिका व इचलकरंजी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, त्यांची लवकरच निविदा काढली जाईल. इचलकरंजीतील अन्य उद्योगांच्या पाण्यावरील प्रक्रियेसाठीचा डीपीआर तयार असून, एमआयडीसीकडून त्याचे नियोजन केले जाणार आहे. तसेच ८९ गावांमधून नदीत मिसळणारे सांडपाणी थांबविण्यासाठीही कार्यवाही सुरू आहे. पुढील अडीच वर्षात पंचगंगेचे प्रदूषण शून्य होणार आहे.

मानधनावर शिक्षक नेमायावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची १६१५ पदे रिक्त असून, मुलांनी शिक्षणासाठी जायचे कुठे, असा प्रश्न मांडला. अशाने विद्यार्थी गळती होईल त्यामुळे शिक्षक भरती होईपर्यंत मानधनावर नियुक्ती करावी, अशी सूचना केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeepak Kesarkarदीपक केसरकर