शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

हुपरी नगरपालिका स्थापनेस मंजुरी

By admin | Updated: April 8, 2017 00:20 IST

मुख्यमंत्र्यांचे पालकमंत्र्यांना पत्र; लोकलढ्याला यश

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) नगरपालिका स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अंतिम मंजुरी दिली. या मंजुरीचे पत्र पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व जनता समूहाचे संस्थापक आण्णासाहेब शेंडुरे यांच्याकडे सुपूर्द केले. शासनाच्या या निर्णयाने कृती समितीने उभारलेल्या लोकलढ्याचा अभूतपूर्व विजय झाला आहे. हुपरी ग्रामस्थांनी शुक्रवारी साखर-पेढे वाटून, फटाके उडवून जल्लोष केला. जनतेने दिलेल्या पाठबळामुळे नगरपालिका मंजूर झाली असून, हे यश हुपरीकरांचे असल्याची भावना कृती समितीचे निमंत्रक अमजद नदाफ, सहनिमंत्रक बाळासाहेब कांबळे यांनी व्यक्त केली.चांदीच्या दागिन्यांसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध असणाऱ्या हुपरीत नगरपालिका स्थापन करावी यासाठी गेली अनेक वर्षे शासनाकडे मागणी होत होती. मात्र, गावची लोकसंख्या ५0 हजारांच्या पुढे गेली तरी शासन त्याकडे दुर्लक्ष करीत होते. गावचा विस्तार वाढल्यामुळे नागरी सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत अपयशी ठरत होती. त्यामुळे गावचा विकास पूर्ण खुंटला होता. याप्रकरणी हुपरी ग्रामस्थांनी कृती समिती स्थापन केली. कृती समितीने हुपरी नगरपालिका मागणीसाठी १५ जून २0१५ पासून २१ दिवस विविध आंदोलने केली. त्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले. हुपरीकरांनी ‘बंद’चा इशारा दिल्यामुळे आमदार सुरेश हाळवणकर, सुजित मिणचेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना हुपरी गावची स्थिती सांगून नगरपालिका मंजुरीस तत्त्वत: मंजुरी मिळविली. कृती समितीने पाठपुरावा सुरूच ठेवल्यामुळ शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना हुपरीला नगरपालिकेसाठी अंतिम मंजुरी मिळावी, असे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अंतिम मंजुरी पत्रावर स्वाक्षरी केल्याने नगरपालिकेचा मार्ग मोकळा झाला. पेढे वाटून आनंदोत्सवनगरपालिका मंजुरीची माहिती मिळताच हुपरीत साखर-पेढे वाटून गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी कृती समितीचे निमंत्रक अमजद नदाफ, सहनिमंत्रक बाळासाहेब कांबळे, अशोक खाडे, मुबारक शेख, तानाजी घोरपडे, प्रवीण कुंभोजकर, विनोद खोत, जि.प.चे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ, जि.प.चे सदस्य किरण कांबळे, माजी सरपंच दौलतराव पाटील, मंगलराव माळगे, प्रतापसिंह देसाई, गणेश कोळी, नितीन गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख अमोल देशपांडे, वीरकुमार शेंडुरे, लालासाहेब देसाई, विशाल चव्हाण, जयकुमार माळगे, विद्याधर कांबळे, जीवन नवले, पृथ्वीराज गायकवाड, संकेत कानडे-पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.