शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रसंगी अध्यादेशाद्वारे पगारी पुजारी नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासंबंधी सरकारची भूमिका ठाम आहे. त्याबाबतचा जिल्हाधिकाºयांचा अहवाल गुरुवारी शासनाच्या विधि व न्याय विभागाला सादर होणार आहे. त्याआधारे आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पगारी पुजारी नेमण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळास सादर होईल. मंत्रिमंडळाने मंजुरी दिली की डिसेंबर महिन्यात होणाºया हिवाळी अधिवेशनात त्याचे कायद्यात रूपांतर होईल; पण ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासंबंधी सरकारची भूमिका ठाम आहे. त्याबाबतचा जिल्हाधिकाºयांचा अहवाल गुरुवारी शासनाच्या विधि व न्याय विभागाला सादर होणार आहे. त्याआधारे आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पगारी पुजारी नेमण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळास सादर होईल. मंत्रिमंडळाने मंजुरी दिली की डिसेंबर महिन्यात होणाºया हिवाळी अधिवेशनात त्याचे कायद्यात रूपांतर होईल; पण असे झाले नाही किंवा त्याला आव्हान दिले गेले तरी प्रसंगी राज्यपालांद्वारे अध्यादेश काढून यासंबंधीचा कायदा केला जाईल, अशी नि:संदिग्ध ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे दिली.अंबाबाई मूर्तीला घागरा-चोली नेसविल्या प्रकरणानंतर सुरू झालेले अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ प्रकरण आता महत्त्वाच्या वळणावर आले आहे. याप्रश्नी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या एकसदस्यीय समिती पुढील सुनावणी प्रक्रियेचा अहवाल विधि व न्याय खात्याला सादर होणार आहे. दुसरीकडे शासनाच्याही स्वतंत्र समितीच्यावतीने देशभरातील मंदिरांचा अभ्यास करून पगारी पुजारी नेमण्यासंबंधी काय निर्णय घेता येईल यावर काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वंशपरंपरागत पुजाºयांनाच पान १ वरून)पगारावर नेमले जाईल की नवीन पुजाºयांची नेमणूक होईल, त्यांना पगार दिला जाईल की, उत्पन्नातील टक्केवारी याबाबत चर्चा सुरूझाली आहे. या सगळ्या बाबींवर चर्चा करण्यासाठी सोमवारी अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीच्या सदस्यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबत शासनाची भूमिका ठाम आहे. आता त्यातून माघार नाही. त्यावर निर्णय घेण्यासाठी देशात व राज्यात ज्या-ज्या ठिकाणी पगारी पुजारी नेमण्यात आले आहे, त्यांना पगार दिला जातो की मंदिराच्या उत्पन्नाची टक्केवारी या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र समिती काम करत आहे. मी स्वत: न्याय व विधि खात्याच्या अधिकाºयांनाही याचा अभ्यास करायला सांगितले आहे. जिल्हाधिकाºयांचा अहवाल आणि समितीच्या अभ्यासाअंती पगारी पुजारी नेमण्याचा प्रस्ताव तयार केला जाईल. हा प्रस्ताव आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळापुढे सादर केला जाईल. मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली की डिसेंबरमध्ये होणाºया हिवाळी अधिवेशनात त्याला कायदा म्हणून मंजुरी दिली जाईल. या प्रस्तावाला कोणाचाही विरोध होणार नाही, अशी अपेक्षा आहे; मात्र विरोध झालाच, त्याला आव्हान दिले गेले किंवा मंजुरी नाहीच मिळाली तर शासनाच्यावतीने राज्यपालांना अध्यादेश काढण्यासंबंधी विनंती केली जाईल; पण कोणत्याही परिस्थितीत कायदा केला जाईल. आम्ही कायदा इतका सक्षम करणार आहोत की, हे प्रकरण न्यायालयात गेले तरी कायद्याचे कलम आणि नियमांच्या कसोटीवर तो टिकेल.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, माजी आमदार सुरेश साळोखे, आर. के. पोवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, माजी नगरसेवक राजू लाटकर, दिलीप पाटील, बाबा पार्टे, शरद तांबट उपस्थित होते.--------------पात्रता काय, पगार किती?यावेळी संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी व्यसनी, ज्यांच्यावर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत व ज्यांनी स्वत:च्या स्वार्थापोटी आई श्री अंबाबाईच्या मूर्तीचा अवमान केला आहे अशांना पगारी पुजारी म्हणून नेमू नये, अशी मागणी केली तसेच देवीच्या गाभाºयात पोलीस प्रशासनाच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी केली. त्यावर चंद्रकांतदादांनी पुजाºयांची नेमकी पात्रता काय असावी, त्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार द्यावा की आठव्या वेतन आयोगाप्रमाणे या सगळ्यावर अभ्यास सुरू आहे. कायदा करताना यावर निर्णय घेतला जाईल. गाभाºयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंबंधी मी माहिती घेऊन पोलीस प्रशासनाला तशी सूचना देईन.ठाणेकर यांच्यासंबंधी..नवरात्रौत्सवातील शेवटचे दोन दिवस श्रीपूजक अजित ठाणेकर यांचा वार आहे त्यावेळी त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाईल का? या प्रश्नाला पालकमंत्र्यांनी चौकशी करून सांगतो, असे सांगितले.साडी स्वीकारण्यास हरकत नाही...अंबाबाईला अष्टमीदिवशी तिरूपती देवस्थानकडून शालू अर्पण केला जातो. या शालूबाबत पालकमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, भक्ताने देवीला अर्पण केलेली साडी स्वीकारली जाते. त्यामुळे अन्य देवस्थाननेही श्रद्धेपोटी दिलेला शालू स्वीकारण्यास हरकत नाही.नवरात्रौत्सव निर्विघ्न पार पडणारदहा दिवसांवर नवरात्रौत्सव आला आहे. त्यानंतर दिवाळी आहे. सणांच्या या कालावधीत परस्थ: भाविक लाखोंच्या संख्येने कोल्हापुरात येतात. त्यांच्यापुढे अंबाबाई मंदिरासंबंधी कोणतेही वाद उत्पन्न होऊ नये किंवा आंदोलन होऊ नये यासंबंधीची काळजी घेण्यात यावी, असे आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी केले. त्यावर अशी काळजी घेण्याचे आश्वासन संघर्ष समितीने दिले.