शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्यातील टोल वसुलीची चौकशी समिती नेमून चौकशी करा; आमदार प्रकाश आबीटकर यांची मागणी

By भीमगोंड देसाई | Updated: August 8, 2023 19:15 IST

राज्यातील अनेक राष्ट्रीय आणि राज्य मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून टोल वसुली सुरू आहे.

कोल्हापूर: राज्यातील अनेक राष्ट्रीय आणि राज्य मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून टोल वसुली सुरू आहे. या टोल वसुलीमध्ये जमा होणाऱ्या रकमेचे पुढे काय होते, हाच मोठा झोल आहे. यामुळे राज्यातील टोल वसुलीची स्वतंत्र चौकशी समिती नेमून चौकशी करा, अशी आग्रही मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत उपस्थित प्रश्नाच्या दरम्यान केली. आमदार आबिटकर म्हणाले, सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गावरील किणी व तासवडे येथील टोल नाक्यांवर बेकायदेशीर टोल वसुली होत आहे.

 या दोन्ही टोल नाक्यांवर टोल वसुलीसाठी २० वर्षांची मुदत होती. या टोल नाक्यावर एकूण ३ हजार २४५ हजार कोटी खर्चापैकी आजपर्यंत १,९०२ हजार कोटी रुपयांची वसुली झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र, किती टोल वसूल झाला, याबाबत कोणतेही मोजमाप करणारी यंत्रणा नसल्यामुळे टोल नाके म्हणजे लुटीची केंद्रे झाली आहेत.यावेळी उत्तर देताना बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, राज्यातील टोल वसुलीसंबंधी अनेक तक्रारी येत आहेत. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtollplazaटोलनाकाMLAआमदार