शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘सहयोग’ने केला मत्स्यगंधाचा दुसरा प्रयोग

By admin | Updated: February 2, 2015 00:13 IST

अप्रतिम नेपथ्य : सांघिक यशामुळे आशावादी राहायला संधी --राज्य नाट्य स्पर्धा

संगीत नाट्य स्पर्धेत सं. मत्स्यगंधा हे सादर झालेले तेरावे नाटक. हे नाटक स्पर्धेत दुसऱ्यांदा सादर झाले. सहयोग, रत्नागिरीने हे नाटक सादर केले. नाटकाची सुरुवात ओंकारम वाणी या नांदीने झाली. पडदा उघडल्यानंतर अप्रतीम नेपथ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.नाटकातील प्रमुख भूमिका सिद्धी बोंद्रे (सत्यवती) यांनी रंगवली. बोंद्रे यांचा आवाज गोड व सुरेल होता. त्यामुळे सत्यवतीच्या तोंडी असलेली काहीशी भावगीतांच्या अंगाने जाणारी पदे चांगली सादर केली. परंतु सत्यवतीचा अल्लडपणा, खट्याळपणा भूमिकेत कमी जाणवला. पायातील चाळांचा वापर केला असता, तर अधिक मजा आली असती. तिसऱ्या अंकात वाढलेल्या वयाचा रंगभूषा, केशभूषा व वेशभूषा याव्यतिरिक्त कुठेही परिणाम दिसला नाही. आवाज, देहबोली, ताठा यामध्ये पहिल्या अंकातील सत्यवती डोकावत होती.कैलास खरे यांनी पराशराची भूमिका केवळ आवाजाच्या जोरावर पार पाडल्याचे जाणवले. गळ्याची तयारी नसताना केवळ आवाजाच्या जोरावर पदे म्हटली. देवाघरचे ज्ञात कुणाला, गुंतता हृदय हे, नको विसरु संकेत मिलनाचा, साद देत हिमशिखरे या पदांमध्ये छोट्या छोट्या ताना आहेत. त्या बेसूर होत होत्या. आवाजात कंप आणून ती पदे सादर करताना बोलतानाचा प्रयत्न असफल झाला. देवाघरचे कमलदलाच्या मनासी, कैलासाचा या शब्दांवर छोट्या ताना असल्यामुळे पदे गाताना कसरत होत होती.स्वप्न रंगले रात्री धुंद प्रेमिकांचे या ओळींवर व्हरायटी होताना नृत्याचे हावभाव केले, ते पराशराच्या भूमिकेशी विसंगत होते. विकास फडके (चंडोल) यांचा चंडोल खूपच विसंगत रंगवला गेला. लहू घाणेकर (धीवर) व विकास फडके यांच्या भूमिकेमध्ये अभिनय खूपच कमी पडला. धीवराने बरेचसे संवाद खाली बघूनच म्हटले. समोर किंवा प्रेक्षकांकडे बघणे ते टाळत होते.संकेत चक्रदेव (प्रियदर्शन), राम तांबे (शंतनु) यांनी आपल्या भूमिका चांगल्या निभावल्या. भाग्यश्री अभ्यंकर (अंबा) यांचा अभिनय कमी पडला. राम तांबे यांनी संसार सुख नसे भाळी व स्त्री प्रेमावीण जीवन अवघे ही पदे चांगली पेलली.कैलास खरे (पराशर), सिद्धी बोंद्रे (सत्यवती), प्रवीण दामले (देवव्रत), लहू घाणेकर (धीवर) यांचे संवाद म्हणताना शब्द अडखळत होते.तिसऱ्या अंकामध्ये प्रवीण दामले (देवव्रत) पूर्णपेण संवाद विसरले. पुढचे संवाद आठवण्यासाठी मागचे संवाद परत म्हणण्याची वेळ आली, हा प्रसंग खूपच दुर्दैवी होता.या नाटकामध्ये अंबा-भीष्म, सत्यवती-भीष्म व भीष्म चंडोल यांचे काही संवाद नाटकातील मर्मस्थाने म्हणून ओळखले जातात. ते अपेक्षितपणे सादर झाले नाहीत.नाटकाची संगीत साथ सुंदर होती. संतोष आठवले (आॅर्गन), राजू जोशी (तबला), नितीन देशमुख (व्हायोलीन) यांनी समर्पक साथसंगत केली. राजू जोशी यांचा तबला बोलत होता, अशी प्रतिक्रिया रसिकांमधून उमटली.नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा, प्रकाशयोजना या नाटकाच्या जमेच्या बाजू होत्या. पार्श्वसंगीताचा अजून विचार व्हायला हवा होता, असे वाटले नाटकातील चढ उतार लक्षात घेता टीमवर्क म्हणून या नाटकाचा प्रयत्न कौतुकास्पद होता.संध्या सुर्वे