शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले योजनेअंतर्गत आणखी १६५८ पात्र शेतकरी, ४८ हजार शेतकरी कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:10 IST

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आणखी १६५८ शेतकरी पात्र झाले आहेत. आतापर्यंत ४३ हजार ३३६ शेतकऱ्यांना २५५ कोटी २२ लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील ४८ हजार २४९ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत.

ठळक मुद्देमहात्मा फुले योजनेअंतर्गत आणखी १६५८ पात्र शेतकरी, ४८ हजार शेतकरी कर्जमुक्तआतापर्यंत ४३ हजार शेतकऱ्यांना २५५ कोटी जमा

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आणखी १६५८ शेतकरी पात्र झाले आहेत. आतापर्यंत ४३ हजार ३३६ शेतकऱ्यांना २५५ कोटी २२ लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील ४८ हजार २४९ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत.राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली होती. कोल्हापूर जिल्ह्यातून ५१ हजार ४२६ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्यांतील ४६ हजार ५९१ शेतकरी पात्र झाले होते. त्यांपैकी ४५ हजार ५०९ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले. यांतील सर्वाधिक २९ हजार १७२ शेतकरी हे जिल्हा बँकेचे तर १३ हजार १३५ शेतकरी हे व्यापारी बँकांकडील आहेत. या दोन्ही बँकांकडील ४२ हजार ३०७ शेतकऱ्यांना २४९ कोटी ९८ लाख रुपये कर्जमाफीची रक्कम मिळाली होती.मध्यंतरी कोरोनामुळे कर्जमाफी थांबली होती; मात्र खरीप हंगामात शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, म्हणून महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीच्या कामास पुन्हा गती दिली. त्यानुसार २१ जुलै रोजी जिल्हा बँकेचे १०२९ शेतकऱ्यांचे पाच कोटी २४ लाख रुपये आले. त्याचबरोबर व्यापारी बँकांचीही यादी आली आहे.

दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील १६५८ पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर आली असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ४८ हजार २४९ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. ज्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही, त्यांनी लॉकडाऊन संपताच त्याची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पत्रकातून केले आहे.महापुरातील कर्जमाफीचे पैसे ऑगस्टमध्येमध्यंतरी महापुरातील ४१ कोटी रुपये जिल्ह्यासाठी आले होते. त्यातून पावसाने झालेली पडझड व शेतीच्या नुकसानीचे पैसे देण्यात आले. मात्र अद्याप कर्जमाफीपासून काही शेतकरी वंचित आहेत. त्यासाठी पुरवणी यादीतून जिल्ह्यासाठी २५ कोटींची मागणी केली असून साधारणत: १० ऑगस्टपर्यंत हे पैसे उपलब्ध होतील. 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर