शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

महात्मा फुले योजनेअंतर्गत आणखी १६५८ पात्र शेतकरी, ४८ हजार शेतकरी कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:10 IST

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आणखी १६५८ शेतकरी पात्र झाले आहेत. आतापर्यंत ४३ हजार ३३६ शेतकऱ्यांना २५५ कोटी २२ लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील ४८ हजार २४९ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत.

ठळक मुद्देमहात्मा फुले योजनेअंतर्गत आणखी १६५८ पात्र शेतकरी, ४८ हजार शेतकरी कर्जमुक्तआतापर्यंत ४३ हजार शेतकऱ्यांना २५५ कोटी जमा

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आणखी १६५८ शेतकरी पात्र झाले आहेत. आतापर्यंत ४३ हजार ३३६ शेतकऱ्यांना २५५ कोटी २२ लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील ४८ हजार २४९ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत.राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली होती. कोल्हापूर जिल्ह्यातून ५१ हजार ४२६ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्यांतील ४६ हजार ५९१ शेतकरी पात्र झाले होते. त्यांपैकी ४५ हजार ५०९ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले. यांतील सर्वाधिक २९ हजार १७२ शेतकरी हे जिल्हा बँकेचे तर १३ हजार १३५ शेतकरी हे व्यापारी बँकांकडील आहेत. या दोन्ही बँकांकडील ४२ हजार ३०७ शेतकऱ्यांना २४९ कोटी ९८ लाख रुपये कर्जमाफीची रक्कम मिळाली होती.मध्यंतरी कोरोनामुळे कर्जमाफी थांबली होती; मात्र खरीप हंगामात शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, म्हणून महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीच्या कामास पुन्हा गती दिली. त्यानुसार २१ जुलै रोजी जिल्हा बँकेचे १०२९ शेतकऱ्यांचे पाच कोटी २४ लाख रुपये आले. त्याचबरोबर व्यापारी बँकांचीही यादी आली आहे.

दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील १६५८ पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर आली असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ४८ हजार २४९ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. ज्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही, त्यांनी लॉकडाऊन संपताच त्याची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पत्रकातून केले आहे.महापुरातील कर्जमाफीचे पैसे ऑगस्टमध्येमध्यंतरी महापुरातील ४१ कोटी रुपये जिल्ह्यासाठी आले होते. त्यातून पावसाने झालेली पडझड व शेतीच्या नुकसानीचे पैसे देण्यात आले. मात्र अद्याप कर्जमाफीपासून काही शेतकरी वंचित आहेत. त्यासाठी पुरवणी यादीतून जिल्ह्यासाठी २५ कोटींची मागणी केली असून साधारणत: १० ऑगस्टपर्यंत हे पैसे उपलब्ध होतील. 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर