शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

महात्मा फुले योजनेअंतर्गत आणखी १६५८ पात्र शेतकरी, ४८ हजार शेतकरी कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:10 IST

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आणखी १६५८ शेतकरी पात्र झाले आहेत. आतापर्यंत ४३ हजार ३३६ शेतकऱ्यांना २५५ कोटी २२ लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील ४८ हजार २४९ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत.

ठळक मुद्देमहात्मा फुले योजनेअंतर्गत आणखी १६५८ पात्र शेतकरी, ४८ हजार शेतकरी कर्जमुक्तआतापर्यंत ४३ हजार शेतकऱ्यांना २५५ कोटी जमा

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आणखी १६५८ शेतकरी पात्र झाले आहेत. आतापर्यंत ४३ हजार ३३६ शेतकऱ्यांना २५५ कोटी २२ लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील ४८ हजार २४९ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत.राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली होती. कोल्हापूर जिल्ह्यातून ५१ हजार ४२६ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्यांतील ४६ हजार ५९१ शेतकरी पात्र झाले होते. त्यांपैकी ४५ हजार ५०९ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले. यांतील सर्वाधिक २९ हजार १७२ शेतकरी हे जिल्हा बँकेचे तर १३ हजार १३५ शेतकरी हे व्यापारी बँकांकडील आहेत. या दोन्ही बँकांकडील ४२ हजार ३०७ शेतकऱ्यांना २४९ कोटी ९८ लाख रुपये कर्जमाफीची रक्कम मिळाली होती.मध्यंतरी कोरोनामुळे कर्जमाफी थांबली होती; मात्र खरीप हंगामात शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, म्हणून महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीच्या कामास पुन्हा गती दिली. त्यानुसार २१ जुलै रोजी जिल्हा बँकेचे १०२९ शेतकऱ्यांचे पाच कोटी २४ लाख रुपये आले. त्याचबरोबर व्यापारी बँकांचीही यादी आली आहे.

दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील १६५८ पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर आली असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ४८ हजार २४९ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. ज्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही, त्यांनी लॉकडाऊन संपताच त्याची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पत्रकातून केले आहे.महापुरातील कर्जमाफीचे पैसे ऑगस्टमध्येमध्यंतरी महापुरातील ४१ कोटी रुपये जिल्ह्यासाठी आले होते. त्यातून पावसाने झालेली पडझड व शेतीच्या नुकसानीचे पैसे देण्यात आले. मात्र अद्याप कर्जमाफीपासून काही शेतकरी वंचित आहेत. त्यासाठी पुरवणी यादीतून जिल्ह्यासाठी २५ कोटींची मागणी केली असून साधारणत: १० ऑगस्टपर्यंत हे पैसे उपलब्ध होतील. 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर