शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घोषणा झाली, पण... भिरभरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 22:19 IST

बुधवारचा दिवस. मुख्यमंत्र्यांची भरगच्च पत्रकार परिषद. मुख्यमंत्र्यांनी ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियानां’तर्गत तब्बल ४००० कोटी रुपयांवर खर्च करून ६०,४१,००० शौैचालये बांधण्यात आली आहेत

-उदय कुलकर्णी --बुधवारचा दिवस. मुख्यमंत्र्यांची भरगच्च पत्रकार परिषद. मुख्यमंत्र्यांनी ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियानां’तर्गत तब्बल ४००० कोटी रुपयांवर खर्च करून ६०,४१,००० शौैचालये बांधण्यात आली आहेत आणि त्यामुळे महाराष्ट हागणदारीमुक्त झाला आहे, अशी घोषणा केली. घोषणा ऐकून अवघा महाराष्ट थक्क झाला.खरं तर शौचालये बांधण्यासाठी अनुदान ही काही नवी योजना नव्हे. ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत तशी अनुदाने ग्रामीण भागात शौचालये बांधणाऱ्यांना पूर्वीही दिली जात होती. अशा काही कामांची पाहणी करण्यासाठी मी सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत फिरत होतो. अनेक खेड्यांत घरांजवळ नवी बांधकामे दिसली. कुतूहलानं चौकशी केली. ती शासकीय अनुदानातून उभारलेली शौचालये असल्याचं कळलं. काही ठिकाणी त्या शौचालयांमध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या, तर काही ठिकाणी उत्पन्नाचं साधन म्हणून पी.सी.ओ. सुरू केलेला होता. विचारलं, ‘शेळ्या इथं, पी.सी.ओ. इथं, मग शौचाला कुठं जाता?’ - तर उत्तर मिळालं ‘ते काय पूर्वीपासून जसं चालू आहे तसं चालू आहे’. आता हागणदारीमुक्तीच्या नावावर नव्याने हजारो कोटी रुपये शौचालयावर खर्च झाले आहेत. दुसºया टप्प्यात म्हणे शौचालयांचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. - प्रश्न आहे की, शौचालयांची उभारणी व जनजागृती या दोन्ही गोष्टी एकावेळी करता आल्या नसत्या का? - दुसरी बाब,अजूनही गावागावांत, शहराशहरांत अपंग व्यक्ती आणि महिलांसाठी पुरेशी सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत, त्याबाबतची जाग कधी येणार आहे?विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील गोष्ट. सीताराम पुरुषोत्तम तथा आप्पासाहेब पटवर्धन हे मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजचे स्कॉलर. गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पटवर्धनांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी गांधींबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली; पण गांधींनी त्यांना आधी खेडेगावांत जाऊन मानवी विष्ठा आणि कचरा गोळा करीत ग्रामस्वच्छतेचा आदर्श निर्माण करण्याविषयी सुचवलं. उच्चशिक्षित पटवर्धनांनी कणकवली गाठलं. रोज कावडीतून गावातला मैला गोळा करायला सुरुवात केली. लोकांनी सुरुवातीला वेड्यात काढलं; पण एकत्र केलेल्या मैल्यातून त्यांनी सोनखत बनवलं आणि शेती फुलवून दाखवली. मानवी विष्ठा वाहून नेणाºयांचे कष्ट कमी व्हावेत यासाठी चराचे संडास, गोपुरी संडास असे अनेक प्रकारचे संडास बनवले. कणकवलीत गोपुरी आश्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संडासचे म्युझियमही उभारले. ग्रामस्वच्छता, हागणदारीमुक्त आणि मानवी विष्ठेची विल्हेवाट योग्य प्रकारे लावण्याच्या कामाला प्रतिष्ठा मिळावी म्हणून आपण काय केले याची पटवर्धन यांनी पत्रकार बैठक घेऊन जाहिरात केल्याचे मात्र आठवत नाही. सध्या मात्र किती हजार कोटी खर्च याच्या जाहिरातीचा जमाना आहे. ग्रामस्वच्छता करायची म्हणजे इस्त्रीचे कपडे घालून नवा कोरा लांब दांड्याचा झाडू घेऊन तोंडाला मास्क घालून, कपड्यावर अ‍ॅप्रन बांधून व हातात ग्लोव्हज घालून छायाचित्रे काढायची म्हणजे निवडणुकीत त्याचा उपयोग करता येतो. ‘कोकण’ गांधींचा आदर्श कोण घेणार? त्यांचा आदर्श घेऊन निवडणुका थोड्याच जिंकता येणार आहेत?मुख्यमंत्र्यांनी हागणदारीमुक्तीची घोषणा केली हे खरे; पण याच महाराष्टÑात शहराशहरांमध्ये कचºयाचा प्रश्न गंभीर होत चाललाय त्याचं काय? ना कचºयाच्या उठावाची योग्य व्यवस्था आहे, ना कचºयाच्या योग्य विल्हेवाटीची ! कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद अशा सगळ्याच शहरांच्या परिसरात कचºयांचे डोंगर आणि त्यानं पसरणारं अनारोग्य पाहायला मिळायला लागलंय. अधूनमधून हे कचºयाचे ढीग पेटवून दिले जातात आणि प्रदूषणात भर घातली जाते. मध्यमवर्गीय नागरिक शहर स्वच्छतेबाबत अतिजागरूक म्हणून ते ‘गार्बेज वॉक’ काढून आपला संताप व्यक्त करतात. बलात्कार झाला की मेणबत्त्या घेऊन फेरी काढायची. विचारवंताची हत्या झाली की, ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढायचा आणि कचरा फार झाला असं वाटलं तर ‘गार्बेज वॉक’ काढायचा. या पलीकडं जाऊन नागरिकांमध्ये कृतिशिलता यावी यासाठी आपण काय करणार आहोत? मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आपणास माहिती आहे का? २०१७ या वर्षात दर दिवशी सर्वाधिक कचरा निर्माण करणाºया राज्यांमध्ये देशात महाराष्टÑाचा पहिला क्रमांक होता. देशामध्ये दररोज दीड लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो. या कचºयापासून देशाला आणि महाराष्टÑाला मुक्ती कशी मिळेल?( -  लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत   kollokmatpratisad@gmail.com)