शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

जग बदल घालुनी घाव, ‘शाहिरी जागर’द्वारे अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 10:52 IST

‘जग बदल घालुनी घाव,’ ‘एका धरतीच्या पोटी,’ ‘भीमसूर्याचा जाळ अण्णा भाऊ’, ‘या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे’, आदी पोवाड्यांतून ‘शाहिरी जागर’ कार्यक्रमाद्वारे शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देजग बदल घालुनी घाव, ‘शाहिरी जागर’द्वारे अण्णा भाऊ साठे यांना अभिवादनशिवाजी विद्यापीठातील कार्यक्रम

कोल्हापूर : ‘जग बदल घालुनी घाव,’ ‘एका धरतीच्या पोटी,’ ‘भीमसूर्याचा जाळ अण्णा भाऊ’, ‘या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे’, आदी पोवाड्यांतून ‘शाहिरी जागर’ कार्यक्रमाद्वारे शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.विद्यापीठाच्या अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने ‘शाहिरी जागर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वि. स. खांडेकर भाषाभवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी इंग्रजी अधिविभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरवदे, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते.

शाहीर देवानंद माळी (सांगली), आझाद नायकवडी (कोल्हापूर), बाबूराव कांबळे (कांडगाव), संजय जाधव (इचलकरंजी), सदाशिव निकम (सिद्धनेर्ली) आणि नूपुर व राजवैष्णवी वायदंडे यांनी ‘शाहिरी जागर’ कार्यक्रमात एकाहून एक सरस असे पोवाडे सादर करून वातावरण भारावून टाकले. उपस्थितांमध्ये शाहीर राजू राऊत, शामराव खडके, विनायक चव्हाण, दिलीप सावंत असे शाहिरी परंपरा समृद्ध करणारे कलावंत होते. त्यामुळे या कार्यक्रमाला उत्तरोत्तर रंगत चढत गेली.डॉ. नायकवडी यांनी शाहिरी मुजऱ्याने सुरवात करून ‘जग बदल घालुनी घाव’, ‘एका धरतीच्या पोटी’ हे पोवाडे सादर करून कार्यक्रमाचा दमदार प्रारंभ केला. त्यानंतर देवानंद माळी यांनी त्यांच्या नेहमीच्या जोशात ‘गण’ आणि अण्णा भाऊंना स्वरचित शाहिरी वंदना अर्पण केली. संजय जाधव यांनी ‘या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे’, ‘शिवारी चला’ सादर केले. सदाशिव निकम यांनी ‘भीमसूर्याचा जाळ अण्णा भाऊ,’ आदी सादर केले. दिवसभरात बाबूराव कांबळे, नूपुर आणि राजवैष्णवी वायदंडे यांनी अत्यंत जोशपूर्ण सादरीकरण केले. अध्यासनाचे प्रमुख तथा मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.

चिरंतन टिकून राहणारे साहित्यसाहित्याच्या सार्वकालिक निकषांवर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य चिरंतन टिकून राहणारे आहे. या साहित्यातील विचारांनी महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यांना जिवंत केले. त्यांनी प्रबोधनात्मक साहित्याची परंपरा निर्माण केली, असे प्रतिपादन डॉ. मेघा पानसरे यांनी येथे केले.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर