शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

जग बदल घालुनी घाव, ‘शाहिरी जागर’द्वारे अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 10:52 IST

‘जग बदल घालुनी घाव,’ ‘एका धरतीच्या पोटी,’ ‘भीमसूर्याचा जाळ अण्णा भाऊ’, ‘या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे’, आदी पोवाड्यांतून ‘शाहिरी जागर’ कार्यक्रमाद्वारे शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देजग बदल घालुनी घाव, ‘शाहिरी जागर’द्वारे अण्णा भाऊ साठे यांना अभिवादनशिवाजी विद्यापीठातील कार्यक्रम

कोल्हापूर : ‘जग बदल घालुनी घाव,’ ‘एका धरतीच्या पोटी,’ ‘भीमसूर्याचा जाळ अण्णा भाऊ’, ‘या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे’, आदी पोवाड्यांतून ‘शाहिरी जागर’ कार्यक्रमाद्वारे शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.विद्यापीठाच्या अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने ‘शाहिरी जागर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वि. स. खांडेकर भाषाभवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी इंग्रजी अधिविभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरवदे, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते.

शाहीर देवानंद माळी (सांगली), आझाद नायकवडी (कोल्हापूर), बाबूराव कांबळे (कांडगाव), संजय जाधव (इचलकरंजी), सदाशिव निकम (सिद्धनेर्ली) आणि नूपुर व राजवैष्णवी वायदंडे यांनी ‘शाहिरी जागर’ कार्यक्रमात एकाहून एक सरस असे पोवाडे सादर करून वातावरण भारावून टाकले. उपस्थितांमध्ये शाहीर राजू राऊत, शामराव खडके, विनायक चव्हाण, दिलीप सावंत असे शाहिरी परंपरा समृद्ध करणारे कलावंत होते. त्यामुळे या कार्यक्रमाला उत्तरोत्तर रंगत चढत गेली.डॉ. नायकवडी यांनी शाहिरी मुजऱ्याने सुरवात करून ‘जग बदल घालुनी घाव’, ‘एका धरतीच्या पोटी’ हे पोवाडे सादर करून कार्यक्रमाचा दमदार प्रारंभ केला. त्यानंतर देवानंद माळी यांनी त्यांच्या नेहमीच्या जोशात ‘गण’ आणि अण्णा भाऊंना स्वरचित शाहिरी वंदना अर्पण केली. संजय जाधव यांनी ‘या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे’, ‘शिवारी चला’ सादर केले. सदाशिव निकम यांनी ‘भीमसूर्याचा जाळ अण्णा भाऊ,’ आदी सादर केले. दिवसभरात बाबूराव कांबळे, नूपुर आणि राजवैष्णवी वायदंडे यांनी अत्यंत जोशपूर्ण सादरीकरण केले. अध्यासनाचे प्रमुख तथा मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.

चिरंतन टिकून राहणारे साहित्यसाहित्याच्या सार्वकालिक निकषांवर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य चिरंतन टिकून राहणारे आहे. या साहित्यातील विचारांनी महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यांना जिवंत केले. त्यांनी प्रबोधनात्मक साहित्याची परंपरा निर्माण केली, असे प्रतिपादन डॉ. मेघा पानसरे यांनी येथे केले.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर