शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

जग बदल घालुनी घाव, ‘शाहिरी जागर’द्वारे अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 10:52 IST

‘जग बदल घालुनी घाव,’ ‘एका धरतीच्या पोटी,’ ‘भीमसूर्याचा जाळ अण्णा भाऊ’, ‘या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे’, आदी पोवाड्यांतून ‘शाहिरी जागर’ कार्यक्रमाद्वारे शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देजग बदल घालुनी घाव, ‘शाहिरी जागर’द्वारे अण्णा भाऊ साठे यांना अभिवादनशिवाजी विद्यापीठातील कार्यक्रम

कोल्हापूर : ‘जग बदल घालुनी घाव,’ ‘एका धरतीच्या पोटी,’ ‘भीमसूर्याचा जाळ अण्णा भाऊ’, ‘या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे’, आदी पोवाड्यांतून ‘शाहिरी जागर’ कार्यक्रमाद्वारे शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.विद्यापीठाच्या अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने ‘शाहिरी जागर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वि. स. खांडेकर भाषाभवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी इंग्रजी अधिविभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरवदे, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते.

शाहीर देवानंद माळी (सांगली), आझाद नायकवडी (कोल्हापूर), बाबूराव कांबळे (कांडगाव), संजय जाधव (इचलकरंजी), सदाशिव निकम (सिद्धनेर्ली) आणि नूपुर व राजवैष्णवी वायदंडे यांनी ‘शाहिरी जागर’ कार्यक्रमात एकाहून एक सरस असे पोवाडे सादर करून वातावरण भारावून टाकले. उपस्थितांमध्ये शाहीर राजू राऊत, शामराव खडके, विनायक चव्हाण, दिलीप सावंत असे शाहिरी परंपरा समृद्ध करणारे कलावंत होते. त्यामुळे या कार्यक्रमाला उत्तरोत्तर रंगत चढत गेली.डॉ. नायकवडी यांनी शाहिरी मुजऱ्याने सुरवात करून ‘जग बदल घालुनी घाव’, ‘एका धरतीच्या पोटी’ हे पोवाडे सादर करून कार्यक्रमाचा दमदार प्रारंभ केला. त्यानंतर देवानंद माळी यांनी त्यांच्या नेहमीच्या जोशात ‘गण’ आणि अण्णा भाऊंना स्वरचित शाहिरी वंदना अर्पण केली. संजय जाधव यांनी ‘या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे’, ‘शिवारी चला’ सादर केले. सदाशिव निकम यांनी ‘भीमसूर्याचा जाळ अण्णा भाऊ,’ आदी सादर केले. दिवसभरात बाबूराव कांबळे, नूपुर आणि राजवैष्णवी वायदंडे यांनी अत्यंत जोशपूर्ण सादरीकरण केले. अध्यासनाचे प्रमुख तथा मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.

चिरंतन टिकून राहणारे साहित्यसाहित्याच्या सार्वकालिक निकषांवर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य चिरंतन टिकून राहणारे आहे. या साहित्यातील विचारांनी महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यांना जिवंत केले. त्यांनी प्रबोधनात्मक साहित्याची परंपरा निर्माण केली, असे प्रतिपादन डॉ. मेघा पानसरे यांनी येथे केले.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर