शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

जग बदल घालुनी घाव, ‘शाहिरी जागर’द्वारे अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 10:52 IST

‘जग बदल घालुनी घाव,’ ‘एका धरतीच्या पोटी,’ ‘भीमसूर्याचा जाळ अण्णा भाऊ’, ‘या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे’, आदी पोवाड्यांतून ‘शाहिरी जागर’ कार्यक्रमाद्वारे शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देजग बदल घालुनी घाव, ‘शाहिरी जागर’द्वारे अण्णा भाऊ साठे यांना अभिवादनशिवाजी विद्यापीठातील कार्यक्रम

कोल्हापूर : ‘जग बदल घालुनी घाव,’ ‘एका धरतीच्या पोटी,’ ‘भीमसूर्याचा जाळ अण्णा भाऊ’, ‘या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे’, आदी पोवाड्यांतून ‘शाहिरी जागर’ कार्यक्रमाद्वारे शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.विद्यापीठाच्या अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने ‘शाहिरी जागर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वि. स. खांडेकर भाषाभवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी इंग्रजी अधिविभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरवदे, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते.

शाहीर देवानंद माळी (सांगली), आझाद नायकवडी (कोल्हापूर), बाबूराव कांबळे (कांडगाव), संजय जाधव (इचलकरंजी), सदाशिव निकम (सिद्धनेर्ली) आणि नूपुर व राजवैष्णवी वायदंडे यांनी ‘शाहिरी जागर’ कार्यक्रमात एकाहून एक सरस असे पोवाडे सादर करून वातावरण भारावून टाकले. उपस्थितांमध्ये शाहीर राजू राऊत, शामराव खडके, विनायक चव्हाण, दिलीप सावंत असे शाहिरी परंपरा समृद्ध करणारे कलावंत होते. त्यामुळे या कार्यक्रमाला उत्तरोत्तर रंगत चढत गेली.डॉ. नायकवडी यांनी शाहिरी मुजऱ्याने सुरवात करून ‘जग बदल घालुनी घाव’, ‘एका धरतीच्या पोटी’ हे पोवाडे सादर करून कार्यक्रमाचा दमदार प्रारंभ केला. त्यानंतर देवानंद माळी यांनी त्यांच्या नेहमीच्या जोशात ‘गण’ आणि अण्णा भाऊंना स्वरचित शाहिरी वंदना अर्पण केली. संजय जाधव यांनी ‘या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे’, ‘शिवारी चला’ सादर केले. सदाशिव निकम यांनी ‘भीमसूर्याचा जाळ अण्णा भाऊ,’ आदी सादर केले. दिवसभरात बाबूराव कांबळे, नूपुर आणि राजवैष्णवी वायदंडे यांनी अत्यंत जोशपूर्ण सादरीकरण केले. अध्यासनाचे प्रमुख तथा मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.

चिरंतन टिकून राहणारे साहित्यसाहित्याच्या सार्वकालिक निकषांवर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य चिरंतन टिकून राहणारे आहे. या साहित्यातील विचारांनी महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यांना जिवंत केले. त्यांनी प्रबोधनात्मक साहित्याची परंपरा निर्माण केली, असे प्रतिपादन डॉ. मेघा पानसरे यांनी येथे केले.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर