शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

आराखडे, सादरीकरण झाले पण उड्डाणपूल हवेतच राहिले, कोल्हापुरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जैसे-थे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 12:16 IST

शहरात गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची वाहने, तसेच आसपासच्या ग्रामीण भागातून येणारी वाहने याचा अतिरिक्त ताण

भारत चव्हाण

कोल्हापूर : वाहतुकीच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी सन २०१७ मध्ये युती सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहराच्या गर्दीच्या भागात पाच उड्डाणपूल उभारण्याचे आराखडे तयार केले, परंतु गेल्या पाच वर्षांत या आराखड्यावर कसलीच चर्चा झाली नाही. ज्यांच्या सूचनेवरून उड्डाणपुलाचे आराखडे झाले, त्या चंद्रकांत पाटील यांच्याकडून नंतर दुर्लक्ष झाले. महाविकास आघाडीचेही दुर्लक्ष झाले. त्यामुळे उड्डाणपूल हवेतच राहिले.

कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती, खासगीकरणातून विकासकामे करण्यास होणार विरोध लक्षात घेऊन, युती सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरात गर्दीच्या ठिकाणी पाच उड्डाणपूल उभारण्यासाठी आर्किटेक्ट संदीप गुरव यांना आराखडे बनविण्यास सांगितले होते. त्यांनी दिवसरात्र काम करून ते आराखडे तयार केले. त्याचे एकदा सादरीकरण झाले, पण नंतर सर्व आराखडे कपाटबंद राहिले आणि उड्डाणपूल हवेतच विरले.

शहरात गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. शहरावर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची वाहने, तसेच आसपासच्या ग्रामीण भागातून येणारी वाहने याचा अतिरिक्त ताण प्रचंड आहे. शहराभोवतीचा रिंग रोडही झालेले नाही. त्यामुळे पुणे, सोलापूर, सांगली, तसेच उत्तर कर्नाटकातून येणारी सर्व वाहने कोल्हापूर शहरातूनच खाली कोकणात जातात. त्याचा परिणाम म्हणून शहरात कोणत्याही भागात गेलात, तरी लहान रस्ते, वाढलेली अतिक्रमणे, वाहतुकीची कोंडी, पार्किंग यांसारखे गंभीर प्रश्न तयार झाले आहेत.

भविष्यकाळाचा विचार करता, पुढील काही वर्षांत आणखी वाहनांची संख्या वाढून वाहतुकीचा प्रश्न अधिकच गंभीर होणार आहे. म्हणूनच आहे त्याच रस्त्यांचा जास्तीतजास्त उपयोग करून घ्यायचा असेल, तर उड्डाणपुलाशिवाय दुसरा पर्याय नाही. कोणताही विकास करण्याआधी वाहतुकीच्या समस्येला सर्वाधिक प्राधान्य देण्यावर विचार आणि निधीची तरतूद करावी लागणार आहे.पाचही उड्डाणपूल एकदम होणार नसले, तरी अत्यावश्यक असलेल्या ठिकाणी एखादा तरी उड्डाणपूल, रिंग रोड करण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील असोत की, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर असोत, दोघेही निधी आणण्यात तरबेज आहेत, पण त्यांनी एकदा या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

असे होते उड्डाणपुलाचे आराखडे 

- दाभोळकर कॉर्नर ते जनता बझार चौक - लांबी १५०, रुंदी ८ मीटर

- दाभोळकर चौक ते दसरा चौक - लांबी - लांबी २०००, रुंदी ८ मीटर

- जोतिबा हॉटेल ते कावळा नाका चौक - लांबी २०००, रुंदी आठ मीटर

- टाउन हॉल ते जयंती नाला - लांबी ८००, रुंदी, ८ मीटर

- पापाची तिकटी ते रंकाळा टॉवर - लांबी २,००० मीटर, रुंदी आठ मीटर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडी