शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आराखडे, सादरीकरण झाले पण उड्डाणपूल हवेतच राहिले, कोल्हापुरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जैसे-थे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 12:16 IST

शहरात गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची वाहने, तसेच आसपासच्या ग्रामीण भागातून येणारी वाहने याचा अतिरिक्त ताण

भारत चव्हाण

कोल्हापूर : वाहतुकीच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी सन २०१७ मध्ये युती सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहराच्या गर्दीच्या भागात पाच उड्डाणपूल उभारण्याचे आराखडे तयार केले, परंतु गेल्या पाच वर्षांत या आराखड्यावर कसलीच चर्चा झाली नाही. ज्यांच्या सूचनेवरून उड्डाणपुलाचे आराखडे झाले, त्या चंद्रकांत पाटील यांच्याकडून नंतर दुर्लक्ष झाले. महाविकास आघाडीचेही दुर्लक्ष झाले. त्यामुळे उड्डाणपूल हवेतच राहिले.

कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती, खासगीकरणातून विकासकामे करण्यास होणार विरोध लक्षात घेऊन, युती सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरात गर्दीच्या ठिकाणी पाच उड्डाणपूल उभारण्यासाठी आर्किटेक्ट संदीप गुरव यांना आराखडे बनविण्यास सांगितले होते. त्यांनी दिवसरात्र काम करून ते आराखडे तयार केले. त्याचे एकदा सादरीकरण झाले, पण नंतर सर्व आराखडे कपाटबंद राहिले आणि उड्डाणपूल हवेतच विरले.

शहरात गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. शहरावर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची वाहने, तसेच आसपासच्या ग्रामीण भागातून येणारी वाहने याचा अतिरिक्त ताण प्रचंड आहे. शहराभोवतीचा रिंग रोडही झालेले नाही. त्यामुळे पुणे, सोलापूर, सांगली, तसेच उत्तर कर्नाटकातून येणारी सर्व वाहने कोल्हापूर शहरातूनच खाली कोकणात जातात. त्याचा परिणाम म्हणून शहरात कोणत्याही भागात गेलात, तरी लहान रस्ते, वाढलेली अतिक्रमणे, वाहतुकीची कोंडी, पार्किंग यांसारखे गंभीर प्रश्न तयार झाले आहेत.

भविष्यकाळाचा विचार करता, पुढील काही वर्षांत आणखी वाहनांची संख्या वाढून वाहतुकीचा प्रश्न अधिकच गंभीर होणार आहे. म्हणूनच आहे त्याच रस्त्यांचा जास्तीतजास्त उपयोग करून घ्यायचा असेल, तर उड्डाणपुलाशिवाय दुसरा पर्याय नाही. कोणताही विकास करण्याआधी वाहतुकीच्या समस्येला सर्वाधिक प्राधान्य देण्यावर विचार आणि निधीची तरतूद करावी लागणार आहे.पाचही उड्डाणपूल एकदम होणार नसले, तरी अत्यावश्यक असलेल्या ठिकाणी एखादा तरी उड्डाणपूल, रिंग रोड करण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील असोत की, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर असोत, दोघेही निधी आणण्यात तरबेज आहेत, पण त्यांनी एकदा या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

असे होते उड्डाणपुलाचे आराखडे 

- दाभोळकर कॉर्नर ते जनता बझार चौक - लांबी १५०, रुंदी ८ मीटर

- दाभोळकर चौक ते दसरा चौक - लांबी - लांबी २०००, रुंदी ८ मीटर

- जोतिबा हॉटेल ते कावळा नाका चौक - लांबी २०००, रुंदी आठ मीटर

- टाउन हॉल ते जयंती नाला - लांबी ८००, रुंदी, ८ मीटर

- पापाची तिकटी ते रंकाळा टॉवर - लांबी २,००० मीटर, रुंदी आठ मीटर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडी