शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

‘अमृत योजने’ला वारणाकाठचा विरोधच

By admin | Updated: June 25, 2016 00:45 IST

जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन : लोकप्रतिनिधींनी नागरिकांचे म्हणणे ऐकण्याची गरज

भालचंद्र नांद्रेकर -- दानोळी शिरोळ तालुक्याच्या उत्तर भागाला व हातकणंगले तालुक्यातील अनेक गावांना, तसेच सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना मुख्य जलवाहिनी म्हणून वारणा नदीची ओळख आहे़ दानोळी (ता़ शिरोळ) येथील वारणा नदीतून इचलकरंजीला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेला अंतिम मंजुरी मिळाली आहे़ मात्र, अमृत योजनेच्या विरोधासाठी दोनवेळा गावे बंद करून शासनाचा निषेध नोंदवला आहे़ अशा परिस्थितीत या योजनेला अंतिम मंजुरी मिळाली असली तरी वारणाकाठावरील नागरिकांना विश्वासात घेऊन बैठक आयोजित करण्याची गरज निर्माण झाली आहे़ गेल्या चार महिन्यांपूर्वी दानोळी येथे अमृत योजनेच्या विरोधात वारणा बचाव कृती समितीची स्थापना केली आहे़ यावेळी प्रथम दानोळी गाव बंद ठेवून शासनाचा निषेध केला होता़ तरीही शासनाने दखल न घेतल्यामुळे शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील व सांगली जिल्ह्यातील गावे एकजुटीने बंद ठेवून दुसऱ्यांदा शासनाला जाग आणली होती़ यातून कोणताही तोडगा यावर निघाला नसताना अमृत योजनेला मान्यता मिळाली आहे़ वारणाकाठावरील शेतकरी व नव्याने समाविष्ट झालेले धरणग्रस्त शेतकरी वारणेच्या पाण्यावर आपले जीवन जगत आहेत़ यामुळे त्यांच्या पाण्याचा प्रश्न सर्वप्रथम मिटविणे ही कायदेशीर जबाबदारी आहे़ येथील शेतकरी व धरणग्रस्तांशिवाय इतर कोणालाही वारणेचे पाणी दिले जाणार नाही, असे मत श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ़ भारत पाटणकर यांनी व्यक्त केले होते़ इचलकरंजीला ७१ कोटींची अमृत योजना मंजूर झाली आहे़ तरी याला वारणा काठावरून विरोध होत आहे़ सध्या इचलकरंजी शहरालगत पंचगंगा नदी असून, या नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे़ बस्तवाड येथून कृष्णा नदीतून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा होतो़ त्यामुळे लोकप्रतिनिधींनी नागरिकांना विश्वासात घेऊन योजना पूर्ववत करण्याची गरज आहे़ आमदार सुरेश हाळवणकर यांनी इचलकरंजीच्या अमृत योजनेला अंतिम टप्प्यातील मंजुरी आणली असली तरी ही योजना वारणाकाठावरील नागरिक मिळून हाणून पाडू. तसेच येत्या आठवड्याभरात वारणा काठावरील सर्व गावांतून अमृत योजनेच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना ठराव देणार असून, या योजनेला आमचा कायम विरोध राहणार आहे़- महादेव धनवडे, वारणा बचाव कृती समिती कार्यकर्ते.