शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
3
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
4
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
5
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
6
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
8
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
9
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
10
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
11
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
12
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
13
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
14
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
15
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
16
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
17
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
18
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
19
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
20
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

‘अमृत योजने’ला वारणाकाठचा विरोधच

By admin | Updated: June 25, 2016 00:45 IST

जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन : लोकप्रतिनिधींनी नागरिकांचे म्हणणे ऐकण्याची गरज

भालचंद्र नांद्रेकर -- दानोळी शिरोळ तालुक्याच्या उत्तर भागाला व हातकणंगले तालुक्यातील अनेक गावांना, तसेच सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना मुख्य जलवाहिनी म्हणून वारणा नदीची ओळख आहे़ दानोळी (ता़ शिरोळ) येथील वारणा नदीतून इचलकरंजीला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेला अंतिम मंजुरी मिळाली आहे़ मात्र, अमृत योजनेच्या विरोधासाठी दोनवेळा गावे बंद करून शासनाचा निषेध नोंदवला आहे़ अशा परिस्थितीत या योजनेला अंतिम मंजुरी मिळाली असली तरी वारणाकाठावरील नागरिकांना विश्वासात घेऊन बैठक आयोजित करण्याची गरज निर्माण झाली आहे़ गेल्या चार महिन्यांपूर्वी दानोळी येथे अमृत योजनेच्या विरोधात वारणा बचाव कृती समितीची स्थापना केली आहे़ यावेळी प्रथम दानोळी गाव बंद ठेवून शासनाचा निषेध केला होता़ तरीही शासनाने दखल न घेतल्यामुळे शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील व सांगली जिल्ह्यातील गावे एकजुटीने बंद ठेवून दुसऱ्यांदा शासनाला जाग आणली होती़ यातून कोणताही तोडगा यावर निघाला नसताना अमृत योजनेला मान्यता मिळाली आहे़ वारणाकाठावरील शेतकरी व नव्याने समाविष्ट झालेले धरणग्रस्त शेतकरी वारणेच्या पाण्यावर आपले जीवन जगत आहेत़ यामुळे त्यांच्या पाण्याचा प्रश्न सर्वप्रथम मिटविणे ही कायदेशीर जबाबदारी आहे़ येथील शेतकरी व धरणग्रस्तांशिवाय इतर कोणालाही वारणेचे पाणी दिले जाणार नाही, असे मत श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ़ भारत पाटणकर यांनी व्यक्त केले होते़ इचलकरंजीला ७१ कोटींची अमृत योजना मंजूर झाली आहे़ तरी याला वारणा काठावरून विरोध होत आहे़ सध्या इचलकरंजी शहरालगत पंचगंगा नदी असून, या नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे़ बस्तवाड येथून कृष्णा नदीतून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा होतो़ त्यामुळे लोकप्रतिनिधींनी नागरिकांना विश्वासात घेऊन योजना पूर्ववत करण्याची गरज आहे़ आमदार सुरेश हाळवणकर यांनी इचलकरंजीच्या अमृत योजनेला अंतिम टप्प्यातील मंजुरी आणली असली तरी ही योजना वारणाकाठावरील नागरिक मिळून हाणून पाडू. तसेच येत्या आठवड्याभरात वारणा काठावरील सर्व गावांतून अमृत योजनेच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना ठराव देणार असून, या योजनेला आमचा कायम विरोध राहणार आहे़- महादेव धनवडे, वारणा बचाव कृती समिती कार्यकर्ते.