शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अमृत योजना होऊ देणार नाही : कुरुंदवाडला सर्वपक्षीय बैठकीत इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:29 IST

कुरुंदवाड : वारणा धरणाची निर्मिती शेतीसाठी आहे. ३३ टक्के शेती अद्यापही सिंचनाखाली नाही.संपूर्ण शेती सिंचनाखाली आल्यास आहे तेच पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे

कुरुंदवाड : वारणा धरणाची निर्मिती शेतीसाठी आहे. ३३ टक्के शेती अद्यापही सिंचनाखाली नाही. संपूर्ण शेती सिंचनाखाली आल्यास आहे तेच पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत इचलकरंजीची अमृत योजना होऊ देणार नाही. त्यासाठी कितीही बळी द्यावे लागले तरी चालेल, असा इशारा वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे यांनी दिला.येथील कृष्णा-पंचगंगा संगम घाटावर आमदार उल्हास पाटील यांनी वारणा बचाव व नदी प्रदूषण हटाव मोहीमेसाठी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत धनवडे बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार उल्हास पाटील होते. तर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, जयसिंगपूर नगराध्यक्ष डॉ. नीता माने, कुरुंदवाड नगराध्यक्ष जयराम पाटील, जि. प. सदस्य विजय भोजे प्रमुख उपस्थित होते. वारणाप्रश्नी ठोस निर्णय घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते.

धनवडे म्हणाले, शहराला दोन नद्यांच्या योजना असताना वारणेची योजना कशाला पाहिजे, मागणी नसतानाही विकासाच्या नावाखाली ही योजना मंजूर करण्यामागे गौडबंगाल काय? या योजनेने पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार असेल तर विकास होऊन काय करावयाचे.

आमदार पाटील म्हणाले, वारणेतून आठ टीएमसी पाणी कृष्णेत येते; हेच पाणी इचलकरंजीला मिळत असल्याने वारणेच्या योजनेची गरजच काय? या नव्या योजनेवर खर्च करण्यापेक्षा तोच निधी पंचगंगा नदी प्रदूषणावर खर्च केल्यास पाण्याचा प्रश्न निकाली लागणार आहे. पाणी कमी पडत असेल तर कृष्णेतून आणखी एक योजना करा, मात्र वारणेतून एक थेंबही पाणी मिळणार नाही, असे सांगत आमदार पाटील यांनी हाळवणकरांनी जिल्ह्याचा इतिहास मला शिकवू नये. प्रथम त्यांनी भूगोलाचा अभ्यास करावा, असा टोला देत दडपशाही केल्यास शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी वारणा बचाव व नदी प्रदूषणमुक्तीसाठी शिरोळ तालुक्याबरोबर असल्याचे सांगितले. यावेळी अमृत योजना रद्द होईपर्यंत व पंचगंगा-कृष्णा नदी प्रदूषणमुक्त होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

जि. प. सदस्य विजय भोजे, प्रसाद धर्माधिकारी, कुरुंदवाड अर्बन बँकेचे अध्यक्ष अरुण आलासे, अमरसिंह पाटील, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, जयसिंगपूर नगराध्यक्ष डॉ. नीता माने यांची भाषणे झाली. बैठकीस पं. स. सभापती मीनाक्षी कुरडे, बाबासो सावगावे, बांधकाम सभापती प्रा. सुनील चव्हाण, सुरेश कांबळे, आप्पासो चौगुले, दीपक कोळी, धनाजी चुडमुंगे, उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, दत्तात्रय कुलकर्णी यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दिलीप पाटील यांनी आभार मानले.कुरुंदवाड येथे कृष्णा-पंचगंगा संगम घाटावर सर्वपक्षीय बैठकीत माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे भाषण झाले. यावेळी जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉ. नीता माने, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, महादेव धनवडे, आमदार उल्हास पाटील, दिलीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी