शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

पॅकेजची रक्कम ३० जूनपूर्वी

By admin | Updated: June 7, 2015 01:25 IST

चंद्रकांतदादांचे आश्वासन : बुधवारी मुख्यमंत्र्यांनी बोलाविली तातडीची बैठक

कोल्हापूर : राज्यातील शेतकरी व साखर कारखान्यांची आर्थिक परवड पाहून त्यांना दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची आम्ही घोषणा केली आहे. हे पॅकेज देणारच आहोत; पण काही तांत्रिक अडचणी सोडविण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करीत आहोत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. १०) सर्व विभागांच्या सचिवांची तातडीची बैठक बोलाविली असून, यामध्ये पॅकेजचा निर्णय होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ३० जूनपूर्वी पॅकेजची रक्कम कारखान्यांच्या खात्यांवर जमा होईल, असे आश्वासन सहकारमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चाला दिले. दोन हजार कोटींच्या पॅकेजबाबत राष्ट्रवादीने शनिवारी कोल्हापुरात मोर्चा काढला. यावेळी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाबरोबर मंत्री पाटील यांनी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, एफआरपीप्रमाणे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. केवळ कोल्हापुरातील कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे पैसे दिल्याने तुम्हाला अभिमान वाटायला हवा. दादा, तुमच्या शब्दाला वजन आहे. ‘भाजप’चे राष्ट्रीय अध्यक्ष कोल्हापुरात येतात. त्यामुळे तुम्ही पॅकेजचा शब्द टाकला की, तो केंद्राने झेलला पाहिजे. तुम्ही आडनावाने पाटील आहात, दणका द्या. ‘आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात’, याचे भान ठेवा, असा टोला हाणत, तुम्ही विरोधात असताना आंदोलन करत होता आम्ही कधीही त्याला विरोध केला नाही. दादा, तुम्ही वैयक्तिक घेऊ नका. घोषणा केल्याप्रमाणे कारखान्यांना विनाअट पैसे देऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसा, असे मुश्रीफ यांनी सांगितले. यावर बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, पॅकेज देण्यास विलंब झाला, हे मान्य आहे. तांत्रिक अडचणी आहेत. यासाठी बुधवारी (दि. १०) वित्त, सहकार, कृषी यांसह सर्व सचिवांना मुख्यमंत्र्यांनी बोलावले आहे. पैसे थेट ट्रेझरीमधून उभे करायचे, खुल्या बाजारातून घ्यायचे, की कारखान्यांच्या कर्जाला शासकीय हमी द्यायची, अशा विविध पर्यायांची चाचपणी सुरू आहे. राज्याने बफर स्टॉक केला, तर उत्तर प्रदेशची साखर मोठ्या प्रमाणात बाजारात येईल. परिणामी, दर पुन्हा घसरतील. यासाठी केंद्रानेच बफर स्टॉक करणे गरजेचे आहे. पवारसाहेबांचा मात्रा चाललाच नाही साखर कारखानदारीला मदत मिळावी, यासाठी आठवेळा केंद्राच्या पातळीवर प्रयत्न केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पॅकेजमधील काही रक्कम केंद्राकडून मिळेल, असे वाटत होते; पण पवार साहेबांचाही मात्रा चालला नसल्याचा चिमटा मंत्री पाटील यांनी काढला. प्रसिद्धीसाठी राष्ट्रवादीची धडपड कोल्हापुरात आंदोलनाची नवीन पद्धत, ट्रेंड पडेल त्याचबरोबर कॉलनीत सामान्य माणसे राहतात, त्यांना नाहक त्रास होईल यासाठीच मोर्चाला विरोध केला. तरीही राष्ट्रवादीने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, नवीन केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही, असा टोला हाणत नवीन असल्याने विरोधी पक्षाची भूमिका अजून तुम्हाला समजलेली नाही; पण जरा अंदाज घेऊन आंदोलने करा, असा सल्लाही मंत्री पाटील यांनी दिला. ‘एफआरपी’ दिली नाही तर कारवाईच विनाअट पॅकेज देणार नाही. राज्यातील ऊस उत्पादकांचे ३८०० कोटी देणे आहे, त्यातील आम्ही दोन हजार कोटी देत आहोत. उर्वरित १८०० कोटी कारखाने कसे देणार, याविषयी हमी मागणारच. पॅकेज देऊनही एफआरपीप्रमाणे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत, तर त्या कारखान्यांवर कारवाई करणारच, असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला.