शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीसाठी २२ पासून आमरण उपोषण

By admin | Updated: August 15, 2016 00:50 IST

हद्दवाढ कृती समितीचा इशारा : महापालिकेसमोर धरणे; दोन एमआयडीसींसह १८ गावांच्या हद्दवाढीच्या अधिसूचनेची मागणी

कोल्हापूर : राज्य शासनाने हद्दवाढीबाबत तातडीने अधिसूचना काढावी, अन्यथा २२ आॅगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्यावतीने देण्यात आला. महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. १८ गावे आणि दोन एमआयडीसी यांचा हद्दवाढीमध्ये समावेश करावा अन्यथा ४-५ गावांना घेऊन आम्हाला हद्दवाढ नको, असाही इशारा यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या भाषणात दिला. महापौर अश्विनी रामाणे म्हणाल्या, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी हद्दवाढीबाबत सकारात्मक पावले उचलली आहेत. लोकप्रतिनिधींनी ग्रामीण जनतेची दिशाभूल थांबवावी. महानगरपालिका विकासात्मक कामे करते, शहरासह परिसरातील ग्रामीण भागालाही सुविधा पुरवते. कराची भीती ग्रामीण जनतेने बाळगण्याची गरज नाही, कारण कर हा सात वर्षांनंतर टप्प्या-टप्प्याने लागणार आहे. येत्या दोन-चार दिवसांत मुख्यमंत्री आणि पालकमंत्री पुन्हा बैठक घेऊन आश्वासनाप्रमाणे हद्दवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. धरणे आंदोलनस्थळी सर्व आंदोलकांनी डोक्यावर टोप्या घातल्या होत्या, त्यावर ‘हद्दवाढ झालीच पाहिजे’ असा मजकूर होता. या बैठकीत, पक्षांच्या नेत्यांनी भाषणात, आमरण उपोषणास बसणार असल्याचे जाहीर केले. कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, हद्दवाढीसाठी १८ गावे, २ एमआयडीसी आवश्यकच आहेत, पाच-सहा गावांची हद्दवाढ आमच्यावर लादू नका, हद्दवाढीबाबत तातडीने अधिसूचना काढा, अन्यथा २२ आॅगस्टपासून सर्व पक्षांचे कार्यकर्ते आमरण उपोषण करतील. हद्दवाढ ही काळाची गरज आहे, ग्रामीण गावे शहरात आली तर त्यांचे राहणीमान सुधारणार आहे, असे ‘क्रिडाई’चे अध्यक्ष महेश यादव म्हणाले. तिन्हीही आमदारांच्या सुविधा बंद करा ४हद्दवाढीबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास येत्या डिसेंबरच्या अधिवेशनात पुन्हा आमरण उपोषण करणार असून कोणाचेही ऐकणार नाही. ४पालकमंत्री चंद्रकांतदादांनी ‘शब्द’ दिल्याने उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री हे हद्दवाढीबाबत सकारात्मक आहेत, हद्दवाढीशिवाय शहराचा विकास नाही. ४शहरात राहून हद्दवाढीला विरोध करणाऱ्या आमदारांच्या सुविधा बंद कराव्यात. त्याशिवाय त्यांना हद्दवाढीचे महत्त्व समजणार नाही. ४हद्दवाढीनंतर विकासासाठी मोठा निधी मिळणार आहे. त्यामुळे हद्दवाढ आवश्यकच आहे, असे आमदार क्षीरसागर म्हणाले. संवाद-प्रतिसंवाद हवा हद्दवाढीबाबत ग्रामीणचे लोकप्रतिनिधी जनतेची दिशाभूल करत आहेत. यासाठी ग्रामस्थांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी एका व्यासपीठावर यावे, समोरासमोरच संवाद-प्रतिसंवाद करावा, त्यातून दोन्हीकडील प्रश्न-उत्तरातून समोरासमोर समज-गैरसमज दूर होतील. ग्रामीण आणि शहरी असा संघर्ष नको आहे. मुख्यमंत्र्यांनी संभ्रमावस्था सोडावी हद्दवाढीचा निर्णय घेताना मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री पाटील यांनी संभ्रमावस्था सोडून निर्णय घ्यावा. शासकीय अहवालाच्या निकषावर निर्णय घ्यावेत, असेही आवाहन अ‍ॅड. महादेवराव आडगुळे यांनी केले. सर्वपक्षीय कार्यकर्ते बैठकीत भाजपचे महेश जाधव, नगरसेवक भूपाल शेटे, बी. एल. बर्गे, लालासाहेब गायकवाड, सतीशचंद्र कांबळे आदींनीही मते मांडली. उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, परिवहन सभापती लाला भोसले, महिला व बालकल्याण सभापती वृषाली कदम, दीपा पाटील, बाबा पार्टे, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.