शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

शुद्धिकरण यंत्रणेतील बिघाडामुळे ‘अंबाई’ तलाव पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:22 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्या रंकाळा तलावालगतच्या अंबाई जलतरण तलावाची पाणी शुद्धिकरण यंत्रणा पुन्हा एकदा बंद पडली आहे. खिशाला परवडणाऱ्या तिकिटामध्ये पोहण्याचा सराव करण्यासाठी या तलावाचा सर्वसामान्य जलतरणपटूंना एकमेव आधार आहे. वारंवार बंद पडणाऱ्या शुद्धिकरण यंत्रणेमुळे जलतरणपटूंसह पालकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.

ठळक मुद्देशुद्धिकरण यंत्रणेतील बिघाडामुळे ‘अंबाई’ तलाव पुन्हा बंदजलतरणपटूंची गैरसोय; वारंवार बिघडणारी यंत्रणा बदलण्याची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या रंकाळा तलावालगतच्या अंबाई जलतरण तलावाची पाणी शुद्धिकरण यंत्रणा पुन्हा एकदा बंद पडली आहे. खिशाला परवडणाऱ्या तिकिटामध्ये पोहण्याचा सराव करण्यासाठी या तलावाचा सर्वसामान्य जलतरणपटूंना एकमेव आधार आहे. वारंवार बंद पडणाऱ्या शुद्धिकरण यंत्रणेमुळे जलतरणपटूंसह पालकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.शहरातील सर्वांत कमी दर असणारा आणि सर्वसामान्य जलतरणपटूंचा एकमेव आधार असणारा हा तलाव आहे. उन्हाळी व दिवाळी सुट्ट्यांमध्ये या तलावावर भरगच्च गर्दी असते. तासाला २० रुपये असा या जलतरण तलावाचा दर आहे; त्यामुळे तो वर्षातील सर्व महिने गर्दीचा असतो.

सध्या त्याची शुद्धिकरण यंत्रणा (फिल्टरेशन प्लँट) कुचकामी आहे. दिवसातील १० तासांपेक्षा अधिक काळ शुद्धिकरणाची मोटर सुरू ठेवावी लागते. तरीही हा तलाव पूर्णत: शुद्ध होत नाही. पोहणाऱ्यांची संख्या आणि ४० वर्षांपूर्वीची तलावाची शुद्धिकरण यंत्रणा यांचा ताळमेळ बसत नसल्याने यंत्रणेत वारंवार बिघाड ठरलेलाच असतो.

२० ते ३० जूनदरम्यान पाणी प्रदूषित झाले म्हणून तलाव बंद करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा त्यातील पाणी दुर्गंधीयुक्त व हिरवेगार दिसू लागले आहे; त्यामुळे तलाव १७ जुलैपासून पुन्हा सुरू झाला. त्यानंतर आता २३ आॅगस्टपासून हा शुद्धिकरण यंत्रणेतील ‘बॅकवॉश पंप’ नादुरुस्त झाल्याने तलाव गेल्या १० दिवसांपासून बंद ठेवण्यात आला आहे.

सद्य:स्थितीत पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा पंप दुरुस्त करून बसविला आहे; मात्र तलावातील पूर्ण पाणी शुद्धिकरण होण्यासाठी अजूनही चार दिवसांचा कालावधी लागणार असल्याने बुधवारी (दि. ४ सप्टेंबर) पासून तो पूर्ववत होण्याची शक्यता आहे.ही यंत्रणा बदलामहापालिकेचा वर्षातील सहा महिने गर्दीचा एकमेव तलाव असून त्याकडे पोहणाऱ्या अबालवृद्धांचा ओढा अधिक आहे. त्यात ४० वर्षांपूर्वीची शुद्धिकरण यंत्रणा तिच्या कालमर्यादेनुसारवारंवार बिघडते. तरीही येथील कर्मचारी ती रात्रीचा दिवस करून पुन्हा पूर्ववत करतात. प्रशासनाने तलावातील शुद्धिकरण यंत्रणाच नवीन बसवून हा तलाव कायमस्वरूपी पोहण्यासाठी खुला करावा व स्पर्धेची तयारी करणाºया जलतरणपटूंची गैरसोय टाळावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

 

 

टॅग्स :Swimmingपोहणेkolhapurकोल्हापूर