शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

शुद्धिकरण यंत्रणेतील बिघाडामुळे ‘अंबाई’ तलाव पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:22 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्या रंकाळा तलावालगतच्या अंबाई जलतरण तलावाची पाणी शुद्धिकरण यंत्रणा पुन्हा एकदा बंद पडली आहे. खिशाला परवडणाऱ्या तिकिटामध्ये पोहण्याचा सराव करण्यासाठी या तलावाचा सर्वसामान्य जलतरणपटूंना एकमेव आधार आहे. वारंवार बंद पडणाऱ्या शुद्धिकरण यंत्रणेमुळे जलतरणपटूंसह पालकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.

ठळक मुद्देशुद्धिकरण यंत्रणेतील बिघाडामुळे ‘अंबाई’ तलाव पुन्हा बंदजलतरणपटूंची गैरसोय; वारंवार बिघडणारी यंत्रणा बदलण्याची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या रंकाळा तलावालगतच्या अंबाई जलतरण तलावाची पाणी शुद्धिकरण यंत्रणा पुन्हा एकदा बंद पडली आहे. खिशाला परवडणाऱ्या तिकिटामध्ये पोहण्याचा सराव करण्यासाठी या तलावाचा सर्वसामान्य जलतरणपटूंना एकमेव आधार आहे. वारंवार बंद पडणाऱ्या शुद्धिकरण यंत्रणेमुळे जलतरणपटूंसह पालकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.शहरातील सर्वांत कमी दर असणारा आणि सर्वसामान्य जलतरणपटूंचा एकमेव आधार असणारा हा तलाव आहे. उन्हाळी व दिवाळी सुट्ट्यांमध्ये या तलावावर भरगच्च गर्दी असते. तासाला २० रुपये असा या जलतरण तलावाचा दर आहे; त्यामुळे तो वर्षातील सर्व महिने गर्दीचा असतो.

सध्या त्याची शुद्धिकरण यंत्रणा (फिल्टरेशन प्लँट) कुचकामी आहे. दिवसातील १० तासांपेक्षा अधिक काळ शुद्धिकरणाची मोटर सुरू ठेवावी लागते. तरीही हा तलाव पूर्णत: शुद्ध होत नाही. पोहणाऱ्यांची संख्या आणि ४० वर्षांपूर्वीची तलावाची शुद्धिकरण यंत्रणा यांचा ताळमेळ बसत नसल्याने यंत्रणेत वारंवार बिघाड ठरलेलाच असतो.

२० ते ३० जूनदरम्यान पाणी प्रदूषित झाले म्हणून तलाव बंद करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा त्यातील पाणी दुर्गंधीयुक्त व हिरवेगार दिसू लागले आहे; त्यामुळे तलाव १७ जुलैपासून पुन्हा सुरू झाला. त्यानंतर आता २३ आॅगस्टपासून हा शुद्धिकरण यंत्रणेतील ‘बॅकवॉश पंप’ नादुरुस्त झाल्याने तलाव गेल्या १० दिवसांपासून बंद ठेवण्यात आला आहे.

सद्य:स्थितीत पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा पंप दुरुस्त करून बसविला आहे; मात्र तलावातील पूर्ण पाणी शुद्धिकरण होण्यासाठी अजूनही चार दिवसांचा कालावधी लागणार असल्याने बुधवारी (दि. ४ सप्टेंबर) पासून तो पूर्ववत होण्याची शक्यता आहे.ही यंत्रणा बदलामहापालिकेचा वर्षातील सहा महिने गर्दीचा एकमेव तलाव असून त्याकडे पोहणाऱ्या अबालवृद्धांचा ओढा अधिक आहे. त्यात ४० वर्षांपूर्वीची शुद्धिकरण यंत्रणा तिच्या कालमर्यादेनुसारवारंवार बिघडते. तरीही येथील कर्मचारी ती रात्रीचा दिवस करून पुन्हा पूर्ववत करतात. प्रशासनाने तलावातील शुद्धिकरण यंत्रणाच नवीन बसवून हा तलाव कायमस्वरूपी पोहण्यासाठी खुला करावा व स्पर्धेची तयारी करणाºया जलतरणपटूंची गैरसोय टाळावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

 

 

टॅग्स :Swimmingपोहणेkolhapurकोल्हापूर