शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अंबाबाई मंदिर ‘देवस्थान’कडेच असावे राजेश क्षीरसागर : मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:18 IST

कोल्हापूर : पश्चिम महाष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित असलेल्या मंदिरांपैकी अंबाबाई मंदिरच प्रमुख मंदिर आहे, तेच समितीच्या हातून गेले तर काहीच अर्थ राहणार नाही, त्यामुळे मंदिराचे सर्वाधिकार ‘देवस्थान’च्याच अंतर्गत ठेवून केवळ व्यवस्थापनासाठी स्वतंत्र समिती नेमावी यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी सांगितले.यासाठी ते मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र ...

कोल्हापूर : पश्चिम महाष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित असलेल्या मंदिरांपैकी अंबाबाई मंदिरच प्रमुख मंदिर आहे, तेच समितीच्या हातून गेले तर काहीच अर्थ राहणार नाही, त्यामुळे मंदिराचे सर्वाधिकार ‘देवस्थान’च्याच अंतर्गत ठेवून केवळ व्यवस्थापनासाठी स्वतंत्र समिती नेमावी यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी सांगितले.

यासाठी ते मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटणार आहेत.अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीचे विधेयक बुधवारी विधानसभा व विधान परिषदेत मंजूर करण्यात आले. मात्र, या विधेयकात अंबाबाई मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीपासून स्वतंत्र करण्यात आले असून, त्यासाठी स्वतंत्र समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे. विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल त्या दिवसापासून अंबाबाई मंदिर, देवीची संपत्ती, ठेवी, जमिनी, कागदपत्रे या सगळ्यांवरचे देवस्थान समितीचे अधिकार संपुष्टात येऊन त्याचे सर्व हक्क नूतन समितीकडे हस्तांतरित होणार आहेत.

देवस्थानला अंबाबाई मंदिरातूनच सर्वाधिक उत्पन्न मिळते. जोतिबा मंदिरासह अन्य मंदिरांचे व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचा पगार हा सगळा खर्च याच उत्पन्नातून केला जातो. त्यामुळे हे मंदिर जर समितीच्या हातून गेले तर ‘देवस्थान’च्या तिजोरीत ठणठणाठ असणार आहे. त्यामुळे मंदिर देवस्थानच्याच अखत्यारित असावे यासाठी आमदार राजेश क्षीरसागर प्रयत्न करणार आहेत.

ते म्हणाले, अंबाबाई मंदिराबाबतचे सर्वाधिकार देवस्थान समितीकडेच असले पाहिजेत, अन्यथा देवस्थानला काही अर्थच राहणार नाही. व्यवस्थापनासाठी म्हणून एखादी उपसमिती असण्यास हरकत नाही. तरी या मागणीसाठी मंगळवारी मुख्यमंत्री, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि विधि व न्याय खात्याचे मंत्री रणजित पाटील यांची भेट घेणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरministerमंत्री