शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अंबाबाई मंदिराला लागते वर्षाला साडेनऊशे किलो कुंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 16:28 IST

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी वर्षाकाठी साडेनऊशे किलोंहून अधिक कुंकू लागते. अंबाबाईचे रोजचे धार्मिक विधी, नित्यनैमित्तिक कार्यक्रम, कुंकुमार्चन, शाश्वत पूजा, भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणारी पाकिटे या सगळ्यांसाठी या कुंकवाचा वापर केला जातो. नवरात्रौत्सवात कुंकवाची सर्वाधिक मागणी असते.

ठळक मुद्देअंबाबाई मंदिराला लागते वर्षाला साडेनऊशे किलो कुंकूनवरात्रौत्सवात कुंकवाची सर्वाधिक मागणी

इंदुमती गणेश कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी वर्षाकाठी साडेनऊशे किलोंहून अधिक कुंकू लागते. अंबाबाईचे रोजचे धार्मिक विधी, नित्यनैमित्तिक कार्यक्रम, कुंकुमार्चन, शाश्वत पूजा, भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणारी पाकिटे या सगळ्यांसाठी या कुंकवाचा वापर केला जातो. नवरात्रौत्सवात कुंकवाची सर्वाधिक मागणी असते.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी देवता असलेल्या श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षाला ५० ते ६० लाख भाविक येतात. देवीची महती सर्वदूर पसरल्याने या भाविकसंख्येत वाढ होत आहे. त्यात आॅनलाईन दर्शनसुविधेमुळे त्यात देशविदेशांतील भाविकांचीही भर पडली आहे.

स्त्रीदैवत म्हटले की कुंकवाचे महत्त्व ओघाने आलेच. त्यात आदिशक्ती अंबाबाई मंदिरातील धार्मिक विधींचे वेगळेपण आहे. अंबाबाईचे मंदिर पहाटे साडेचार वाजता उघडते. तेव्हापासून देवीची काकड आरती, सकाळी सहा, साडेआठ आणि ११ वाजता असे तीन वेळचे अभिषेक, दुपारची आरती, त्यानंतरची सालंकृत पूजा, शेजारती असे नित्य व नैमित्तिक विधी पार पडतात. रात्री १० वाजता गाभारा बंद होतो. पालखी सोहळा असेल त्या दिवशी थोडा उशीर होतो. याशिवाय सण, उत्सव, समारंभाच्या निमित्ताने विशेष पूजा बांधल्या जातात. नवरात्रौत्सवाच्या काळात अभिषेकांची संख्या दुपटीने वाढते.वरील सर्व धार्मिक कृत्यांसाठी कुंकू मोठ्या प्रमाणात लागते. ते हळदीपासून बनविलेले व शुद्ध प्रतीचे असावे लागते. त्यासाठी नुकतीच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने निविदा काढली आहे. ती दोन वर्षांसाठी देण्यात येणार असून, त्यासाठी तीनजणांनी अर्ज केला आहे.वर्षभर लागणारे कुंकू

  • दैनंदिन धार्मिक विधी : ३५० किलो
  • नवरात्रौत्सवात लागणारे कुंकू : ७० किलो
  • वर्षभरातील कुंकुमार्चन विधी : ४० किलो
  • ७०० महिलांचा सामुदायिक कुंकुमार्चन विधी : ७० किलो.

प्रसाद पाकिटे ८८ हजारअनेक परस्थ भाविक देवस्थान समितीकडे शाश्वत पूजेसाठीची पावती करून जातात. अशा भाविकांना समितीच्या वतीने प्रसादाचे पाकीट पोस्टाने अथवा कुरिअरने पाठविले जाते. त्यात हळदी-कुंकू, साखर आणि फुटाण्यांचा समावेश असतो. याशिवाय अभिषेकासह विविध धार्मिक विधींनंतर भाविकांना हे प्रसाद पाकीट दिले जाते. वर्षाला ८८ हजारांहून अधिक पाकिटे लागतात. त्यांपैकी केवळ नवरात्रौत्सवातील पाकिटांची संख्या ११ हजार आहे.साडेसातशे लिटर दूध, दोनशे लिटर दहीदेवीच्या पंचामृत अभिषेकासाठी दूध व दहीदेखील मोठ्या प्रमाणात लागते. त्यासाठी महिन्याला किमान ६२ लिटर दूध आणि १६ लिटर दही वापरले जाते. अशा रीतीने वर्षाला साडेसातशे लिटर दूध व दोनशे लिटर दही लागते; तर साखर ५० किलो, मध चार किलो लागतो.तीन हजार केळीसमितीच्या अखत्यारीत असलेल्या ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिर व बिनखांबी गणेश मंदिरासाठी केळी मागविली जातात. अंगारकी संकष्टी असेल त्यावेळी दोन हजार केळी; तर दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीसाठी एक हजार केळी वापरली जातात. 

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर