शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

अंबाबाईला साकडे; मात्र आराखडा कागदावरच..!: देवीच्या कामांतही आश्वासनांचाच महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:32 IST

कोल्हापूर : भाजप-शिवसेना युतीच्या प्रचाराचा प्रारंभ सोमवारी करवीरनिवासिनी अंबाबाईचे आशीर्वाद घेऊन दणक्यात करण्यात आला खरा, परंतु त्याच अंबाबाई मंदिर ...

ठळक मुद्देयुती शासनाकडून अनुभव

कोल्हापूर : भाजप-शिवसेना युतीच्या प्रचाराचा प्रारंभ सोमवारी करवीरनिवासिनी अंबाबाईचे आशीर्वाद घेऊन दणक्यात करण्यात आला खरा, परंतु त्याच अंबाबाई मंदिर परिसरातील विकासकामांसाठी मंजूर झालेल्या आराखड्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला नसल्याने परिसर विकासाची प्रतीक्षा मात्र आजही कायम राहिली.

एकीकडे अंबाबाईचे आशीर्वाद घ्यायचे आणि दुसरीकडे तिच्याच परिसरातील कामांसाठी निधी द्यायचा नाही ही सत्ताधाऱ्यांची भूमिका त्यातून स्पष्ट झाली. राज्यकर्ते लोकांना खोटी आश्वासने देतात, झुलवत ठेवतात, असा अनुभव येत होता. आता तो देवीच्या कामांतही येत असल्याची संतप्त प्रतिक्रिया लोकांतून उमटत आहेत.

गेल्या चार वर्षांपासून अंबाबाई मंदिर परिसराच्या विकासाचे आराखडे तयार केले जात आहेत. आराखड्यातील कामे सतत बदलण्यात आल्याने त्याच्या खर्चाचे आकडेही सतत बदलत गेले.कॉँग्रेस-राष्टÑवादीचे सरकार असताना त्यांनी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला; पण तो काही आजपर्यंत खर्च झाला नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तो परत गेला. त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना सरकारतर्फे मंदिर परिसर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले.

८७ कोटी रुपयांचा आराखडा तयार झाला. त्याला विभागीय स्तरावर मंजुरी, तांत्रिक समितीची मंजुरी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीचीही मंजुरी झाली; परंतु निधीच पाठविलेला नाही.लोकसभा निवडणुकीची सध्या आचारसंहिता लागू आहे; परंतु अंबाबाई मंदिर परिसर विकासकामांना यापूर्वीच मंजुरी झाली असल्याने सरकारकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधी पाठविण्यास काहीच हरकत नव्हती; पण तसे काही घडलेले नाही. एकीकडे देवीचे दर्शन घ्यायचे, आशीर्वाद मागायचे, ‘सत्ता येऊ दे’ म्हणून तिला साकडे घालायचे आणि दुसरीकडे मंदिर विकासाच्याच कामांना निधी द्यायचा नाही, असा अनुभव राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून येत आहे.८७ कोटी निधीची अजूनही प्रतीक्षाचपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गतवर्षी नवरात्रौत्सवानंतर कामांना सुरुवात होईल, असे जाहीर केले होते; परंतु प्रत्यक्षात आजही कामाचा प्रारंभ झालेला नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजुरी दिली म्हटल्यावर

८७ कोटींपैकी टप्प्याने निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग होणे अपेक्षित होते. याबाबत महापालिकेकडे चौकशी केली असता असा कोणताही निधी आल्याचे पत्र अथवा माहिती आपल्याकडे नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfundsनिधी