शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दसरा चौकातील शाही दसऱ्यासोबतच कोल्हापुरात 'या' परिसरात होतो सोने लुटण्याचा मोठा सोहळा

By संदीप आडनाईक | Updated: September 20, 2025 18:14 IST

पंचगंगेवर अंबाबाई-रंकभैरवाची पालखी भेट, जप्तनमुलुख-जाधव यांच्याकडे मान

संदीप आडनाईककोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या नवरात्रौत्सवासोबतच ‘कोल्हापूरचा रक्षक’ म्हणजे क्षेत्रपाल रंकभैरवाच्या नवरात्रोत्सवालाही मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. दसरा चौकातील शाही दसऱ्यासोबतच कोल्हापूरकरांना माहिती नसलेला हा सोने लुटण्याचा मोठा सोहळा शहाजी वसाहतीमधील गंजी माळावर म्हणजे आजच्या टिंबर मार्केट परिसरातही थाटात साजरा होतो.अंबाबाई मंदिराच्या दक्षिणेला महालक्ष्मी बँकेसमोरच्या छोट्या बोळात सातव्या-आठव्या शतकातील श्री रंकभैरव स्वतंत्र तटबंदी युक्त हेमाडपंथी शैलीतील मंदिरात विराजमान आहे. दहाव्या पिढीतले राहुल जप्तनमुलुख-जाधव हे या मंदिराचे सध्या व्यवस्थापन पाहतात. करवीरचे श्रीमंत छत्रपती महाराज यांच्या राजवटीतील सरदार रेखुजी बिन नरसोजीराव जाधव-जप्तनमुलुख यांनी लढाईत मोठी कामगिरी केल्यामुळे त्यांना जप्तनमुलुख आणि सरनोबत हे दोन किताब मिळाले. त्यामुळे दसऱ्याच्या सोहळ्याचा मान 'जाधव-जप्तनमुलुख' घराण्याला आहे.रंकभैरवाचा नवरात्राैत्सवरंकभैरवाचा नवरात्रीत विशेष उत्सव असतो. देवाचा पालखी सोहळा अश्विन शुद्ध पंचमीला सुरू होतो. महाअष्टमीच्या दिवशी देवीचा रोशन नाईक चोपदार देवीचा सुवर्णदंड घेऊन रंकोबा पुढे येऊन अंबाबाईची ललकारी देतो नंतर रंकनाथ सदरेवरून मंदिरात येतात. महानवमीला रंकभैरव स्वतःच्या तीर्थात म्हणजे रंकाळ्यात स्नान करतात. दसऱ्या दिवशी अंबाबाईची आणि भवानीची पालखी दसरा चौकाकडे निघते. त्याचवेळी रंकभैरवाची पालखी गंजीमाळाकडे निघते.

दगडी तख्तावर धार्मिक विधीरंकभैरवाची पालखी टिंबर मार्केट परिसरातील भुजंगा लक्ष्मण काशीद यांनी १९३१ मध्ये बांधलेल्या रंकभैरवाच्या दगडी सदरेवर (तख्त) जाऊन थांबते. तेथे धार्मिक विधीनंतर एका घराच्या छतावरून आपट्याच्या पानाच्या छोट्या फांद्या भाविकांकडे फेकल्या जातात. भाविक तीच पाने सोन्याचे प्रतीक म्हणून लुटतात.अंबाबाई-रंकभैरव भेटीचा मार्गरंकभैरव मंदिर - मिरजकर तिकटी - नंगीवली चौक - टिंबर मार्केट - उभा मारुती चौक - रंकाळा/राजघाट- उत्तरेश्वर पेठ - पंचगंगा नदी - गंगावेश - बाबूजमाल दर्गा - वांगी बोळ- बिनखांबी गणेश मंदिर चौक आणि पुन्हा श्री रंकभैरव मंदिरात आगमन अशी पालखी निघते. पंचगंगा नदीवर गुरू महाराज समाधी मंदिराजवळ अंबाबाईशी त्यांची भेट होते. त्यानंतर पालखी पुन्हा मंदिराकडे आल्यानंतर नवरात्रौत्सवाची सांगता होते.