शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

दसरा चौकातील शाही दसऱ्यासोबतच कोल्हापुरात 'या' परिसरात होतो सोने लुटण्याचा मोठा सोहळा

By संदीप आडनाईक | Updated: September 20, 2025 18:14 IST

पंचगंगेवर अंबाबाई-रंकभैरवाची पालखी भेट, जप्तनमुलुख-जाधव यांच्याकडे मान

संदीप आडनाईककोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या नवरात्रौत्सवासोबतच ‘कोल्हापूरचा रक्षक’ म्हणजे क्षेत्रपाल रंकभैरवाच्या नवरात्रोत्सवालाही मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. दसरा चौकातील शाही दसऱ्यासोबतच कोल्हापूरकरांना माहिती नसलेला हा सोने लुटण्याचा मोठा सोहळा शहाजी वसाहतीमधील गंजी माळावर म्हणजे आजच्या टिंबर मार्केट परिसरातही थाटात साजरा होतो.अंबाबाई मंदिराच्या दक्षिणेला महालक्ष्मी बँकेसमोरच्या छोट्या बोळात सातव्या-आठव्या शतकातील श्री रंकभैरव स्वतंत्र तटबंदी युक्त हेमाडपंथी शैलीतील मंदिरात विराजमान आहे. दहाव्या पिढीतले राहुल जप्तनमुलुख-जाधव हे या मंदिराचे सध्या व्यवस्थापन पाहतात. करवीरचे श्रीमंत छत्रपती महाराज यांच्या राजवटीतील सरदार रेखुजी बिन नरसोजीराव जाधव-जप्तनमुलुख यांनी लढाईत मोठी कामगिरी केल्यामुळे त्यांना जप्तनमुलुख आणि सरनोबत हे दोन किताब मिळाले. त्यामुळे दसऱ्याच्या सोहळ्याचा मान 'जाधव-जप्तनमुलुख' घराण्याला आहे.रंकभैरवाचा नवरात्राैत्सवरंकभैरवाचा नवरात्रीत विशेष उत्सव असतो. देवाचा पालखी सोहळा अश्विन शुद्ध पंचमीला सुरू होतो. महाअष्टमीच्या दिवशी देवीचा रोशन नाईक चोपदार देवीचा सुवर्णदंड घेऊन रंकोबा पुढे येऊन अंबाबाईची ललकारी देतो नंतर रंकनाथ सदरेवरून मंदिरात येतात. महानवमीला रंकभैरव स्वतःच्या तीर्थात म्हणजे रंकाळ्यात स्नान करतात. दसऱ्या दिवशी अंबाबाईची आणि भवानीची पालखी दसरा चौकाकडे निघते. त्याचवेळी रंकभैरवाची पालखी गंजीमाळाकडे निघते.

दगडी तख्तावर धार्मिक विधीरंकभैरवाची पालखी टिंबर मार्केट परिसरातील भुजंगा लक्ष्मण काशीद यांनी १९३१ मध्ये बांधलेल्या रंकभैरवाच्या दगडी सदरेवर (तख्त) जाऊन थांबते. तेथे धार्मिक विधीनंतर एका घराच्या छतावरून आपट्याच्या पानाच्या छोट्या फांद्या भाविकांकडे फेकल्या जातात. भाविक तीच पाने सोन्याचे प्रतीक म्हणून लुटतात.अंबाबाई-रंकभैरव भेटीचा मार्गरंकभैरव मंदिर - मिरजकर तिकटी - नंगीवली चौक - टिंबर मार्केट - उभा मारुती चौक - रंकाळा/राजघाट- उत्तरेश्वर पेठ - पंचगंगा नदी - गंगावेश - बाबूजमाल दर्गा - वांगी बोळ- बिनखांबी गणेश मंदिर चौक आणि पुन्हा श्री रंकभैरव मंदिरात आगमन अशी पालखी निघते. पंचगंगा नदीवर गुरू महाराज समाधी मंदिराजवळ अंबाबाईशी त्यांची भेट होते. त्यानंतर पालखी पुन्हा मंदिराकडे आल्यानंतर नवरात्रौत्सवाची सांगता होते.