शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये शेती सेवा केंद्रासह भाजीपाला विक्रीस मुभा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:24 IST

कोल्हापूर : कोरोनास्थिती गंभीर होत असल्याने लॉकडाऊन कडक होत असताना यातून शेतीशी संबंधित सर्व बाबी वगळाव्यात. शेतीसेवा केंद्रांसह रस्त्याकडेला ...

कोल्हापूर : कोरोनास्थिती गंभीर होत असल्याने लॉकडाऊन कडक होत असताना यातून शेतीशी संबंधित सर्व बाबी वगळाव्यात. शेतीसेवा केंद्रांसह रस्त्याकडेला भाजीपाला विक्रीस मुभा देऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली. सभेचे नेते प्रा. उदय नारकर यांनी ही माहिती दिली.

खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. पेरणीसाठी बी-बियाणे, खते, औषधे वगैरे शेतमाल वेळेवर उपलब्ध होणे आवश्यक आहे. ही सर्व कामे वेळेवर झाली नाहीत, तर हंगाम वाया जाऊन शेतकऱ्यांची अवस्था बिकट होईल, हे लक्षात घेऊन प्रशासनाने लाॅकडाऊन कडक केला तरी शेतकऱ्यांचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा. बी-बियाणे, औषधे, खते आदी वस्तूंची दुकाने बंद ठेवल्यास शेतकऱ्यांचा हंगाम वाया जाण्याची भीती आहे. या वस्तूंचा पुरवठा सुरळी राहावा यासाठी किमान वेळ या वस्तूंची दुकाने खुली ठेवण्याची परवानगी द्यावी.

चौकट ०१

शेतकऱ्यांचे नुकसान टाळा

भाजीपाला विकला गेला नाही, तर तो नाशवंत माल असल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान होईल. जिल्ह्यातील शहरे हीच भाजीपाल्यासाठी मुख्य बाजारपेठ आहे. भाजी खरेदी करण्यासाठी मंडयांमध्ये झुंबड उडून शारीरिक अंतराचा फज्जा उडतो, हे मान्य आहे; पण स्वतः शेतकरी रस्त्याच्या कडेला बसून आपला भाजीपाला विकू शकतात. खुल्या जागेत शारीरिक अंतर पाळत विकेंद्रित पद्धतीने भाजीपाला विकणे शक्य आहे. एकाच वेळी ग्राहकाला भाजीपाला उपलब्ध होत उत्पादकाचेही नुकसान टाळता येईल.

चोकट ०२

मागण्या

खरीप हंगामासाठी शेतीमाल विक्रीची दुकाने खुली ठेवा.

ने-आण सुकर होण्यासाठी वाहतुकीला परवानगी द्या.

भाजीपाला विक्री रस्त्याच्या कडेला करण्यास परवानगी द्या.

सर्व भाजीविक्रेते, छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करा.