शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

गुऱ्हाळघरांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्या, राजू शेट्टींची केंद्रीय मंत्री गडकरींकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 12:05 IST

इथेनॉल निर्मितीमध्ये गुऱ्हाळघरांना परवानगी दिल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

जयसिंगपूर : राज्यातील वाढविलेल्या साखर कारखान्याच्या गाळप परवानगीमुळे साखर कारखानदार एकत्रित येऊन गुऱ्हाळघरांना एफ.आर.पी.च्या कायद्यात अडकविण्याच्या प्रयत्नात आहेत. गाळप परवाना व साखर आयुक्तालयाच्या परवानग्या यामध्ये गुंतवून वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक अरिष्टात सापडलेली गुऱ्हाळघरे बंद पाडण्यासाठीचाच हा प्रयत्न आहे. यामुळे इथेनॉल निर्मितीमध्ये गुऱ्हाळघरांना परवानगी दिल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. याबाबत केंद्र सरकारने धोरण निश्चित करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.

ज्या पध्दतीने राज्य व केंद्र सरकारने साखर उद्योगाकरिता विशेष लक्ष केंद्रित करून त्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाची निर्मिती केली, त्याचप्रमाणे गुऱ्हाळ उद्योगामध्ये सुध्दा लक्ष देणे गरजेचे होते. सध्या गूळ उत्पादक संकटात असून वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे गुऱ्हाळघरांचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे. यामध्ये राज्य सरकारने गुऱ्हाळघरांना एफ.आर.पी. बंधनकारक केल्यास गूळ उत्पादकांसमोर नवे संकट उभे राहणार आहे.

केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी चांगले काम केले असून यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न मार्गी लागून इंधनावरील परकीय चलनाचा खर्च कमी झाला आहे. गुऱ्हाळघरांना इथेनॉल करण्याची परवानगी दिल्यास ज्या वेळेस गुळाचे दर कमी होतील, त्या काळात उसाच्या रसापासून सिरप टू इथेनॉल करण्यासाठी परिसरातील ८ ते १० गुऱ्हाळघरेधारक एकत्रित येऊन टँकरने रस एकत्र केल्याने उत्पादन खर्चही कमी होईल व चांगल्या पध्दतीने इथेनॉल निर्मिती करू शकतील, असेही शेट्टी यांनी सांगितले.

मागण्यांबाबत सकारात्मकता

दिवसेंदिवस ऊस तोडणीचा प्रश्न गंभीर होत आहे. पुढील हंगामापासून ऊस तोडणी मशीनकरिता केंद्राने राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून अर्थसाहाय्य देऊन मशीनद्वारे ऊसतोडीकरिता चालना देण्याची मागणी केली असून, मंत्री गडकरी यांनी दोन्ही मागण्या योग्य असल्याचे सांगून तातडीने केंद्राकडून उपाययोजना करण्याबाबत तात्काळ संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे, अशीही माहिती शेट्टी यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीNitin Gadkariनितीन गडकरी