शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पूरग्रस्तांना २१ कोटींचे अनुदान वाटप, पंचनाम्याचे ४० टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 12:51 IST

महापुरात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आतापर्यंत सुमारे २१ कोटी शासकीय सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर पूरग्रस्तांच्या शेतीसह मालमत्तांचे आतापर्यंत जिल्ह्यात ४० टक्के पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात पंचनाम्याचे ४० टक्के काम पूर्ण शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत पंचनाम्यासाठी अडचणी, बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत

कोल्हापूर : महापुरात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आतापर्यंत सुमारे २१ कोटी शासकीय सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर पूरग्रस्तांच्या शेतीसह मालमत्तांचे आतापर्यंत जिल्ह्यात ४० टक्के पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे.

यामध्ये शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत शेतांमध्ये पाणी असल्याने पंचनाम्यास अडचणी येत आहेत, तर शहरात रविवारी साडेसहा हजार मालमत्तांचे पंचनामे होऊन सानुग्रह अनुदान वाटपाला सुरुवात झाली, तसेच शहरातील बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठाही सुरळीत झाला.महापुराच्या थैमानाने हजारो कुटुंबे रस्त्यावर आली. पूर ओसरला असून, आता या कुटुंबांना आर्थिक आणि मानसिक पाठबळाची गरज आहे. शासनाकडून नुकसानग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांचे रोख सानुग्रह अनुदान जागेवर जाऊन वाटप केले जात आहे.

आतापर्यंत सुमारे २१ कोटी रुपये जिल्ह्यात वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे ५० कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. ते सर्व तालुक्यांत आवश्यक त्या प्रमाणात वाटण्यात आले. त्यानंतर पुन्हा १0 कोटींची मागणी करण्यात आली. त्यानुसार शिरोळ तालुक्यासाठी चार कोटी, हातकणंगले व करवीर तालुक्यांसाठी प्रत्येकी तीन कोटी रुपये असे १0 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्याचे लवकरच वाटप सुरू होणार आहे.

नुकसानग्रस्त शेती, घरे, गोठे, जनावरे यांचे पंचनामे सुरू झाले असून, ते आतापर्यंत जिल्ह्यात ४० टक्के इतके झाले आहेत. कोल्हापूर शहरातील सुमारे सहा हजार ५०० मालमत्तांचे पंचनामे झाले असून, पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटपाला सुरुवात झाली.

शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील पंचनाम्यासाठी अडचणी येत आहेत. अद्यापही शेतांमध्ये पाणी आहे; त्यामुळे या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.

बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीतमहापुरामुळे विस्कळीत झालेला कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. रविवारी शिंगणापूर पंपिंग स्टेशन येथील यंत्रणेत पुरामुळे झालेला बिघाड दुरुस्त करण्यात महापालिका प्रशासनाला यश मिळाले. यामुळे शहरातील बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत झाला. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर