शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वारकऱ्यांना एस.टीतर्फे फराळाचे वाटप, कोल्हापूर विभागातील अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 15:35 IST

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविक प्रवांशासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्यावतीने शनिवारी मोफत फराळाच्या वाटप करण्याचा शुभारंभ मध्यवर्ती बसस्थानक शनिवारी सकाळी विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्या हस्ते करण्यात आले, या उपक्रमांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

ठळक मुद्देवारकरींना एस.टी तर्फे फराळाचे वाटपकोल्हापूर विभागातील अनोखा उपक्रमअभंगाच्या गजरात पंढरपूरकडे २५ एस.टी रवाना, प्रवाशांकडून स्वागत

कोल्हापूर : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविक प्रवांशासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्यावतीने शनिवारी मोफत फराळाच्या वाटप करण्याचा शुभारंभ मध्यवर्ती बसस्थानक शनिवारी सकाळी विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्या हस्ते करण्यात आले, या उपक्रमांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

पंढरपूर यात्रेसाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची  संख्या जास्त असते. ज्या लोकांना पायी जाता येत नाहीत, त्या भाविकांसाठी एस.टी मोठा आधार असतो. एस.टी.मधून पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या  भाविक प्रवांशाचे  खूप वर्षांचे जुने नाते आहे. हेच नाते अधिक दृढ करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने अनोखा उपक्रम सुरु केला.

वारीच्या मार्गावर होणाऱ्या गर्दीमुळे प्रवासादरम्यान उशीर होण्याची शक्यता असते. मार्गावर त्यांच्या खाण्या-पिण्याची गैरसोय टाळण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. मध्यवर्ती बसस्थानकांतून सकाळी सजावट केलेल्या २५ एस.टी पंढरपूरकडे अभंगाच्या गजरात रवाना झाल्या.

याप्रसंगी कामगार अधिकारी प्रवीण पाटील, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी संदीप भोसले, आगार व्यवस्थापक अजय पाटील, सहा. वाहतूक अधिक्षक संजय शिंदे, अतुल मोरे, वाहतूक निरिक्षक शितल चिखलव्हाळे,वाहतूक नियंत्रक प्रतिक शिंदे, इफ्रान सांगावकर, यांच्यासह एस.टीचे कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.

सोमवार पर्यंत सुरु राहणार उपक्रमपंढरपूरकडे जाणाऱ्या भक्तांसाठी बसमध्ये मध्यवर्ती बसस्थानकांतील पुणे पटलाजवळ गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी गाडीतील भाविकांना केळी, दोन राजगिऱ्याचा लाडू व पाण्याची बाटली असा फराळ मोफत दिला जात आहे. यासह एक लहान माहिती पुस्तिका भेट दिली जात होती. त्यामध्ये आरत्यांसह एस. टी.च्या विविध योजना व वेळापत्रकाची माहितीचा समावेश आहे.

प्रवाशांकडून मदत...एस.टीतील प्रवास म्हणजे त्रासदाय किंवा चालक- वाहक किंवा स्थानकांतील कर्मचाऱ्याकडून प्रवाशांनी मिळणारी वागणूकीमुळे एस.टीकडे बघण्याचा दृष्टीकोन नेहमी वेगळा असतो. मात्र कोल्हापूर विभागाने आज भाविकांना मोफत फारळ वाटत असल्याचे पाहून काही प्रवाशांनी स्वत:हून पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स मदत म्हणून देत,या उपक्रमाचे कौतक केले.

माऊलीच्या दर्शनाच्या ओढीने भाविक तहान - भूक हरपलेले असते. कोल्हापूरहून त्याचा प्रवास पुढे चार ते पाच तासाचा असतो. यासर्व गोष्टीचा विचार करून हा फराळाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांचा शुभारंभ होताच  चांगला प्रतिसाद मिळला आहे.- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक 

 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळkolhapurकोल्हापूर