शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ढपल्याचा आरोप म्हणजे शिळ्या कढीला ऊत : पाटील

By admin | Updated: May 28, 2017 00:58 IST

इचलकरंजीतील भुयारी गटार योजना प्रकरण : दुसऱ्याचे श्रेय लाटणे थांबवा

लोकमत न्यूज नेटवर्क --इचलकरंजी : येथील भुयारी गटार योजनेत मोठा ढपला पाडला असल्याचा भारतीय जनता पक्षाचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी केलेला आरोप म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचाच प्रकार आहे. तत्कालीन शहर विकास आघाडीचे सदस्य असलेल्या पक्षप्रतोदांनी या योजनेला मंजुरी देताना काय ‘अर्थ’ घेतला याचाही खुलासा करावा. सत्ता आली म्हणून सर्व चांगले आम्हीच केले असा कांगावा करून दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न त्यांनी थांबवावा, असा टोला काँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील यांनी लगावला आहे. योजनेच्या परिस्थितीची पूर्ण माहिती न घेता सीआयडी चौकशी करण्याची मागणी म्हणजे बालीशपणाच दिसून येतो. शहापूर व कबनूर या वाढीव भागातील सांडपाण्याचा निचरा व्हावा व प्रदूषणाला आळा बसण्यासाठी केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएमटी योजनेतून भुयारी गटर योजना मंजूर करण्यात आली. आघाडीने सुरुवातीला या योजनेला विरोध करणार असे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र सभेत आघाडीच्या सर्वच सदस्यांनी एकमताने या ठरावाला मंजुरी दर्शविली. या योजनेसाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी (एसटीपी) जागा नगरपरिषदेच्या ताब्यात नसल्याची गंभीर बाब काँग्रेसचे तत्कालीन गटनेते बाळासाहेब कलागते यांनी उघडकीस आणली होती. त्याचेही श्रेय आता भाजप लाटू पाहत आहे.योजनेच्या चौकशीची यापूर्वीच मागणीयोजनेचे कामकाज युद्ध पातळीवर सुरू झाल्यानंतर काम निकृष्ट होत असल्याबद्दल नागरिकांच्या तक्रारी वाढल्या. त्याची गांभीर्याने दखल घेत काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे १५ नोव्हेंबर २०१५ रोजीच्या पत्राद्वारे सदर योजनेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी केलेली आहे. त्याची प्रतसुद्धा आमदार सुरेश हाळवणकर यांना दिलेली आहे. त्याचबरोबर २९ जून २०१६ रोजीच्या पत्राद्वारे या योजनेची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करावी, अशी मागणीही बावचकर यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.