शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

शेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योग : अजित नवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 13:06 IST

परिषदेच्या माध्यमातून दर जाहीर करून शेतकरी व शेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योग आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केला. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांना संघर्षासाठी चिथावण्यापेक्षा ३५00 रुपये ऊसदर देण्याची हमी द्यावी, असे आवाहन डॉ. नवले यांनी केले.

ठळक मुद्देशेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योगमुख्यमंत्र्यांनी ऊस परिषद घेणे हास्यास्पद व पदाला न शोभणारे

कोल्हापूर :  ३५00 रुपये उसदर मिळावा यासाठी सरकारचा प्रमुख या नात्याने धोरणे घ्यायची सोडून स्वत: मुख्यमंत्र्यांनी ऊस परिषद घेणे हे हास्यास्पद व पदाला न शोभणारे आहे. परिषदेच्या माध्यमातून दर जाहीर करून शेतकरीशेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योग आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केला. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांना संघर्षासाठी चिथावण्यापेक्षा ३५00 रुपये ऊसदर देण्याची हमी द्यावी, असे आवाहन डॉ. नवले यांनी केले.अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने कोल्हापुरात आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या समारोपानंतर डॉ. नवले यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. वारणा कोडोली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ऊस परिषदेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. नवले यांनी वरील भूमिका स्पष्ट केली.नवले म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी परिषदा घेण्याऐवजी साखरेला, उपपदार्थांना दर कसा जास्त मिळेल ते पाहावे, जेणेकरून शेतकऱ्यांना ३५00 रुपये दर मिळण्याची हमी मिळेल. हे न करता केवळ परिषदा घेऊन शेतकरी आणि शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावण्याचे, त्यांना चिथावण्याचे काम करत असतील, तर राज्याचा प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री म्हणून त्यांना आणि त्यांच्या पदाला शोभणारे नाही.

शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी भूमिका घेण्याची गरज असताना ते जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. साखरेचे दर घसरत असताना त्याविषयी निर्णय न घेता परिषदेच्या माध्यमातून दर जाहीर करण्याची भूमिका घेणे हे मुळातच हास्यास्पद आहे.

साखरेचे भाव कमी कसे राहतील हे पाहायचे, शेतकऱ्यांना उरले सुरलेच मिळेल, अशी एका बाजूला व्यवस्था करायची आणि दुसऱ्या बाजूला अशाप्रकारे परिषद घेऊन आपणच शेतकऱ्यांचे कसे तारणहार आहोत, हे दर्शवणे म्हणजे त्यांचा शुद्ध खोटारडेपणा आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkolhapurकोल्हापूर