शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
2
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
3
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
5
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
7
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
9
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
10
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
11
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
12
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
13
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
14
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
15
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
16
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
17
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
18
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
19
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योग : अजित नवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 13:06 IST

परिषदेच्या माध्यमातून दर जाहीर करून शेतकरी व शेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योग आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केला. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांना संघर्षासाठी चिथावण्यापेक्षा ३५00 रुपये ऊसदर देण्याची हमी द्यावी, असे आवाहन डॉ. नवले यांनी केले.

ठळक मुद्देशेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योगमुख्यमंत्र्यांनी ऊस परिषद घेणे हास्यास्पद व पदाला न शोभणारे

कोल्हापूर :  ३५00 रुपये उसदर मिळावा यासाठी सरकारचा प्रमुख या नात्याने धोरणे घ्यायची सोडून स्वत: मुख्यमंत्र्यांनी ऊस परिषद घेणे हे हास्यास्पद व पदाला न शोभणारे आहे. परिषदेच्या माध्यमातून दर जाहीर करून शेतकरीशेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योग आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केला. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांना संघर्षासाठी चिथावण्यापेक्षा ३५00 रुपये ऊसदर देण्याची हमी द्यावी, असे आवाहन डॉ. नवले यांनी केले.अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने कोल्हापुरात आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या समारोपानंतर डॉ. नवले यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. वारणा कोडोली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ऊस परिषदेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. नवले यांनी वरील भूमिका स्पष्ट केली.नवले म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी परिषदा घेण्याऐवजी साखरेला, उपपदार्थांना दर कसा जास्त मिळेल ते पाहावे, जेणेकरून शेतकऱ्यांना ३५00 रुपये दर मिळण्याची हमी मिळेल. हे न करता केवळ परिषदा घेऊन शेतकरी आणि शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावण्याचे, त्यांना चिथावण्याचे काम करत असतील, तर राज्याचा प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री म्हणून त्यांना आणि त्यांच्या पदाला शोभणारे नाही.

शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी भूमिका घेण्याची गरज असताना ते जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. साखरेचे दर घसरत असताना त्याविषयी निर्णय न घेता परिषदेच्या माध्यमातून दर जाहीर करण्याची भूमिका घेणे हे मुळातच हास्यास्पद आहे.

साखरेचे भाव कमी कसे राहतील हे पाहायचे, शेतकऱ्यांना उरले सुरलेच मिळेल, अशी एका बाजूला व्यवस्था करायची आणि दुसऱ्या बाजूला अशाप्रकारे परिषद घेऊन आपणच शेतकऱ्यांचे कसे तारणहार आहोत, हे दर्शवणे म्हणजे त्यांचा शुद्ध खोटारडेपणा आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkolhapurकोल्हापूर