शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

आजऱ्यात सर्वपक्षीय रॅली काढून कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 15:10 IST

BharatBand, FarmarStrike, Ajra, Kolhapur केंद्र सरकारच्या कृषीविधेयक कायद्याच्या निषेधार्थ आजऱ्यात सर्वपक्षीय रॅली काढून कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमध्ये डावे पक्ष, शेतकरी संघटना, काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना, धरणग्रस्त संघटना, लोकशाहीवादी सर्व पक्ष संघटना सहभागी झाल्या होत्या. विष्णूपंत केसरकर व ओंकार माद्याळकर यांच्याहस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ झाला.

ठळक मुद्देआजऱ्यात सर्वपक्षीय रॅली काढून कडकडीत बंदबंदमध्ये सर्व पक्ष संघटना सहभागी

आजरा : केंद्र सरकारच्या कृषीविधेयक कायद्याच्या निषेधार्थ आजऱ्यात सर्वपक्षीय रॅली काढून कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमध्ये डावे पक्ष, शेतकरी संघटना, काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना, धरणग्रस्त संघटना, लोकशाहीवादी सर्व पक्ष संघटना सहभागी झाल्या होत्या. विष्णूपंत केसरकर व ओंकार माद्याळकर यांच्याहस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ झाला.शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे, शेतकऱ्यांचे वाटोळे लावणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या.रॅली संभाजी चौकात आल्यानंतर सभेत रूपांतर झाले. केंद्र सरकारच्या कृषी धोरणाविरोधात सर्वांनीच जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना न्याय द्या, स्वाभिमाथन आयोगाची अंमलबजावणी करा, कृषी विधेयक रद्द करा अशीही मागणी करण्यात आली.रॅलीत मुकूंद देसाई, जयवंत शिंपी, विष्णूपंत केसरकर, उदय पवार, अल्बर्ट डिसोझा, संपत देसाई, तानाजी देसाई, अभिषेक शिंपी, किरण कांबळे, संभाजी पाटील, युवराज पोवार, नौशाद बुढ्ढेखान, ओंकार माद्याळकर, रवी भाटले यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

 रॅलीत प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी महात्मा फुले यांची वेशभूषा करून सहभाग घेतला तर सभेतील मनोगतात म. फुले यांचे कृषी धोरण व त्याची अंमलबजावणी करणेची मागणी केली., एस. टी. सेवा सकाळपासूनच बंद, शाळा, महाविद्यालयाकडे विद्यार्थी फिरकलेच नाहीत.

 उत्तूर परिसरात शंभर टक्के प्रतिसादउत्तूर : कृषी विधेयक धोरणाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये उत्तूर परिसरातील जनतेने सर्व व्यवहार बंद ठेवून शंभर टक्के प्रतिसाद दिला. बंदला महाविकास आघाडी, जनता दल यांनी पाठिंबा दिला.

हलकर्णी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसादहलकर्णी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) परिसरात शासकीय बँका, बस व वैद्यकिय सेवेसह अन्य अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापाऱ्यांनी व दुकानदारांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये भाग घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त होता. 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदFarmer strikeशेतकरी संपkolhapurकोल्हापूर