शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

आजऱ्यात सर्वपक्षीय रॅली काढून कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 15:10 IST

BharatBand, FarmarStrike, Ajra, Kolhapur केंद्र सरकारच्या कृषीविधेयक कायद्याच्या निषेधार्थ आजऱ्यात सर्वपक्षीय रॅली काढून कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमध्ये डावे पक्ष, शेतकरी संघटना, काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना, धरणग्रस्त संघटना, लोकशाहीवादी सर्व पक्ष संघटना सहभागी झाल्या होत्या. विष्णूपंत केसरकर व ओंकार माद्याळकर यांच्याहस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ झाला.

ठळक मुद्देआजऱ्यात सर्वपक्षीय रॅली काढून कडकडीत बंदबंदमध्ये सर्व पक्ष संघटना सहभागी

आजरा : केंद्र सरकारच्या कृषीविधेयक कायद्याच्या निषेधार्थ आजऱ्यात सर्वपक्षीय रॅली काढून कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमध्ये डावे पक्ष, शेतकरी संघटना, काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना, धरणग्रस्त संघटना, लोकशाहीवादी सर्व पक्ष संघटना सहभागी झाल्या होत्या. विष्णूपंत केसरकर व ओंकार माद्याळकर यांच्याहस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ झाला.शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे, शेतकऱ्यांचे वाटोळे लावणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या.रॅली संभाजी चौकात आल्यानंतर सभेत रूपांतर झाले. केंद्र सरकारच्या कृषी धोरणाविरोधात सर्वांनीच जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना न्याय द्या, स्वाभिमाथन आयोगाची अंमलबजावणी करा, कृषी विधेयक रद्द करा अशीही मागणी करण्यात आली.रॅलीत मुकूंद देसाई, जयवंत शिंपी, विष्णूपंत केसरकर, उदय पवार, अल्बर्ट डिसोझा, संपत देसाई, तानाजी देसाई, अभिषेक शिंपी, किरण कांबळे, संभाजी पाटील, युवराज पोवार, नौशाद बुढ्ढेखान, ओंकार माद्याळकर, रवी भाटले यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

 रॅलीत प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी महात्मा फुले यांची वेशभूषा करून सहभाग घेतला तर सभेतील मनोगतात म. फुले यांचे कृषी धोरण व त्याची अंमलबजावणी करणेची मागणी केली., एस. टी. सेवा सकाळपासूनच बंद, शाळा, महाविद्यालयाकडे विद्यार्थी फिरकलेच नाहीत.

 उत्तूर परिसरात शंभर टक्के प्रतिसादउत्तूर : कृषी विधेयक धोरणाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये उत्तूर परिसरातील जनतेने सर्व व्यवहार बंद ठेवून शंभर टक्के प्रतिसाद दिला. बंदला महाविकास आघाडी, जनता दल यांनी पाठिंबा दिला.

हलकर्णी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसादहलकर्णी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) परिसरात शासकीय बँका, बस व वैद्यकिय सेवेसह अन्य अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापाऱ्यांनी व दुकानदारांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये भाग घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त होता. 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदFarmer strikeशेतकरी संपkolhapurकोल्हापूर