शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मेरी हर साँस देश के नाम पर मिट जाँए...; शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 10:54 IST

: ‘चाह ये है के मेरी हर साँस देश के नाम पर मिट जाँए’, ‘आज गहेरी नींद मे चला है फिर तेरा वतन’, अशा कव्वालीतून शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी सोमवारी देशभक्तीचा जागर केला. भारतीय विद्यापीठ महासंघ (एआययू) आणि शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ‘जश्न-ए-कव्वाली’ या तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेस उत्साहात प्रारंभ झाला.

ठळक मुद्देमेरी हर साँस देश के नाम पर मिट जाँए...देशभक्तीचा जागरशिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेचा प्रारंभ

कोल्हापूर : ‘चाह ये है के मेरी हर साँस देश के नाम पर मिट जाँए’, ‘आज गहेरी नींद मे चला है फिर तेरा वतन’, अशा कव्वालीतून शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी सोमवारी देशभक्तीचा जागर केला. भारतीय विद्यापीठ महासंघ (एआययू) आणि शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ‘जश्न-ए-कव्वाली’ या तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेस उत्साहात प्रारंभ झाला.विद्यापीठातील वि. स. खांडेकर सभागृहामध्ये या स्पर्धेचे उद्घाटन ‘एआययू’चे सहसचिव डॉ. डेव्हीड सॅम्पसन यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, ‘एआययू’चे निरीक्षक डॉ. विश्वरामन निर्मल प्रमुख उपस्थित होते.

या ‘जश्न-ए-कव्वाली’ची सुरुवात सागर (मध्य प्रदेश) मधील डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठाच्या संघाने केली. या संघाने ‘मेहफिल हमारी एक है, मेहफिल के टुकडे मत करो... मंजिल हमारी एक है, मंजिल के टुकडे मत करो... भारत हमारा एक है, भारत के टुकडे मत करो...’ या कव्वालीतून एकात्मतेची साद घातली.

राजस्थानच्या बनस्थळी विद्यापीठाच्या संघाने ‘चाह ये है के मेरी हर साँस देश के नाम पर मिट जाए’ ही कव्वाली सादर केली. शिवाजी विद्यापीठाच्या संघाने ‘आज गहेरी नींद मे चला है फिर तेरा वतन’ आणि ‘मन कुंथो मौला...’ ही कव्वाली सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

मुंबई विद्यापीठाच्यासंघाने सादर केलेल्या ‘ये वतन तेरे खातीर...’ ‘आज रंग है री...’ या कव्वालीने स्पर्धेत रंग भरला. पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या सादरीकरणाने स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. उर्दूतील नजाकतीच्या शेरोशायरी, सूर-तालाच्या संगमातून सादर झालेल्या कव्वालीने विद्यापीठात एक वेगळे वातावरण निर्माण केले. रसिकांच्या गर्दीने सभागृह खचाखच भरले होते.

देशभक्तिपर आणि पारंपरिक या प्रकारांमध्ये कव्वालीचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. दरम्यान, उद्घाटनाच्या कार्यक्रमात परीक्षक सईद खान, रियाझ खान, भारती वैशंपायन यांचे डॉ. स्वरूपा पाटील यांनी स्वागत केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी आभार मानले.

समारोप आजया स्पर्धेत देशभरातील आठ संघ सहभागी झाले आहेत. त्यातील पाच संघांनी पहिल्या दिवशी सादरीकरण केले. आज, मंगळवारी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ नांदेड, संत गागडेबाबा विद्यापीठ अमरावती आणि महर्षी दयानंद विद्यापीठ रोहतकचे संघ सादरीकरण करणार आहेत. दुपारी चार वाजता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर