शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने सर्व मराठी भाषिक एकत्र : अशोक चौसाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 4:13 PM

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने सर्व मराठी भाषिक लोक प्रथमच एकत्र आले, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांनी येथे केले.

ठळक मुद्दे ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ : स्वरूप व फलश्रुती’ असा व्याख्यानाचा विषयशिवाजी विद्यापीठातर्फे प्रभाकरपंत कोरगावकर स्मृती व्याख्यानमाला

कोल्हापूर : संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने सर्व मराठी भाषिक लोक प्रथमच एकत्र आले, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांनी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभाग आणि सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्रातर्फे आयोजित प्रभाकरपंत कोरगावकर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ : स्वरूप व फलश्रुती’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी डॉ. अरुण भोसले होते.

डॉ. चौसाळकर म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही तमाम मराठी भाषिकांनी जात, धर्म, पंथ, आदी भेद विसरून लढवलेली चळवळ होती. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निमिर्तीसाठी प्रामुख्याने शेकाप किंवा कम्युनिस्ट पक्षासारख्या डाव्या पक्षांनी मोठे योगदान दिले आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेले लोक देखील मोठया संख्येने होते.

डॉ. भोसले म्हणाले, महाराष्ट्र राज्य निर्मितीचे जितके श्रेय संयुक्त महाराष्ट्र समितीने केलेल्या चळवळीचे आहे. तितकेच श्रेय यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणातील मुत्सदेगीरीला दयावे लागेल.

या कार्यक्रमास सामाजिकशास्त्रे विभागाच्या अधिष्ठाता प्रा. भारती पाटील, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. प्रकाश पवार, रविंद्र भणगे, शिवाजी जाधव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर, डॉ. निलांबरी जगताप, प्रा. य. ना. कदम, किशोर खिलारे, उमेश भोसले, शरद पाटील उपस्थित होते.

इतिहास विभागप्रमुख डॉ. नंदा पारेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अवनीश पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. अविनाश भाले यांनी आभार मानले.