शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शाहूवाडीतील आळतूर विद्यामंदिर स्वबळावर हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:00 IST

बाबासाहेब कदम । लोकमत न्यूज नेटवर्क वारणा कापशी : जिद्दीला प्रयत्नांचे पंख लाभले तर पाऊलवाटांचा राजमार्ग बनायला वेळ लागत ...

बाबासाहेब कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कवारणा कापशी : जिद्दीला प्रयत्नांचे पंख लाभले तर पाऊलवाटांचा राजमार्ग बनायला वेळ लागत नाही. याचे उदाहरण म्हणजे आळतूर (ता. शाहूवाडी) येथील विद्यामंदिरातील शैक्षणिक उठावाचे काम. शाळेच्या मुख्याध्यापकांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला सहकाऱ्यांच्या मदतीने ई-लर्निंगच्या पूर्ततेचा विडा उचलला आणि बघता...बघता लोकसहभागातून पाच लाख रुपयांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.आळतूर हे रत्नागिरी महामार्गापासून केवळ चार कि.मी. अंतरावरील जेमतेम अडीच हजार लोकवस्तीच गाव. विज्ञान आणि तंत्रज्ञानापासून कित्येक मैल दूर असणारे दुर्गम गाव; परंतु या गावातील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक महादेव कुंभार व त्यांच्या सहकाºयांनी शाळेचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आणि कामाला सुरुवात केली. लोकवर्गणीच्या माध्यमातून पाच लाख रुपयांचे शैक्षणिक उठावाचे काम पूर्ण करण्याचा निर्धार केला. त्यातील नव्वद टक्के उद्दिष्ट साध्यदेखील झाले आहे. इंग्रजी, गणित विषयांच्या गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम चालू आहेत. इंग्रजी विषयासाठी सुमारे वीस हजार फ्लॅश कार्ड वापरून गुणवत्ता वाढ केली आहे. लोकसहभागातून सत्तर हजार रुपयांच्या झोळी ग्रंथालयाची निर्मिती केली आहे. गावच्या संलग्न पाच वाड्यांतील तीस ते साठ वर्षे वयोगटातील शंभर वाचक वाचनाचे वेड जिल्ह्यातील आगळ्यावेगळ्या झोळी ग्रंथालयाच्या माध्यमातून जपत आहेत. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ग्रंथालयाची सोय आहे. पस्तीस हजार रुपयांची आधुनिक ध्वनियंत्रणा योजना अस्तित्वात आहे. पाच वर्गात प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचे एल.ई.डी. संच सॉफ्टवेअर यंत्रणेसह सज्ज आहेत. तीन संगणकांच्या माध्यमातून स्वतंत्र प्रयोगशाळेची निर्मिती केली आहे. अद्ययावत स्वच्छतागृह, स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित असणारी तालुक्यातील दुर्गम भागातील ही एकमेव शाळा आहे. सुमारे पंचवीस विद्यार्थी या मार्गदर्शन केंद्राचा लाभ उठवत आहेत. शाळेच्या नव्वद फूट लांब भिंतीवर तीन फूट रुंदीचे पर्यावरण, स्वच्छता, नैसर्गिक आपत्ती, कन्या वाचवा मोहीम, वृक्षसंवर्धन, साक्षरता जागृतीच्या फलकांचे काम अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय प्रोजेक्टर, वर्गसजावट, सुसज्ज कार्यालय यासारख्या माध्यमातून शाळेचा चेहरामोहरा बदलला आहे.शासनाकडे अथवा राजकीय व्यक्तीकडून कोणतीही अपेक्षा न बाळगता माजी विद्यार्थी, मुंबईतील चाकरमानी लोक, सामाजिक संस्था आणि शाळेवर जिवापाड प्रेम करणारे पालक या अभियानात खारीचा वाटा उचलत आहेत. सर्वांच्या सहकार्यातून आणि समन्वयातून शाळेने नवे रूप धारण केले आहे. भौतिक सुविधांबरोबर गुणवत्ता वाढीसाठी राबविलेले उपक्रम विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात नवी भर टाकत आहेत. पर्यायाने दुर्गम आणि डोंगरदºयातील मुले नवी आव्हाने पेलण्यासाठी सज्ज झाली आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंचाहत्तर टक्के शैक्षणिक उठावाचे उद्दिष्ट पूर्ण केलेली आळतूरची प्राथमिक शाळा गर्जनच्या (ता.करवीर) वाटेवरील शाळा म्हणून नावारूपास येत आहे.