शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आजरा-गवसे मार्ग मृत्यूचा सापळा

By admin | Updated: December 9, 2014 00:57 IST

कोकणात क्वचितच जाणाऱ्या वाहनचालकांना येथील धोकादायक वळणांचा अंदाज न आल्याने,

ज्योतीप्रसाद सावंत -आजरा -आजरा ते गवसे साखर कारखान्यापर्यंतचा मार्ग धोकादायक वळणांमुळे मृत्यूचा सापळा बनला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक वळणांची कल्पना देणारे मार्गदर्शक फलक लावण्याबरोबरच वळणावरील मोऱ्यांची डागडुजी करून संरक्षक कठडे बांधणे आवश्यक आहे.आजऱ्याकडून आंबोलीमार्गे गोव्याला जाणारा हा राज्यमार्ग आहे. कोल्हापूरसह सांगली, इचलकरंजी भागातून पर्यटनाकरिता गोव्याकडे जाणारा पर्यटक या मार्गास प्राधान्य देताना दिसतो. त्यामुळे दिवस-रात्र या मार्गावर चारचाकींसह अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.कोकणात क्वचितच जाणाऱ्या वाहनचालकांना येथील धोकादायक वळणांचा अंदाज न आल्याने, समोर असणाऱ्या झाडांमधून वाहने न दिसल्याने, तर काहीवेळा मोऱ्यांना संरक्षक कठडे नसल्याने या मार्गावर वारंवार अपघात होतात. गेल्या वर्षभरामध्ये या पाच ते सात किलोमीटरच्या पट्ट्यात एकूण ११ अपघात झाले असून, यामध्ये सातजणांना मृत्यूला, तर अनेकांना अपंगत्वाला सामोरे जावे लागले आहे.काही ठिकाणी हा रस्ता अरुंद असल्याने रस्त्याच्या मध्यभागी ट्रॅक्टरसारखे वाहन बंद पडल्यास तासन्तास वाहतुकीचा खोळंबा होताना दिसतो. धोकादायक वळणे काढावीत, अशी मागणी होत आहे. साहेब...गोव्याला जाणारा रस्ता कुठला हो ?आजऱ्यातील संभाजी चौकात असणारे दिशादर्शक फलक निदर्शनास येत नसल्याने कोल्हापूरकडून येणारे पर्यटक ‘साहेब... गोव्याला जाणारा रस्ता कुठला ?’, तर कोकणातून येणारे पर्यटक असाच प्रश्न कोल्हापूरला जाणाऱ्या रस्त्याबाबत करतात.संरक्षक कठडा... आणि अपघातदोन महिन्यांपूर्वी याच मार्गावर मारुती स्विफ्ट गाडीला मोरीवर संरक्षक कठडा नसल्याने अपघात होऊन ती ओढ्यात कोसळली होती. यामध्ये दोघांना जीव गमवावा लागला होता.