शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

आजरा-गवसे मार्ग मृत्यूचा सापळा

By admin | Updated: December 9, 2014 00:57 IST

कोकणात क्वचितच जाणाऱ्या वाहनचालकांना येथील धोकादायक वळणांचा अंदाज न आल्याने,

ज्योतीप्रसाद सावंत -आजरा -आजरा ते गवसे साखर कारखान्यापर्यंतचा मार्ग धोकादायक वळणांमुळे मृत्यूचा सापळा बनला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक वळणांची कल्पना देणारे मार्गदर्शक फलक लावण्याबरोबरच वळणावरील मोऱ्यांची डागडुजी करून संरक्षक कठडे बांधणे आवश्यक आहे.आजऱ्याकडून आंबोलीमार्गे गोव्याला जाणारा हा राज्यमार्ग आहे. कोल्हापूरसह सांगली, इचलकरंजी भागातून पर्यटनाकरिता गोव्याकडे जाणारा पर्यटक या मार्गास प्राधान्य देताना दिसतो. त्यामुळे दिवस-रात्र या मार्गावर चारचाकींसह अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.कोकणात क्वचितच जाणाऱ्या वाहनचालकांना येथील धोकादायक वळणांचा अंदाज न आल्याने, समोर असणाऱ्या झाडांमधून वाहने न दिसल्याने, तर काहीवेळा मोऱ्यांना संरक्षक कठडे नसल्याने या मार्गावर वारंवार अपघात होतात. गेल्या वर्षभरामध्ये या पाच ते सात किलोमीटरच्या पट्ट्यात एकूण ११ अपघात झाले असून, यामध्ये सातजणांना मृत्यूला, तर अनेकांना अपंगत्वाला सामोरे जावे लागले आहे.काही ठिकाणी हा रस्ता अरुंद असल्याने रस्त्याच्या मध्यभागी ट्रॅक्टरसारखे वाहन बंद पडल्यास तासन्तास वाहतुकीचा खोळंबा होताना दिसतो. धोकादायक वळणे काढावीत, अशी मागणी होत आहे. साहेब...गोव्याला जाणारा रस्ता कुठला हो ?आजऱ्यातील संभाजी चौकात असणारे दिशादर्शक फलक निदर्शनास येत नसल्याने कोल्हापूरकडून येणारे पर्यटक ‘साहेब... गोव्याला जाणारा रस्ता कुठला ?’, तर कोकणातून येणारे पर्यटक असाच प्रश्न कोल्हापूरला जाणाऱ्या रस्त्याबाबत करतात.संरक्षक कठडा... आणि अपघातदोन महिन्यांपूर्वी याच मार्गावर मारुती स्विफ्ट गाडीला मोरीवर संरक्षक कठडा नसल्याने अपघात होऊन ती ओढ्यात कोसळली होती. यामध्ये दोघांना जीव गमवावा लागला होता.