शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

राज्यातील १७ शहरांच्या हवेचा दर्जा सुधारणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 00:42 IST

पर्यावरण मंत्रालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने महिन्याभरापूर्वी तो आराखडा शासनाला सादर केला. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आजअखेर दोन उच्चस्तरीय बैठकाही झाल्या आहेत.

ठळक मुद्दे कृती आराखडा निश्चित : मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, अ‍ौरंगाबादचा समावेश, महापालिकांची मदत

संतोष भिसे ।सांगली : हवेचा दर्जा सुधारण्यासाठी सांगलीसह राज्यातील सतरा शहरांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाऊल उचलले आहे. त्यासाठी कृती आराखडा निश्चित केला आहे. तोे शासनाला सादर झाला आला असून, जानेवारीपासून अंमलबजावणीची अपेक्षा आहे.स्थानिक महापालिकांच्या मदतीने आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल. नागपूर येथील निरी (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई आयआयटीने आराखडा तयार केला आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अकोला, अमरावती, औरंगाबाद यासह १७ शहरांतील हवेतील प्रदूषणाच्या तीव्रतेची नोंद घेऊन त्यावरील उपाय आराखड्यात सुचवले आहेत. येत्या सहा महिन्यांत त्याची अंमलबजावणी करायची आहे. पर्यावरण मंत्रालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने महिन्याभरापूर्वी तो आराखडा शासनाला सादर केला. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आजअखेर दोन उच्चस्तरीय बैठकाही झाल्या आहेत.या शहरांसाठी आराखडाराष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पाअंतर्गत सतरा शहरांत कृती आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल. त्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, लातूर, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नाशिक व उल्हासनगर या शहरांचा समावेश आहे. आराखड्याच्या अंमलबजावणीत तेथील महापालिकांचाही सहभाग असेल.

हे असतील उपायहवेचा दर्जा सुधारण्यासाठी वृक्षारोपणाची घनता वाढवणे, धुळीवर नियंत्रणासाठी कच्च्या रस्त्यांची संख्या कमी करुन पक्के डांबरी रस्ते तयार करणे, वनाच्छादीत क्षेत्र वाढवणे, बांधकामांवर नियंत्रण तसेच त्यांच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालणे असे काही उपाय आराखड्यात आहेत. रस्ते आणि वाहतुकीचे व्यवस्थापन, पार्किंगसाठी राखीव क्षेत्र, रस्त्यांची दैनंदिन स्वच्छता, सीएनजी इंधनाच्या वापरला प्रोत्साहन, विद्युत आणि सीएनजीवर चालणाºया वाहनांचा वापर वाढवणे या मुद्द्यांचही आराखड्यात समावेश आहे.

‘शहरांची हवा स्वच्छ आणि आरोग्यदायी रहावी यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ विविध उपाययोजना करत आहे. हवेच्या गुणवत्तेवरही लक्ष ठेवून आहे. ती सुधारण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्यात सुचवलेल्या उपायांची अंमलबजावणी केली जाणार असून, त्यामुळे हवेचा दर्जा वाढण्यास मदत होईल’.- नवनाथ अवताडे, उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpollutionप्रदूषण