शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १७ शहरांच्या हवेचा दर्जा सुधारणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 00:42 IST

पर्यावरण मंत्रालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने महिन्याभरापूर्वी तो आराखडा शासनाला सादर केला. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आजअखेर दोन उच्चस्तरीय बैठकाही झाल्या आहेत.

ठळक मुद्दे कृती आराखडा निश्चित : मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, अ‍ौरंगाबादचा समावेश, महापालिकांची मदत

संतोष भिसे ।सांगली : हवेचा दर्जा सुधारण्यासाठी सांगलीसह राज्यातील सतरा शहरांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाऊल उचलले आहे. त्यासाठी कृती आराखडा निश्चित केला आहे. तोे शासनाला सादर झाला आला असून, जानेवारीपासून अंमलबजावणीची अपेक्षा आहे.स्थानिक महापालिकांच्या मदतीने आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल. नागपूर येथील निरी (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई आयआयटीने आराखडा तयार केला आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अकोला, अमरावती, औरंगाबाद यासह १७ शहरांतील हवेतील प्रदूषणाच्या तीव्रतेची नोंद घेऊन त्यावरील उपाय आराखड्यात सुचवले आहेत. येत्या सहा महिन्यांत त्याची अंमलबजावणी करायची आहे. पर्यावरण मंत्रालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने महिन्याभरापूर्वी तो आराखडा शासनाला सादर केला. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आजअखेर दोन उच्चस्तरीय बैठकाही झाल्या आहेत.या शहरांसाठी आराखडाराष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पाअंतर्गत सतरा शहरांत कृती आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल. त्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, लातूर, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नाशिक व उल्हासनगर या शहरांचा समावेश आहे. आराखड्याच्या अंमलबजावणीत तेथील महापालिकांचाही सहभाग असेल.

हे असतील उपायहवेचा दर्जा सुधारण्यासाठी वृक्षारोपणाची घनता वाढवणे, धुळीवर नियंत्रणासाठी कच्च्या रस्त्यांची संख्या कमी करुन पक्के डांबरी रस्ते तयार करणे, वनाच्छादीत क्षेत्र वाढवणे, बांधकामांवर नियंत्रण तसेच त्यांच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालणे असे काही उपाय आराखड्यात आहेत. रस्ते आणि वाहतुकीचे व्यवस्थापन, पार्किंगसाठी राखीव क्षेत्र, रस्त्यांची दैनंदिन स्वच्छता, सीएनजी इंधनाच्या वापरला प्रोत्साहन, विद्युत आणि सीएनजीवर चालणाºया वाहनांचा वापर वाढवणे या मुद्द्यांचही आराखड्यात समावेश आहे.

‘शहरांची हवा स्वच्छ आणि आरोग्यदायी रहावी यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ विविध उपाययोजना करत आहे. हवेच्या गुणवत्तेवरही लक्ष ठेवून आहे. ती सुधारण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्यात सुचवलेल्या उपायांची अंमलबजावणी केली जाणार असून, त्यामुळे हवेचा दर्जा वाढण्यास मदत होईल’.- नवनाथ अवताडे, उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpollutionप्रदूषण