शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

फसवणुकीची साखळी : शेती, पोल्ट्रीच्या नावावर नोंदणी, धंदा शेअर मार्केटचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 13:28 IST

विश्वास पाटील कोल्हापूर : दामदुप्पट परतावा देणारी कंपनी म्हणून सध्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करणाऱ्या एका कंपनीची नोंदणी शेती, फलोद्यान ...

विश्वास पाटीलकोल्हापूर : दामदुप्पट परतावा देणारी कंपनी म्हणून सध्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करणाऱ्या एका कंपनीची नोंदणी शेती, फलोद्यान व पोल्ट्रीला लागणारे साहित्य पुरवणी कंपनी म्हणून झाली आहे. त्या नावे कंपनीचा जीएसटी नंबर आहे. रिटेल, होलसेल बिझनेस असे कंपनी स्वत:च्या वेबसाईटवर म्हणते. मग त्यांनी शेतीतून असे कोणते उत्पादन घेतले की त्यातून ते लोकांना त्यांच्या गुंतवणुकीचा मोबदला दुप्पट देत आहेत याची विचारणा ज्यांनी त्यामध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांनीच करण्याची गरज आहे.ज्या कंपनीची नोंदणीच कृषीपूरक व्यवहार करण्यासाठी झाली आहे, ती शेअर्समध्ये कशी गुंतवणूक करू शकेल, ते कायदेशीर आहे का याचा विचार गुंतवणूकदार करायला तयार नाही. किंबहुना आजच्या घडीला तो कशाचाच विचार करायला तयार नाही. अमक्याला एवढे लाख मिळाले, गाडी मिळाली मीच मागे राहिलोय असे वाटून तो स्वत: गुंतवणूक करण्यासाठी आणि इतरांना यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहे. या कंपनीने शेवटचे रिटर्न्स जानेवारी २०२१ मध्ये भरले आहे. त्यानंतर आता दहा महिने झाले तरी त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. सहा महिने रिटर्न्स भरले नसल्यास नोंदणी रद्द होवू शकते असा कायदा आहे व प्रत्यक्षातही तसे घडते. कंपनीची नोंदणी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (एलएलपी) नुसार झाली आहे. ही कंपनी पैसे भरून घेतल्यावर तसे एक साधे पत्र गुंतवणूकदारास देते. त्यास कायदेशीर काहीच अर्थ नाही.

तेवढ्या एका प्रमाणपत्रावर लोक कोट्यवधी रुपये गुंतवत आहेत. त्यामुळे उद्या पैसे मिळेनात म्हणून तुम्ही कोणत्याही यंत्रणेकडे दाद मागायला गेला तरी तुम्हाला तेथून हाकलून देतील. कारण या प्रमाणपत्राला कायदेशीर पुरावा म्हणून शून्य किंमत आहे. तुमच्याकडून पार्टनर म्हणून रक्कम घेतली जात असेल तर कायद्याने पार्टनरशिप करार करणे बंधनकारक असते.बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल..ज्या लोकांनी विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांनी त्या कंपन्यांच्या व्यवहाराचे स्वरुप तपासावे. त्यातील पारदर्शकता जोखावी. तुमच्या कष्टाच्या लाख रुपयाचे दामदुप्पट करून देणारी कंपनी हे पैसे मिळवते कोठून हे तरी एकदा कंपनीच्या संचालकांना किंवा गुंतवणूक करा म्हणून आग्रह धरणाऱ्यास विचारले पाहिजे. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असा व्यवहार झाल्यास यातील बिंग बाहेर पडू शकेल..व्यापक सामाजिक हित- लोकमत गेली पाच दिवस वृत्तमालिकेच्या माध्यमातून या फसवणुकीचा भांडाफोड करत आहे, त्यामागे व्यापक सामाजिक हित आहे. कोणतरी सोम्या-गोम्या उठतो आणि तुम्हाला अमूक वर्षात एवढा फायदा करून देतो असे आश्वासन देतो आणि आपल्या समाजातील जे स्वत:ला सुशिक्षित समजतात असे शिक्षक, डॉक्टरपासून, सरकारी नोकरापर्यंत कोणतीही खातरजमा न करता कोट्यवधी रुपये गुंतवतात.-त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे हे काम आहे. या कंपन्या कोण आहेत, ते कोण चालवतात त्यांच्याशी काही देणेघेणे नाही. जे गुंतवणूक करतात त्यांची फसवणूक होऊ नये, कुणाला तरी आयुष्यातून उठायला लागू नये यासाठीचा हा प्रयत्न आहे.कसबा वाळवेत पैसे मागण्यासाठी तगादादामदुप्पट योजनेत फसवणूक होऊ शकते हे लक्षात आल्यावर आता गुंतवणूकदार ज्यांच्याकडे पैसे गुंतविले होते, त्यांच्याकडे पैसे परत मागण्यासाठी तगादा लावत आहेत. राधानगरी तालुक्यातील एका व्यक्तीने वेल्थ मॅनेजमेंटच्या नावाखाली कंपनी स्थापन करून कसबा वाळवेतून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केले. इतर कंपन्या दामदुप्पट देत असताना हा दामतिप्पट देतो अशी हमी देत होता. त्यामध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांनी दोन दिवसांपूर्वी त्याला गावात बोलवून घेतले व मुद्दल परत करण्याची मागणी केली. त्यांनी ५० लाखांपर्यंतची रक्कम परत केली असल्याची माहिती स्थानिक लोकांनी शनिवारी दिली. तुमच्या गावांतील अमूक इतके कोटी रुपये गुंतवणूक झाली असल्याने सर्वांचे पैसे परत करतो, असेही त्यांनी सांगितले आहे.गावातील ग्रुपवर चर्चा‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या प्रत्येक गावाच्या ग्रुपवर शेअर होत आहेत. कष्टाला मरण नाही.. फसव्या योजनांना बळी पडू नका, असे प्रबोधन लोक करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीStock Marketशेअर बाजार