शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्वच्छता अभियानाला पुन्हा वेग

By admin | Updated: July 5, 2016 00:27 IST

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान : निकषांत बदल; पुरस्कार बक्षिसांच्या रकमेतही मोठी वाढ

प्रकाश पाटील--कोपार्डे --पाच महिन्यांपूर्वी स्थगित करण्यात आलेले संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याबाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जिल्हा परिषदांना दिल्या असून नव्या निकषांप्रमाणे गटाऐवजी थेट तालुका पातळीवर ग्रामपंचायतींची तपासणी होणार आहे. शंभर टक्के हागणदारीमुक्त असणाऱ्या ग्रामपंचायतींना प्राधान्य दिले जाणार आहे. बक्षिसांच्या रकमेतही मोठी वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीचा अभियानात आता सहभाग महत्त्वाचा आहे, असे जिल्हा परिषदांना निर्देश देण्यात आले आहेत.ग्रामीण स्वच्छता हा मूळ उद्देश घेऊन २००१ पासून राज्यात तत्कालीन ग्रामविकासमंत्री आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. तेव्हापासून ग्रामपंचायतींसाठी संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेतली जात आहे. २००३ पासून स्वच्छतेशी व ग्राम विकासाशी निगडित भरीव काम करणाऱ्या जिल्हा, तालुका, विभाग व राज्य पातळीवरही बक्षिसे देण्याचा उपक्रम सुरू केला. राज्यातील अनेक गावांनी लोकसहभागातून याला चळवळीचे स्वरूप देऊन लाखो रुपयांची बक्षिसे मिळविली. राज्यातील अनेक तालुके, ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या.महाराष्ट्रातील हा उपक्रम बघून केंद्र सरकारने ‘निर्मल भारत’ हा उपक्रम सुरू केला. त्यातून चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव केला जात असे. अलीकडे केंद्र सरकारने नावात बदल करून ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले. मात्र, राज्यात सुरू असलेले ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’ स्थगित ठेवण्याचा निर्णय घेऊन ६ फेब्रुवारी २०१६ ला सर्व जिल्हा परिषदांना शासनाने कळविले होते. तेव्हापासून या अभियानातील सर्व उपक्रम जिल्हा परिषदेने बंद केले होते. मात्र, शासनाने त्यात मोठा बदल करीत हे अभियान पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन आॅक्टोबरपासून अभियान प्रारंभराज्यात २० हजार ८०० ग्रामपंचायती असून, त्या २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. दरवर्षी २ आॅक्टोबरपासून अभियान औपचारिकरीत्या सुरू होणार असले तरी १ मेपासून याची पूर्वतयारी सुरू असेल. त्यानंतर महिनाभर जनजागृतीचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जाणार आहेत. स्थगित केलेले अभियान पुन्हा सुरू केल्याने ग्रामीण भागात स्वच्छतेचे पुन्हा वारे वाहू लागणार आहे.