शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

रॉकेल आंदोलनाचे बावीस वर्षांनंतर चटके-सहभागी कार्यकर्त्यांना नोटिसा जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:47 IST

रेशन कार्डावर प्रती माणसी पाच लिटर रॉकेल मिळावे, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) काढलेल्या मोर्चात सहभागी झालेल्या १५८ आंदोलनकर्त्यांना आता २२ वर्षांनंतर न्यायालयीन सुनावणीच्या नोटिसा पोलिसांकडून बजाविण्यात आल्या

ठळक मुद्देमाकपचा इचलकरंजीतील मोर्चा

कोल्हापूर : रेशन कार्डावर प्रती माणसी पाच लिटर रॉकेल मिळावे, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) काढलेल्या मोर्चात सहभागी झालेल्या १५८ आंदोलनकर्त्यांना आता २२ वर्षांनंतर न्यायालयीन सुनावणीच्या नोटिसा पोलिसांकडून बजाविण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्यांची आता चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्यातील ३० हूून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची सुनावणी इचलकरंजीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात मंगळवारी झाली. आता पुढील सुनावणी २१ जूनला होणार आहे.

सार्वजनिक आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांना नंतर किती आणि किती वर्षांनी त्रास होऊ शकतो याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. कोल्हापुरात सध्या आयआरबीच्या टोल विरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवरील गुन्ह्यांचा विषय चर्चेत आहे. हे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ फेब्रुवारी २०१६ ला प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानात झालेल्या सत्कार समारंभात दिले होते, परंतु त्यानंतर सरकारही ते आश्वासन विसरले व कार्यकर्तेही. आता पोलिसांकडून नोटिसा आल्यावर टोल आंदोलनातील कार्यकर्त्यांचीही तारांबळ उडाली आहे. तसाच हा विषय आहे. रेशन आंदोलनात नोटीस बजावणाऱ्या पोलिसांचेही कौतुकच केले पाहिजे. सरकारी खात्यात कालचा कागद आज सापडत नाही.

इथे मात्र त्यांनी तब्बल २२ वर्षे गुन्ह्याची कागदपत्रे जपून ठेवली आहेत. माकपने रेशन कार्डावर प्रती माणसी पाच लिटर रॉकेल मिळाले पाहिजे, या मागणीसाठी इचलकरंजी प्रांत कार्यालयावर २९ जानेवारी १९९६ ला मोर्चा काढला होता; मात्र, त्याचवेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तेथेच धरणे आंदोलन करण्यात आले होते. शिवसेना-भाजप सरकारच्या विरोधी आंदोलन असताना मात्र त्यावेळी माकप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते, आंदोलनकर्त्यांमध्ये काहीवेळ जुंपली. त्यावेळी पोलिसांनी ‘माकप’च्या १५८ कार्यकर्ते, आंदोलकांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी जामीनही दिला होता; मात्र, आता २२ वर्षांनंतर या आंदोलनातील सहभागी आंदोलनकर्ते, कामगार यांना न्यायालयात हजर राहण्याबाबतच्या नोटिसा पोलिसांकडून बजाविण्यात आल्या आहेत.

या १५८ जणांमध्ये सुमारे ७० महिला आहेत. ३० हून अधिक आंदोलनकर्ते मृत झाले आहेत. तितकेच आंदोलनकर्ते वृद्धापकाळ, आजारामुळे अंथरुणावर खिळून आहेत. अनेक आंदोलनकर्त्यांचे पत्ते सापडत नसल्याचे माकपचे जिल्हा कमिटी सदस्य सदा मलाबादे आणि लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमू कांबळे यांनी सांगितले.सरकारने केस मागे घ्यावीसर्वसामान्यांच्या रेशनबाबतच्या न्याय हक्कांसाठी आम्ही मोर्चा काढला होता. त्याबाबत आता २२ वर्षांनी नोटीस पाठविली जात आहे. सरकारने केस मागे घ्यावी, अशी आमची मागणी असल्याचे सदा मलाबादे यांनी सांगितले. 

शासन आदेशाचाविचार व्हावाराज्य शासनाने सन २०१५ मध्ये त्यापूर्वीच्या आंदोलनाबाबतच्या सर्व केसेस काढून टाकण्याचा शासन आदेश काढला आहे. त्याचा विचार भाजप-शिवसेना सरकारने करावा, अशी मागणी भरमू कांबळे यांनी केली.इचलकरंजीत माणसी ५ लिटर रॉकेल मिळावे या मागणीसाठी १९९६ ला काढलेल्या मोर्चाप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी आता कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यासाठी कार्यकर्ते मंगळवारी इचलकरंजी न्यायालयात आले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbusinessव्यवसाय