शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

Kolhapur: इचलकरंजीत नशिल्या पानांचा बाजार, पानटपरीवर तरुणांचा गराडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 18:01 IST

मावा, गुटख्यालाही मागणी जोरदार

अतुल आंबीइचलकरंजी : शहरातील काही ठरावीक पानटपऱ्यांवर दिवसातील ठरावीक वेळेला तरुणांची मोठी गर्दी जमलेली असते. गुटखाबंदीनंतर माव्याकडे वळलेले तरुण आता पानासाठीही गर्दी करू लागले आहेत. पानातील नशेची सवय लागल्याने त्या-त्या वेळेला हे तरुण पानटपरीला गराडा घालून उभे असल्याचे चित्र आहे. ही बाब चिंताजनक असून, याकडे पोलिस व प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.वस्त्रोद्योगाच्या निमित्ताने देशभरातील विविध राज्यांतून नागरिक येथे येऊन स्थायिक झाले आहेत. उत्तर प्रदेश व बिहारकडील कामगार ठरावीक पद्धतीचे पान खातात. त्यासाठीच्या काही ठिकाणी मुख्य मार्गावर उघड्या पद्धतीच्या टपऱ्या आहेत. त्यांची संख्या मर्यादित आहे. परंतु, आजकाल नवीन पद्धतीची पानपट्टी दुकाने थाटलेली दिसतात. कोणत्याही भागात असलेल्या या टपऱ्यांवर तरुणाईची गर्दी जमते. दिवसभरात सहा ते आठवेळा असे विशिष्ट पान खाणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये नेमका कोणता घटक असतो? त्यातून ही सवय जडते, याचा तपास होणे आवश्यक आहे.पूर्वीपासून नागवेलचे पान घेऊन त्याला थोडा चुना, सुपारी आणि कात घालून खाण्याची पद्धत होती. त्यासोबतच पत्ती घालून पान खाणारे व्यसनी ठरू लागले. कालांतराने त्यात वाढ होत रिमझिम पान आले. आता त्यापुढील प्रकार बाजारात आल्याची चर्चा आहे. याचा शरीरावर कोणता विपरीत परिणाम होतो, याचा कोणतीच यंत्रणा तपास करीत नाही.नियमित गुटखा खाणाऱ्यांना तंबाखू आणि सुगंधी सुपारी अशा दोन स्वतंत्र पुड्या घेऊन त्या एकत्र करून खाल्ल्या जातात. त्याची राजरोसपणे सर्वत्र विक्री सुरू आहे, तर मावा विक्रीही जोरदार आहे. काही पानटपऱ्यांमध्ये तरुण नंबर लावून मावा खाण्यासाठी थांबलेले असतात. तेथे पानपट्टीचालक मावा तयार करण्यासाठी सर्व पदार्थ एकत्र करून प्लास्टिक पिशवीत घालून ते घासण्यासाठी संबंधित ग्राहकालाच देतो.

पोलिसांकडून एक दिवस होळीपोलिसांनी होळीच्या दिवशी शहरातील काही पानपट्टीचालकांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांच्याकडील मावा एकत्र करून त्यांनाच त्याची होळी करायला लावली. परंतु, अशी कारवाई नियमित होण्याची गरज आहे.

गुटख्यावरील कारवाई बंदचकाही महिन्यांपासून इचलकरंजीसह हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात गुटख्यावरील कारवाई बंद झाल्याचे दिसते. यामागे नेमके कोणते कारण आहे, याचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शोध घेण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजी