शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

सात वर्षांनी श्रृती नांदायला गेली, दुरावलेली दोन मने पुन्हा एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:10 IST

दुरावलेली दोन मने सात वर्षांनी पुन्हा एकत्र जोडून सुखी संसार जोडण्यामध्ये जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांना यश आले. त्यांच्या कोल्हापुरातील सेवेचा शेवटचा दिवस दि. २४ मे सार्थकी लागला.

ठळक मुद्देसात वर्षांनी श्रृती नांदायला गेली, दुरावलेली दोन मने पुन्हा एकत्र जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांची मध्यस्थी

कोल्हापूर : दुरावलेली दोन मने सात वर्षांनी पुन्हा एकत्र जोडून सुखी संसार जोडण्यामध्ये जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांना यश आले. त्यांच्या कोल्हापुरातील सेवेचा शेवटचा दिवस दि. २४ मे सार्थकी लागला.क्षणात दृष्टिकोन बदलणं हे साधेसुधे स्थित्यंतर नाही. जगातली सर्वांत अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणे. इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते; पण नवा विचार स्वीकारणे ही खूप मोठी घटना आहे.

अशीच एक घटना श्रुती आणि गजानन (नाव बदललं) यांचे लग्न साडेसात वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात करवीर तालुक्यातील गावात ११ जून २०११ रोजी झाले. पाहुण्यांची लगबग सतत घरात असायची. आग लावायचे काम ही त्रयस्थ नातेवाईक करायचे आणि सहा महिन्यांत सुखी संसाराचा विस्फोट झाला. श्रुती आणि गजानन यांची मने दुभंगली, श्रुती आईच्या घरी राहू लागली. दोघांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी दरी पडली.दरम्यान, जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणाच्या वतीने अनेक संसार जोडले, असे वृत्त ‘लोकमत’मध्ये वाचून श्रुतीच्या आईच्या अशा पल्लवित झाल्या. त्या जिल्हा मध्यस्थी केंद्रात आल्या. त्यांनी सचिव मोरे यांची भेट घेऊन मुलीची करुण कहाणी सांगितली. मोरे यांनी धीर देत गजाननच्या नातेवाईकांना बोलवून घेतले.

दोघांच्या मनांतील गैरसमज दूर करीत, नातेवाईकांची समजूत घातली. श्रुती व गजानन यांनी चुकीचे दृष्टिकोन बदलत नवा विचार स्वीकारला. तब्बल सात वर्षांनी एकही पैसे खर्च न करता, सन्मानाने श्रुती गजाननसोबत नांदायला गेली. यावेळी दोघांच्याही आई ही आनंदीभेट डोळ्यांनी पाहत होत्या.

दुरावलेला संसार पुन्हा बहरल्याने त्यांचे डोळे भरून आले. श्रुती आनंदाने आपल्या सासरी गेली. यावेळी मध्यस्थी करणारे प्राधिकरणाचे सचिव मोरे यांनी दोघांना स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक भेट देऊन सुखी संसाराच्या शुभेच्छा दिल्या. मोरे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी बदली झाली आहे. त्यांच्या कोल्हापुरातील सेवेच्या शेवटच्या दिवशी हे आदर्श काम हातून घडले. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर