शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सात वर्षांनी श्रृती नांदायला गेली, दुरावलेली दोन मने पुन्हा एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:10 IST

दुरावलेली दोन मने सात वर्षांनी पुन्हा एकत्र जोडून सुखी संसार जोडण्यामध्ये जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांना यश आले. त्यांच्या कोल्हापुरातील सेवेचा शेवटचा दिवस दि. २४ मे सार्थकी लागला.

ठळक मुद्देसात वर्षांनी श्रृती नांदायला गेली, दुरावलेली दोन मने पुन्हा एकत्र जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांची मध्यस्थी

कोल्हापूर : दुरावलेली दोन मने सात वर्षांनी पुन्हा एकत्र जोडून सुखी संसार जोडण्यामध्ये जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांना यश आले. त्यांच्या कोल्हापुरातील सेवेचा शेवटचा दिवस दि. २४ मे सार्थकी लागला.क्षणात दृष्टिकोन बदलणं हे साधेसुधे स्थित्यंतर नाही. जगातली सर्वांत अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणे. इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते; पण नवा विचार स्वीकारणे ही खूप मोठी घटना आहे.

अशीच एक घटना श्रुती आणि गजानन (नाव बदललं) यांचे लग्न साडेसात वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात करवीर तालुक्यातील गावात ११ जून २०११ रोजी झाले. पाहुण्यांची लगबग सतत घरात असायची. आग लावायचे काम ही त्रयस्थ नातेवाईक करायचे आणि सहा महिन्यांत सुखी संसाराचा विस्फोट झाला. श्रुती आणि गजानन यांची मने दुभंगली, श्रुती आईच्या घरी राहू लागली. दोघांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी दरी पडली.दरम्यान, जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणाच्या वतीने अनेक संसार जोडले, असे वृत्त ‘लोकमत’मध्ये वाचून श्रुतीच्या आईच्या अशा पल्लवित झाल्या. त्या जिल्हा मध्यस्थी केंद्रात आल्या. त्यांनी सचिव मोरे यांची भेट घेऊन मुलीची करुण कहाणी सांगितली. मोरे यांनी धीर देत गजाननच्या नातेवाईकांना बोलवून घेतले.

दोघांच्या मनांतील गैरसमज दूर करीत, नातेवाईकांची समजूत घातली. श्रुती व गजानन यांनी चुकीचे दृष्टिकोन बदलत नवा विचार स्वीकारला. तब्बल सात वर्षांनी एकही पैसे खर्च न करता, सन्मानाने श्रुती गजाननसोबत नांदायला गेली. यावेळी दोघांच्याही आई ही आनंदीभेट डोळ्यांनी पाहत होत्या.

दुरावलेला संसार पुन्हा बहरल्याने त्यांचे डोळे भरून आले. श्रुती आनंदाने आपल्या सासरी गेली. यावेळी मध्यस्थी करणारे प्राधिकरणाचे सचिव मोरे यांनी दोघांना स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक भेट देऊन सुखी संसाराच्या शुभेच्छा दिल्या. मोरे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी बदली झाली आहे. त्यांच्या कोल्हापुरातील सेवेच्या शेवटच्या दिवशी हे आदर्श काम हातून घडले. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर