शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सात वर्षांनी श्रृती नांदायला गेली, दुरावलेली दोन मने पुन्हा एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:10 IST

दुरावलेली दोन मने सात वर्षांनी पुन्हा एकत्र जोडून सुखी संसार जोडण्यामध्ये जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांना यश आले. त्यांच्या कोल्हापुरातील सेवेचा शेवटचा दिवस दि. २४ मे सार्थकी लागला.

ठळक मुद्देसात वर्षांनी श्रृती नांदायला गेली, दुरावलेली दोन मने पुन्हा एकत्र जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांची मध्यस्थी

कोल्हापूर : दुरावलेली दोन मने सात वर्षांनी पुन्हा एकत्र जोडून सुखी संसार जोडण्यामध्ये जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांना यश आले. त्यांच्या कोल्हापुरातील सेवेचा शेवटचा दिवस दि. २४ मे सार्थकी लागला.क्षणात दृष्टिकोन बदलणं हे साधेसुधे स्थित्यंतर नाही. जगातली सर्वांत अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणे. इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते; पण नवा विचार स्वीकारणे ही खूप मोठी घटना आहे.

अशीच एक घटना श्रुती आणि गजानन (नाव बदललं) यांचे लग्न साडेसात वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात करवीर तालुक्यातील गावात ११ जून २०११ रोजी झाले. पाहुण्यांची लगबग सतत घरात असायची. आग लावायचे काम ही त्रयस्थ नातेवाईक करायचे आणि सहा महिन्यांत सुखी संसाराचा विस्फोट झाला. श्रुती आणि गजानन यांची मने दुभंगली, श्रुती आईच्या घरी राहू लागली. दोघांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी दरी पडली.दरम्यान, जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणाच्या वतीने अनेक संसार जोडले, असे वृत्त ‘लोकमत’मध्ये वाचून श्रुतीच्या आईच्या अशा पल्लवित झाल्या. त्या जिल्हा मध्यस्थी केंद्रात आल्या. त्यांनी सचिव मोरे यांची भेट घेऊन मुलीची करुण कहाणी सांगितली. मोरे यांनी धीर देत गजाननच्या नातेवाईकांना बोलवून घेतले.

दोघांच्या मनांतील गैरसमज दूर करीत, नातेवाईकांची समजूत घातली. श्रुती व गजानन यांनी चुकीचे दृष्टिकोन बदलत नवा विचार स्वीकारला. तब्बल सात वर्षांनी एकही पैसे खर्च न करता, सन्मानाने श्रुती गजाननसोबत नांदायला गेली. यावेळी दोघांच्याही आई ही आनंदीभेट डोळ्यांनी पाहत होत्या.

दुरावलेला संसार पुन्हा बहरल्याने त्यांचे डोळे भरून आले. श्रुती आनंदाने आपल्या सासरी गेली. यावेळी मध्यस्थी करणारे प्राधिकरणाचे सचिव मोरे यांनी दोघांना स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक भेट देऊन सुखी संसाराच्या शुभेच्छा दिल्या. मोरे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी बदली झाली आहे. त्यांच्या कोल्हापुरातील सेवेच्या शेवटच्या दिवशी हे आदर्श काम हातून घडले. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर