शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

मतदानानंतर उमेदवारांच्या समर्थकांत संशयकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:50 IST

सांगली : संशयाचे भूत मानगुटीवर घेऊनच उमेदवारांनी हसतमुखाने मतदारांच्या भेटी घेत आभार दौरे सुरू केले आहेत. पक्षांतर्गत सर्वजण प्रामाणिकपणे ...

सांगली : संशयाचे भूत मानगुटीवर घेऊनच उमेदवारांनी हसतमुखाने मतदारांच्या भेटी घेत आभार दौरे सुरू केले आहेत. पक्षांतर्गत सर्वजण प्रामाणिकपणे प्रचार करीत असल्याचा भास निर्माण करून गढूळ वातावरण स्वच्छ करण्याचा प्रयत्नही झाला. आता मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे, गावोगावचे मतांचे अंदाज बांधताना, शंका-कुशंकांचे दळण दळले जात आहे. कोणी कोणाचे आणि कशासाठी काम केले, या प्रश्नांची उत्तरे शोधताना आगामी राजकीय व्यूहरचनाही बांधल्या जात आहेत.प्रचारापेक्षा यंदा भाजप व कॉँग्रेसमधील नेत्यांना पक्षांतर्गत बंडखोरांना थोपविण्यातच अधिक शक्ती खर्च करावी लागली. विरोधकांच्या ताकदीपेक्षा स्वकीयांच्या संशयास्पद भूमिकेची चिंता उमेदवारांना जास्त सतावून गेली. बंडखोर व छुप्या प्रचाराने वातावरण गढूळ होत असताना, प्रमुख उमेदवारांनी ‘आॅल इज वेल’चा भास निर्माण केला. गोंधळ दोन्हीकडे होता. दृश्य आणि अदृश्य स्वरूपाच्या राजकीय खेळ्यांनी उमेदवार हैराण झाले. समोर शत्रू असताना पक्षांतर्गत शत्रूंचीही चिंता त्यांना लागली होती. अखेर या सर्व राजकीय गोंधळात मतदान पार पडले. प्रचार सुरू झाल्यापासून मतदानापर्यंतच्या सर्व राजकीय घटनांचा आढावा आता घेतला जात आहे.भाजपने सुरुवातीला जिल्ह्यातील आमदारांची नाराजी दूर केली. त्यानंतर माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचेही संभाव्य बंडाचे वादळ शमविण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना यश मिळाले. कॉँग्रेसमध्ये पक्षांतर्गत वाद यंदा इतका विकोपाला गेला की, उमेदवारीवरून उघड संशय व्यक्त झाला. पक्षांतर्गत विरोधक एकमेकांसमोर येताना राष्टÑवादी नेत्यांबद्दलही शंका व्यक्त करण्यात आली. ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जाणार म्हटल्यावर कॉँग्रेस कमिटीला कुलूप ठोकण्याचा प्रकारही घडला. अखेर ही जागा काँग्रेसच्या हातून गेली. तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेवार म्हणून काँग्रेस नेते विशाल पाटील यांनाच संधी दिली. पक्षांतर्गत वादावर माफीनामा व आपल्या राजकीय कौशल्याने विशाल पाटील यांनी पडदा टाकला. त्यामुळे सर्व काँग्रेस, राष्टÑवादी व घटकपक्षांचे नेते एकत्र आले. एकत्रितपणे प्रचारही पार पडला. दोन्ही पक्षात प्रचारावेळी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चे गीत गायिले गेले. मतदान प्रक्रिया पार पडली. निकाल अजून महिन्याने लागणार असल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्याचे काम उमेदवारांकडून सुरू आहे. अशावेळी त्यांच्या समर्थकांमध्ये संशयाचे वारे वाहू लागले आहे.संशयाचे वातावरण : का आहे?सांगली लोकसभा मतदारसंघात २0१४ मध्ये राष्टÑवादीची छुपी रसद भाजपला लाभली होती. यंदा राष्टÑवादीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेस उमेदवारासाठी धडपडत असताना दिसत होते. तरीही मागील अनुभवावरून, आता त्यांच्याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे काँग्रेसमधीलच तालुकास्तरावरील विविध नेत्यांत यापूर्वी मतभेद होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू आहे. प्रत्येक तालुक्यातील मताधिक्याच्या गणितावर पुन्हा संशय खरा की खोटा, हे ठरविले जाणार आहे. भाजपमध्येही अशीच स्थिती आहे. आमदार व प्रमुख पदाधिकारी यापूर्वी नाराज होते. त्यांची नाराजी दूर झाली असली तरी, प्रत्यक्ष त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल उमेदवारांच्या समर्थकांत संशय आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर त्यावरून वाद रंगले आहेत.सामान्य नागरिकांतही रंगली चर्चाकोणता नेता कोणाचे काम करणार किंवा कोणाचे कार्यकर्ते कोणाच्या प्रचारात गुंतले होते, याची उघड चर्चा आता नागरिकांत रंगली आहे. राजकीय कार्यकर्त्यांसमोर या चर्चा पोहोचत असल्याने त्यांचा संशय बळावत आहे. निकाल लागेपर्यंत या संशयावरून कोणालाही धारेवर धरता येत नसल्याने, उमेदवारांचे समर्थक आता हृदयावर दगड ठेवून गप्प आहेत.