शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

मतदानानंतर उमेदवारांच्या समर्थकांत संशयकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:50 IST

सांगली : संशयाचे भूत मानगुटीवर घेऊनच उमेदवारांनी हसतमुखाने मतदारांच्या भेटी घेत आभार दौरे सुरू केले आहेत. पक्षांतर्गत सर्वजण प्रामाणिकपणे ...

सांगली : संशयाचे भूत मानगुटीवर घेऊनच उमेदवारांनी हसतमुखाने मतदारांच्या भेटी घेत आभार दौरे सुरू केले आहेत. पक्षांतर्गत सर्वजण प्रामाणिकपणे प्रचार करीत असल्याचा भास निर्माण करून गढूळ वातावरण स्वच्छ करण्याचा प्रयत्नही झाला. आता मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे, गावोगावचे मतांचे अंदाज बांधताना, शंका-कुशंकांचे दळण दळले जात आहे. कोणी कोणाचे आणि कशासाठी काम केले, या प्रश्नांची उत्तरे शोधताना आगामी राजकीय व्यूहरचनाही बांधल्या जात आहेत.प्रचारापेक्षा यंदा भाजप व कॉँग्रेसमधील नेत्यांना पक्षांतर्गत बंडखोरांना थोपविण्यातच अधिक शक्ती खर्च करावी लागली. विरोधकांच्या ताकदीपेक्षा स्वकीयांच्या संशयास्पद भूमिकेची चिंता उमेदवारांना जास्त सतावून गेली. बंडखोर व छुप्या प्रचाराने वातावरण गढूळ होत असताना, प्रमुख उमेदवारांनी ‘आॅल इज वेल’चा भास निर्माण केला. गोंधळ दोन्हीकडे होता. दृश्य आणि अदृश्य स्वरूपाच्या राजकीय खेळ्यांनी उमेदवार हैराण झाले. समोर शत्रू असताना पक्षांतर्गत शत्रूंचीही चिंता त्यांना लागली होती. अखेर या सर्व राजकीय गोंधळात मतदान पार पडले. प्रचार सुरू झाल्यापासून मतदानापर्यंतच्या सर्व राजकीय घटनांचा आढावा आता घेतला जात आहे.भाजपने सुरुवातीला जिल्ह्यातील आमदारांची नाराजी दूर केली. त्यानंतर माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचेही संभाव्य बंडाचे वादळ शमविण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना यश मिळाले. कॉँग्रेसमध्ये पक्षांतर्गत वाद यंदा इतका विकोपाला गेला की, उमेदवारीवरून उघड संशय व्यक्त झाला. पक्षांतर्गत विरोधक एकमेकांसमोर येताना राष्टÑवादी नेत्यांबद्दलही शंका व्यक्त करण्यात आली. ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जाणार म्हटल्यावर कॉँग्रेस कमिटीला कुलूप ठोकण्याचा प्रकारही घडला. अखेर ही जागा काँग्रेसच्या हातून गेली. तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेवार म्हणून काँग्रेस नेते विशाल पाटील यांनाच संधी दिली. पक्षांतर्गत वादावर माफीनामा व आपल्या राजकीय कौशल्याने विशाल पाटील यांनी पडदा टाकला. त्यामुळे सर्व काँग्रेस, राष्टÑवादी व घटकपक्षांचे नेते एकत्र आले. एकत्रितपणे प्रचारही पार पडला. दोन्ही पक्षात प्रचारावेळी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चे गीत गायिले गेले. मतदान प्रक्रिया पार पडली. निकाल अजून महिन्याने लागणार असल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्याचे काम उमेदवारांकडून सुरू आहे. अशावेळी त्यांच्या समर्थकांमध्ये संशयाचे वारे वाहू लागले आहे.संशयाचे वातावरण : का आहे?सांगली लोकसभा मतदारसंघात २0१४ मध्ये राष्टÑवादीची छुपी रसद भाजपला लाभली होती. यंदा राष्टÑवादीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेस उमेदवारासाठी धडपडत असताना दिसत होते. तरीही मागील अनुभवावरून, आता त्यांच्याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे काँग्रेसमधीलच तालुकास्तरावरील विविध नेत्यांत यापूर्वी मतभेद होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू आहे. प्रत्येक तालुक्यातील मताधिक्याच्या गणितावर पुन्हा संशय खरा की खोटा, हे ठरविले जाणार आहे. भाजपमध्येही अशीच स्थिती आहे. आमदार व प्रमुख पदाधिकारी यापूर्वी नाराज होते. त्यांची नाराजी दूर झाली असली तरी, प्रत्यक्ष त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल उमेदवारांच्या समर्थकांत संशय आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर त्यावरून वाद रंगले आहेत.सामान्य नागरिकांतही रंगली चर्चाकोणता नेता कोणाचे काम करणार किंवा कोणाचे कार्यकर्ते कोणाच्या प्रचारात गुंतले होते, याची उघड चर्चा आता नागरिकांत रंगली आहे. राजकीय कार्यकर्त्यांसमोर या चर्चा पोहोचत असल्याने त्यांचा संशय बळावत आहे. निकाल लागेपर्यंत या संशयावरून कोणालाही धारेवर धरता येत नसल्याने, उमेदवारांचे समर्थक आता हृदयावर दगड ठेवून गप्प आहेत.