शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मतदानानंतर उमेदवारांच्या समर्थकांत संशयकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:50 IST

सांगली : संशयाचे भूत मानगुटीवर घेऊनच उमेदवारांनी हसतमुखाने मतदारांच्या भेटी घेत आभार दौरे सुरू केले आहेत. पक्षांतर्गत सर्वजण प्रामाणिकपणे ...

सांगली : संशयाचे भूत मानगुटीवर घेऊनच उमेदवारांनी हसतमुखाने मतदारांच्या भेटी घेत आभार दौरे सुरू केले आहेत. पक्षांतर्गत सर्वजण प्रामाणिकपणे प्रचार करीत असल्याचा भास निर्माण करून गढूळ वातावरण स्वच्छ करण्याचा प्रयत्नही झाला. आता मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे, गावोगावचे मतांचे अंदाज बांधताना, शंका-कुशंकांचे दळण दळले जात आहे. कोणी कोणाचे आणि कशासाठी काम केले, या प्रश्नांची उत्तरे शोधताना आगामी राजकीय व्यूहरचनाही बांधल्या जात आहेत.प्रचारापेक्षा यंदा भाजप व कॉँग्रेसमधील नेत्यांना पक्षांतर्गत बंडखोरांना थोपविण्यातच अधिक शक्ती खर्च करावी लागली. विरोधकांच्या ताकदीपेक्षा स्वकीयांच्या संशयास्पद भूमिकेची चिंता उमेदवारांना जास्त सतावून गेली. बंडखोर व छुप्या प्रचाराने वातावरण गढूळ होत असताना, प्रमुख उमेदवारांनी ‘आॅल इज वेल’चा भास निर्माण केला. गोंधळ दोन्हीकडे होता. दृश्य आणि अदृश्य स्वरूपाच्या राजकीय खेळ्यांनी उमेदवार हैराण झाले. समोर शत्रू असताना पक्षांतर्गत शत्रूंचीही चिंता त्यांना लागली होती. अखेर या सर्व राजकीय गोंधळात मतदान पार पडले. प्रचार सुरू झाल्यापासून मतदानापर्यंतच्या सर्व राजकीय घटनांचा आढावा आता घेतला जात आहे.भाजपने सुरुवातीला जिल्ह्यातील आमदारांची नाराजी दूर केली. त्यानंतर माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचेही संभाव्य बंडाचे वादळ शमविण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना यश मिळाले. कॉँग्रेसमध्ये पक्षांतर्गत वाद यंदा इतका विकोपाला गेला की, उमेदवारीवरून उघड संशय व्यक्त झाला. पक्षांतर्गत विरोधक एकमेकांसमोर येताना राष्टÑवादी नेत्यांबद्दलही शंका व्यक्त करण्यात आली. ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जाणार म्हटल्यावर कॉँग्रेस कमिटीला कुलूप ठोकण्याचा प्रकारही घडला. अखेर ही जागा काँग्रेसच्या हातून गेली. तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेवार म्हणून काँग्रेस नेते विशाल पाटील यांनाच संधी दिली. पक्षांतर्गत वादावर माफीनामा व आपल्या राजकीय कौशल्याने विशाल पाटील यांनी पडदा टाकला. त्यामुळे सर्व काँग्रेस, राष्टÑवादी व घटकपक्षांचे नेते एकत्र आले. एकत्रितपणे प्रचारही पार पडला. दोन्ही पक्षात प्रचारावेळी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चे गीत गायिले गेले. मतदान प्रक्रिया पार पडली. निकाल अजून महिन्याने लागणार असल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्याचे काम उमेदवारांकडून सुरू आहे. अशावेळी त्यांच्या समर्थकांमध्ये संशयाचे वारे वाहू लागले आहे.संशयाचे वातावरण : का आहे?सांगली लोकसभा मतदारसंघात २0१४ मध्ये राष्टÑवादीची छुपी रसद भाजपला लाभली होती. यंदा राष्टÑवादीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेस उमेदवारासाठी धडपडत असताना दिसत होते. तरीही मागील अनुभवावरून, आता त्यांच्याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे काँग्रेसमधीलच तालुकास्तरावरील विविध नेत्यांत यापूर्वी मतभेद होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू आहे. प्रत्येक तालुक्यातील मताधिक्याच्या गणितावर पुन्हा संशय खरा की खोटा, हे ठरविले जाणार आहे. भाजपमध्येही अशीच स्थिती आहे. आमदार व प्रमुख पदाधिकारी यापूर्वी नाराज होते. त्यांची नाराजी दूर झाली असली तरी, प्रत्यक्ष त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल उमेदवारांच्या समर्थकांत संशय आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर त्यावरून वाद रंगले आहेत.सामान्य नागरिकांतही रंगली चर्चाकोणता नेता कोणाचे काम करणार किंवा कोणाचे कार्यकर्ते कोणाच्या प्रचारात गुंतले होते, याची उघड चर्चा आता नागरिकांत रंगली आहे. राजकीय कार्यकर्त्यांसमोर या चर्चा पोहोचत असल्याने त्यांचा संशय बळावत आहे. निकाल लागेपर्यंत या संशयावरून कोणालाही धारेवर धरता येत नसल्याने, उमेदवारांचे समर्थक आता हृदयावर दगड ठेवून गप्प आहेत.