शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

वीरशैव बँकेची अखेर निवडणूक

By admin | Updated: August 22, 2015 00:58 IST

बिनविरोधचा प्रयत्न असफल : १८ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात

कोल्हापूर : येथील श्री वीरशैव को-आॅप. बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी अनुसूचित जातीसाठी जागेइतकेच अर्ज शिल्लक राहिल्याने चंद्रकांत स्वामी यांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित १८ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. अखेरच्या क्षणापर्यंत बिनविरोधसाठी सुरू असलेले प्रयत्न फसल्याने अखेर निवडणूक लागली आहे. ६ सप्टेंबरला मतदान आणि ७ रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांनी ही माहिती दिली. बँकेची निवडणूक पाच वर्षांनी होते. १९ जागांसाठी १ आॅगस्टपासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. सर्वसाधारण गटासाठी ५१ जणांचे ७६, अनुसूचित जातीसाठी दोघांचे तीन, भटक्या विमुक्तसाठी चौघांचे ६, मागासवर्गीयांसाठी १० जणांचे १२, महिला गटासाठी आठजणांचे ११ असे ७६ जणांचे १०८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर ४५ अर्ज पात्र ठरले. या पात्र ठरलेल्या अर्जांच्या माघारीचा शेवटचा दिवस होता. येथील पर्ल हॉटेलशेजारील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात माघारीची प्रक्रिया झाली. दुपारी तीनपर्यंत १६ जणांनी माघार घेतली. २९ जण रिंगणात राहिले. ‘लिंगायत समाजाची बॅँक’ अशी या बँकेची ओळख आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांत बॅँकेचे अधिक सभासद आहेत. बँकेची कामगिरी चांगली असल्यामुळे संचालक होण्यासाठी मोठी रस्सीखेच असते. निवडणुकीचा खर्च टाळण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून सुरू होता. मात्र, सत्ताधाऱ्यांमध्ये दोन-तीन दशके संचालक म्हणून कार्यरत असलेल्यांना बाजूला करून नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी विरोधी परिवर्तन पॅनेलची मागणी होती. या मागणीचा विचार झाल्यास निवडणूक बिनविरोध झाली असती. परंतु, माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत बिनविरोधसाठी दोन्ही बाजंूनी फारसे प्रयत्न झाले नाहीत. अखेरच्या दिवशी जोरदार प्रयत्न केले. मात्र, वेळ अपुरा पडल्याने शेवटी निवडणूक लागली. सत्ताधारी विरुद्ध विरोधी अशी दुरंगी लढत होणार आहे. विरोधी पॅनेलचे अधिकृत नाव जाहीर झालेले नाही. विरोधी पॅनेलचे वसंत सांगवडेकर, दिनेश पर्वते-पाटील, एस. के. माळी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी, तर सत्ताधाऱ्यांचे नेतृत्व दिवंगत सा. रे. पाटील यांचे चिरंजीव गणपतराव पाटील, नानासाहेब नष्टे करीत आहेत. या अटीतटीच्या निवडणुकीकडे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)