शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

‘चिकोत्रा’नंतर वेदगंगा नदी कोरडीठाक

By admin | Updated: December 28, 2015 00:23 IST

आठवडाभरापासून कोरडीच : शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न होणार गंभीर; शेतकरी चिंतेत

दत्तात्रय पाटील -- म्हाकवे -गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच डिसेंबर महिन्यात वेदगंगा नदी पूर्णत: कोरडी पडली आहे, तर दूधगंगा नदीतही अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे धरणाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या वेदगंगेसह दूधगंगा नदीकाठावरील गावांमध्ये पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. भविष्यातही हीच परिस्थिती राहणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ग्रामस्थ धास्तावले आहेत. यंदा कमी पावसामुळे काळम्मावाडी धरणामध्ये अवघा १९ टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे. डिसेंबरपर्यंत यातील साधारण ७ टीएमसी पाण्याचा वापर झाला. त्यामुळे धरणात सध्या केवळ १२.६४ टी.एम.सी. इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी जूनअखेरीस शेतीसह पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी देऊनही ७ टी.एम.सी. इतके पाणी शिल्लक राहिले होते. चिकोत्रा धरणातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे चिकोत्रा नदी प्रत्येक महिन्यात १५ ते २0 दिवस कोरडीच असते, तर आता वेदगंगा नदीही चिकोत्राच्याच वाटेवर जात असल्याच्या प्रतिक्रिया येथील नागरिकांतून व्यक्त होत आहेत. १९९५ मध्ये तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री सदाशिवराव मंडलिक यांनी नाल्यातून वेदगंगा नदीमध्ये पाणी सोडले. त्यामुळे अप्रत्यक्षपणे वेदगंगा व दूधगंगा नद्या जोडल्या गेल्या. किंबहुना यामुळे वेदगंगा नदीकाठावरील निढोरी, कुरुकली, सुरुपली, मुरगूड, भडगाव, कुरणी, चौंडाळे, मळगे, बानगे, आणुर, बस्तवडे, म्हाकवे, कौलगे, नानीबाई चिखली यासह सीमाभागातील गावातील कृषिक्रांतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निकालात निघाला. मात्र, यावर्षी पाऊस अपुरा पडल्याने काळम्मावाडी धरण केवळ २१ टीएमसीपर्यंत भरले. त्यामुळे कोल्हापूर, इचलकरंजी, शहरासह, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा नदीकाठावरील गावांची तहान भागविण्यासह असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. यासाठी खबरदारी घेत जादा पाणी लागणारी ऊस, केळी, यासारख्या पिकांची लावणी करू नये. यासह ग्रामस्थांनी पिण्याचे पाणीही वाया जाऊ न देता काटकसरीने वापरावे, अशा नोटीस दिल्या आहेत. मात्र, याकडे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी दुर्लक्ष करीत आपल्याला पाणी कमी पडणार नाही असे समजून उसासह केळीच्याही लावणी केल्या आहेत. पाण्याची दाहकता२७ टी.एम.सी. पाणीसाठ्याची क्षमता असणाऱ्या काळम्मावाडी धरणात गतवर्षी २५.४0 टी.एम.सी. पाणी सोडले होते. त्यातील वर्षभर पिण्यासह शेतीसाठी पाणी देऊन ७ टी.एम.सी.हून अधिक पाणी शिल्लक होत. यावर्षी केवळ १२ टी.एम.सी. इतक्याच पाण्याची भर पडली, तर पावसाचा हंगाम असणाऱ्या ऐन आॅक्टोबर महिन्यासाठी नदी कालव्यांना पाणी सोडावे लागते. त्यामुळे २३ डिसेंबर रोजी या धरणातील पाणीसाठा १२.६४ टी.एम.सी. इतकाच राहिला आहे. त्यामुळे अद्याप सहा महिने या तुटपुंज्या ५0 टक्के पाणीसाठ्यावर ढकलावी लागणार आहेत.टंचाई काळात पाटगावचे पाणी वेदगंगेत सोडावेपाटगांव धरण हे वेदगंगा नदीवर बांधण्यात आले आहे; मात्र या धरणाचे पाणलोट क्षेत्र फारच कमी आहे. या धरणातील पाणी केवळ वाघापूर जवळील बंधाऱ्यापर्यंत सोडण्यात येते, तर त्या पुढील गावांना काळम्मावाडी धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे किमान टंचाईच्या काळात तरी पाटगांवचे पाणी वाघापूर बंधाऱ्यातून खाली सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांतून होत आहे.