शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्य, डाळीनंतर आता भाजीपालाही कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 10:37 IST

market, vegitabale, kolhapurnews कांदा, बटाटा, डाळी, कडधान्यानंतर आता भाजीपाल्याचे दरही कडाडले आहेत. किलोचे भाव १०० रुपयांवर पोहोचल्याने किचन बजेटही कोलमडले आहे. परवडत नसल्याने ताटातून भाज्याच गायब झाल्या आहेत. बाजारात आवकही कमी झाली आहे. पावसामुळे प्रत खालावली तरी व्यापाऱ्यांकडून मात्र चढ्या भावाने विक्री होत आहे.

ठळक मुद्देकडधान्य, डाळीनंतर आता भाजीपालाही कडाडला किचन बजेट कोलमडले : परतीच्या पावसामुळे आवक घटली

कोल्हापूर: कांदा, बटाटा, डाळी, कडधान्यानंतर आता भाजीपाल्याचे दरही कडाडले आहेत. किलोचे भाव १०० रुपयांवर पोहोचल्याने किचन बजेटही कोलमडले आहे. परवडत नसल्याने ताटातून भाज्याच गायब झाल्या आहेत. बाजारात आवकही कमी झाली आहे. पावसामुळे प्रत खालावली तरी व्यापाऱ्यांकडून मात्र चढ्या भावाने विक्री होत आहे.नवरात्रौत्सव काळात शाकाहारवरच भर असल्याने भाजीपाल्याची मागणी वाढते; पण बाजारात भाजीपालाच नाही. मार्केट यार्डात सौद्याला येणारा कृषिमालही कमी झाला आहे. याला गेले आठवडाभर सुरू असलेल्या परतीचा पाऊस कारणीभूत ठरला आहे. कोल्हापुरात आजूबाजूच्या तालुक्यांसह शेजारच्या कर्नाटक, सांगली, सोलापूर येथून कृषी माल सौद्यासाठी येतो; पण आठवडाभर सर्वदूर पाऊस कोसळत आहे.

ढगफुटीसारख्या पडलेल्या या पावसामुळे भाजीपाल्याची पिके पाण्याखाली गेली आहेत. बऱ्याच ठिकाणी शेतमाल झाडावरच कुजला आहे, तर कुठे त्याची तोडणी करण्यासाठी शिवारात जाता येत नसल्याने तो बाजारापर्यंत येऊ शकलेला नाही. परिणामी बाजारात सध्या भाजीपाल्याचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. जो काही भाजीपाला बाजारात आला आहे, तोही निकृष्ट आहे. त्याची प्रत खूपच खालावलेली आहे.वांगी, दोडका, बिन्स, कोबी, कारले, फ्लॉवर, गवार, इतक्याच भाज्या बाजारात दिसत आहेत. त्याची गुणवत्ताही कमालीची खालावलेली आहे. तरी त्याचा दर १०० ते १२० रुपये किलो असा आहे. मागील आठवड्यात ३५ ते ४० रुपये किलो असणारी हिरवी मिरची आता ८० रुपये किलोवर गेली आहे.पालेभाज्या ३० रुपये पेंढी मेथीकांदेपात, पोकळा, शेपू या दहा ते पंधरा रुपये पेंढी मिळत होत्या. त्याची किंमत आज ३० रुपये झाली आहे. घाउक बाजारात हाच दर शेकड्याला ८०० ते हजार रुपये आहे; पण किरकोळ बाजारात मात्र तिप्पट दराने विकल्या जात आहेत.टोमॅटोची आवक दिसत आहे; पण त्याची प्रत खालावलेलीच आहे. दरही किलोला ४० ते ५० रुपये असेच आहेत. कोथिंबीर एक हजार रुपये शेकडा असली तरी किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये पेंढी अशा चढ्या दराने विक्री होत आहे.कडधान्येही आवाक्याबाहेरभाजीपाला महागला आहे, म्हणून कडधान्ये खायची म्हटली तरी तीही आधीच कडाडली आहेत. गेल्या पंधरवड्यापासून कडधान्याचे दरही वाढले आहेत. तूर १२५, मूग ९४, वाटाणा ११०, चवळी ७०, हरभरा ७५, मसुरा ८० असे सर्वसाधारण दर आहे. मागच्या महिन्यात हेच दर ६० ते ७० च्या आसपास होते.कांदे दरात आणखी उसळीकांद्याच्या दरात आणखी वाढ झाली असून, घाऊक बाजारात कमाल दर ६०, तर किमान ४० रुपये किलो झाला आहे. किरकोळ बाजारातही हीच परिस्थिती असून, निकृष्ट पद्धतीचा भिजका कांदा ५० ते ६० रुपयांना विकला जात आहे.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजारkolhapurकोल्हापूर