शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

कडधान्य, डाळीनंतर आता भाजीपालाही कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 10:37 IST

market, vegitabale, kolhapurnews कांदा, बटाटा, डाळी, कडधान्यानंतर आता भाजीपाल्याचे दरही कडाडले आहेत. किलोचे भाव १०० रुपयांवर पोहोचल्याने किचन बजेटही कोलमडले आहे. परवडत नसल्याने ताटातून भाज्याच गायब झाल्या आहेत. बाजारात आवकही कमी झाली आहे. पावसामुळे प्रत खालावली तरी व्यापाऱ्यांकडून मात्र चढ्या भावाने विक्री होत आहे.

ठळक मुद्देकडधान्य, डाळीनंतर आता भाजीपालाही कडाडला किचन बजेट कोलमडले : परतीच्या पावसामुळे आवक घटली

कोल्हापूर: कांदा, बटाटा, डाळी, कडधान्यानंतर आता भाजीपाल्याचे दरही कडाडले आहेत. किलोचे भाव १०० रुपयांवर पोहोचल्याने किचन बजेटही कोलमडले आहे. परवडत नसल्याने ताटातून भाज्याच गायब झाल्या आहेत. बाजारात आवकही कमी झाली आहे. पावसामुळे प्रत खालावली तरी व्यापाऱ्यांकडून मात्र चढ्या भावाने विक्री होत आहे.नवरात्रौत्सव काळात शाकाहारवरच भर असल्याने भाजीपाल्याची मागणी वाढते; पण बाजारात भाजीपालाच नाही. मार्केट यार्डात सौद्याला येणारा कृषिमालही कमी झाला आहे. याला गेले आठवडाभर सुरू असलेल्या परतीचा पाऊस कारणीभूत ठरला आहे. कोल्हापुरात आजूबाजूच्या तालुक्यांसह शेजारच्या कर्नाटक, सांगली, सोलापूर येथून कृषी माल सौद्यासाठी येतो; पण आठवडाभर सर्वदूर पाऊस कोसळत आहे.

ढगफुटीसारख्या पडलेल्या या पावसामुळे भाजीपाल्याची पिके पाण्याखाली गेली आहेत. बऱ्याच ठिकाणी शेतमाल झाडावरच कुजला आहे, तर कुठे त्याची तोडणी करण्यासाठी शिवारात जाता येत नसल्याने तो बाजारापर्यंत येऊ शकलेला नाही. परिणामी बाजारात सध्या भाजीपाल्याचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. जो काही भाजीपाला बाजारात आला आहे, तोही निकृष्ट आहे. त्याची प्रत खूपच खालावलेली आहे.वांगी, दोडका, बिन्स, कोबी, कारले, फ्लॉवर, गवार, इतक्याच भाज्या बाजारात दिसत आहेत. त्याची गुणवत्ताही कमालीची खालावलेली आहे. तरी त्याचा दर १०० ते १२० रुपये किलो असा आहे. मागील आठवड्यात ३५ ते ४० रुपये किलो असणारी हिरवी मिरची आता ८० रुपये किलोवर गेली आहे.पालेभाज्या ३० रुपये पेंढी मेथीकांदेपात, पोकळा, शेपू या दहा ते पंधरा रुपये पेंढी मिळत होत्या. त्याची किंमत आज ३० रुपये झाली आहे. घाउक बाजारात हाच दर शेकड्याला ८०० ते हजार रुपये आहे; पण किरकोळ बाजारात मात्र तिप्पट दराने विकल्या जात आहेत.टोमॅटोची आवक दिसत आहे; पण त्याची प्रत खालावलेलीच आहे. दरही किलोला ४० ते ५० रुपये असेच आहेत. कोथिंबीर एक हजार रुपये शेकडा असली तरी किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये पेंढी अशा चढ्या दराने विक्री होत आहे.कडधान्येही आवाक्याबाहेरभाजीपाला महागला आहे, म्हणून कडधान्ये खायची म्हटली तरी तीही आधीच कडाडली आहेत. गेल्या पंधरवड्यापासून कडधान्याचे दरही वाढले आहेत. तूर १२५, मूग ९४, वाटाणा ११०, चवळी ७०, हरभरा ७५, मसुरा ८० असे सर्वसाधारण दर आहे. मागच्या महिन्यात हेच दर ६० ते ७० च्या आसपास होते.कांदे दरात आणखी उसळीकांद्याच्या दरात आणखी वाढ झाली असून, घाऊक बाजारात कमाल दर ६०, तर किमान ४० रुपये किलो झाला आहे. किरकोळ बाजारातही हीच परिस्थिती असून, निकृष्ट पद्धतीचा भिजका कांदा ५० ते ६० रुपयांना विकला जात आहे.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजारkolhapurकोल्हापूर