शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

अखेर निसर्गच धावला लोकांच्या मदतीला; तीन दिवस चांगली उसंत : जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:25 IST

कोल्हापूर : दोन दिवसांत अस्मानी संकट घेऊन आलेला निसर्गच मागील तीन दिवसांत लोकांच्या मदतीला धावल्याचे दिलासादायक चित्र कोल्हापुरात अनुभवण्यास ...

कोल्हापूर : दोन दिवसांत अस्मानी संकट घेऊन आलेला निसर्गच मागील तीन दिवसांत लोकांच्या मदतीला धावल्याचे दिलासादायक चित्र कोल्हापुरात अनुभवण्यास येत आहे. शनिवारपासून सोमवारपर्यंत पावसाने चांगलीच उसंत दिली. त्यामुळे मदतकार्यापासून जनजीवनही सुरळीत होण्यास मदत झाली. अखेर निसर्गालाच माणसाची दया आल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली. सततचा कोसळणारा पाऊस आणि त्यामुळे तयार झालेली भीती, दिवसभर उन्हाची तिरीप पडल्याने कमी झाली.

गेले तीन दिवस चांगले ऊन पडत आहे. त्यामुळे लोकांच्या जगण्यातही उत्साह जाणवत आहे. कोरोना, महापूर यासारखी संकटे लागोपाठ आली आहेत. त्यामुळे समाजाच्या मनांवर एक निराशेचे मळभ दाटून आले होते. त्यातच दोन दिवसांच्या धडकी भरवणाऱ्या पावसाने लोकांचे जगण्याचे वांदे करून टाकले. शेवटी निसर्गालाच दया आली आणि पावसाने विश्रांती घेतली. दिवसभर चांगले ऊन पडल्याने लोकांना विविध कामांसाठी बाहेर पडणे शक्य झाले. भाजीपाला, औषधापासून जीवनोपयोगी वस्तू ते अगदी चिरमुरे-फुटाणेही जाऊन आणता आले. पाण्याची टंचाई होती; परंतु त्यावरही काही तरी शोधाशोध करता आली. पाऊस सतत कोसळत राहिला, तर घरातून बाहेर पाय काढता येत नाही. बाहेर पाऊस आणि दूरचित्रवाहिन्यांवरील बातम्यांतही पाऊस, यामुळे नैराश्य वाढते. त्याला या तीन दिवसांत फाटा मिळाला.

या उघडिपीची बचावकार्यात नेमकी काय मदत झाली का, हे रेडक्रॉसच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख अमरदीप पाटील यांच्याकडून ‘लोकमत’ने जाणून घेतले. ते म्हणाले, पाऊस थांबल्याने बचावकार्य फारच सुलभ झाले. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला तातडीने मदत पोहोच करता आली. आमच्या हेल्पलाईनला दिवसभरात किमान कोल्हापूर शहरातून ४० हून अधिक फोन येतात. त्यांच्यापर्यंत जेवणासह, वैद्यकीय मदत पोहोचवताना पाऊस असताना आम्हाला मर्यादा येत असत. अनेक ठिकाणी सहा-सात लोक स्थलांतरित झाले आहेत. त्यांना जेवण पुरवायचे झाल्यास कारमधून नेताना पुरामुळे बंद झालेल्या रस्त्यांची अडचण होत असे. आता मदतीचा फोन आला की, आमचे कार्यकर्ते लगेच मोटारसायकलवरून जाऊन हवी ती मदत पोहोच करत आहेत. रविवारी एका बाळाला रुग्णालयात न्यायचे होते. त्याच्यापर्यंत तातडीने पोहोचून बाळाला रुग्णालयात दाखल करणे शक्य झाले.

हा निसर्गाचा हातभारच जणू...

एका अपार्टमेंटमधून जनरेटरचे पेट्रोल संपले म्हणून फोन आला, एक कार्यकर्ता तातडीने कॅनमधून पेट्रोल घेऊन त्यांना देऊन आला. अशी अनेक कामे पाऊस नसल्याने करणे सहज शक्य झाले. अमरदीप पाटील यांच्यासोबत सातजण गेले चार दिवस हे मानवतेचे काम करत आहेत व हे काम सुलभ होण्यास निसर्ग हातभार लावत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.