शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

अखेर कारखानदार झुकले..!

By admin | Updated: December 18, 2015 01:18 IST

कोल्हापुरात निर्णय : ‘एफआरपी’च्या ८० टक्के रक्कम देणार

कोल्हापूर : पहिला हप्ता १७०० रुपयेच देणार, असे म्हणणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गुरुवारी नरमाईची भूमिका घेत शासन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निश्चित केलेला ‘८०-२० फॉर्म्युला’ मान्य केला. शासनाने कारवाईच्या हालचाली सुरू केल्यामुळे कारखानदारांना अखेर झुकावे लागले. त्यामुळे गळीत हंगाम सुरळीत होण्याचा मार्ग खुला झाला. येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते. मुश्रीफ म्हणाले,‘ एकरकमी एफआरपी देणे शक्य नसल्यामुळे महिन्यापूर्वी कारखानदारांची बैठक घेऊन पहिला हप्ता १७०० रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शासन, साखर संघ, शेतकरी संघटना, कारखानदारांशी चर्चा करून ८०-२० टक्क्यांप्रमाणे एफआरपी देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार गुरुवारी झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या बैठकीत ८०-२० चा फॉर्म्युला मान्य केला आहे.’ यंदा एकरकमी एफआरपीवरच हंगाम सुरू झाला; पण साखरेचा दर व कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी ‘८०-२०’ टक्क्यांचा फॉर्म्युला मांडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन पावले माघार घेत त्यावर ११ डिसेंबरला शिक्कामोर्तब केले. मात्र, यापूर्वी सर्व कारखानदारांनी एकत्र येऊन बैठक घेत ‘एफआरपी’च्या ७० टक्क्यांप्रमाणे सरासरी १७०० रुपयांचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला. ‘८०-२०’ चा फॉर्म्युला ठरला तरी जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी १७०० रुपयेच पहिला हप्ता उत्पादकांच्या खात्यावर जमा केले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली. दोन दिवसांपासून संघटना आंदोलन करत असल्यामुळे अनेक ठिकाणी ऊस तोड बंद झाली होती. कारखाने बंद पाडण्याचे नियोजन ‘स्वाभिमानी’ने केले आहे. आंदोलनाची व्यापकता वाढते आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी जिल्हा बँकेत कारखानदारांची गुरुवारी बैठक झाली. बैठकीला सायंकाळी साडेसहा वाजता सुरुवात झाली. उपस्थित सर्वच कारखानदारांनी आपली आपली भूमिका मांडली. कारखानदारीसमोरील समस्या सांगितल्या. अन्य जिल्'ांतील साखर कारखानदारांशी बैठकीतच संपर्क साधून ‘८०-२० फॉर्म्युला’ मान्य आहे का, अशी विचारणा केली. त्यावेळी आम्ही १५०० रुपयांवर पहिला हप्ता देणार नाही, असे इतर जिल्'ांतील कारखानदारांनी सांगितले. या विषयावरही चर्चा रंगली. कोल्हापूर जिल्'ातही पहिला हप्ता १७०० रुपयांवर देणे शक्य नाही, असा कारखानदारांनी सूर काढला. आंदोलन तीव्र झाले तर कारखाने आठ दिवस बंद ठेवू मात्र १७०० रुपयांवर देणे शक्य नाही, असे बहुतांशी साखर कारखानदारांचे म्हणणे होते. कारखाने बंद ठेवल्यानंतर शेतकऱ्यांतून उठाव होईल नंतर आपोआप हंगाम सुरळीत होईल, असे मत काही कारखानदारांनी मांडले. बैठकीस शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, बिद्रीचे के. पी. पाटील, मंडलिक कारखान्याचे संजय मंडलिक, शरद साखर कारखान्याचे राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्त शिरोळचे गणपतराव पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, ‘वारणा समुहाचे नेते व जनसुराज्य’चे विनय कोरे, आजरा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यासह कारखानदार उपस्थित होते.