शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कारखानदार झुकले..!

By admin | Updated: December 18, 2015 01:18 IST

कोल्हापुरात निर्णय : ‘एफआरपी’च्या ८० टक्के रक्कम देणार

कोल्हापूर : पहिला हप्ता १७०० रुपयेच देणार, असे म्हणणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गुरुवारी नरमाईची भूमिका घेत शासन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निश्चित केलेला ‘८०-२० फॉर्म्युला’ मान्य केला. शासनाने कारवाईच्या हालचाली सुरू केल्यामुळे कारखानदारांना अखेर झुकावे लागले. त्यामुळे गळीत हंगाम सुरळीत होण्याचा मार्ग खुला झाला. येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते. मुश्रीफ म्हणाले,‘ एकरकमी एफआरपी देणे शक्य नसल्यामुळे महिन्यापूर्वी कारखानदारांची बैठक घेऊन पहिला हप्ता १७०० रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शासन, साखर संघ, शेतकरी संघटना, कारखानदारांशी चर्चा करून ८०-२० टक्क्यांप्रमाणे एफआरपी देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार गुरुवारी झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या बैठकीत ८०-२० चा फॉर्म्युला मान्य केला आहे.’ यंदा एकरकमी एफआरपीवरच हंगाम सुरू झाला; पण साखरेचा दर व कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी ‘८०-२०’ टक्क्यांचा फॉर्म्युला मांडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन पावले माघार घेत त्यावर ११ डिसेंबरला शिक्कामोर्तब केले. मात्र, यापूर्वी सर्व कारखानदारांनी एकत्र येऊन बैठक घेत ‘एफआरपी’च्या ७० टक्क्यांप्रमाणे सरासरी १७०० रुपयांचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला. ‘८०-२०’ चा फॉर्म्युला ठरला तरी जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी १७०० रुपयेच पहिला हप्ता उत्पादकांच्या खात्यावर जमा केले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली. दोन दिवसांपासून संघटना आंदोलन करत असल्यामुळे अनेक ठिकाणी ऊस तोड बंद झाली होती. कारखाने बंद पाडण्याचे नियोजन ‘स्वाभिमानी’ने केले आहे. आंदोलनाची व्यापकता वाढते आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी जिल्हा बँकेत कारखानदारांची गुरुवारी बैठक झाली. बैठकीला सायंकाळी साडेसहा वाजता सुरुवात झाली. उपस्थित सर्वच कारखानदारांनी आपली आपली भूमिका मांडली. कारखानदारीसमोरील समस्या सांगितल्या. अन्य जिल्'ांतील साखर कारखानदारांशी बैठकीतच संपर्क साधून ‘८०-२० फॉर्म्युला’ मान्य आहे का, अशी विचारणा केली. त्यावेळी आम्ही १५०० रुपयांवर पहिला हप्ता देणार नाही, असे इतर जिल्'ांतील कारखानदारांनी सांगितले. या विषयावरही चर्चा रंगली. कोल्हापूर जिल्'ातही पहिला हप्ता १७०० रुपयांवर देणे शक्य नाही, असा कारखानदारांनी सूर काढला. आंदोलन तीव्र झाले तर कारखाने आठ दिवस बंद ठेवू मात्र १७०० रुपयांवर देणे शक्य नाही, असे बहुतांशी साखर कारखानदारांचे म्हणणे होते. कारखाने बंद ठेवल्यानंतर शेतकऱ्यांतून उठाव होईल नंतर आपोआप हंगाम सुरळीत होईल, असे मत काही कारखानदारांनी मांडले. बैठकीस शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, बिद्रीचे के. पी. पाटील, मंडलिक कारखान्याचे संजय मंडलिक, शरद साखर कारखान्याचे राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्त शिरोळचे गणपतराव पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, ‘वारणा समुहाचे नेते व जनसुराज्य’चे विनय कोरे, आजरा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यासह कारखानदार उपस्थित होते.