शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

अखेर कारखानदार झुकले..!

By admin | Updated: December 18, 2015 01:18 IST

कोल्हापुरात निर्णय : ‘एफआरपी’च्या ८० टक्के रक्कम देणार

कोल्हापूर : पहिला हप्ता १७०० रुपयेच देणार, असे म्हणणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गुरुवारी नरमाईची भूमिका घेत शासन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निश्चित केलेला ‘८०-२० फॉर्म्युला’ मान्य केला. शासनाने कारवाईच्या हालचाली सुरू केल्यामुळे कारखानदारांना अखेर झुकावे लागले. त्यामुळे गळीत हंगाम सुरळीत होण्याचा मार्ग खुला झाला. येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते. मुश्रीफ म्हणाले,‘ एकरकमी एफआरपी देणे शक्य नसल्यामुळे महिन्यापूर्वी कारखानदारांची बैठक घेऊन पहिला हप्ता १७०० रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शासन, साखर संघ, शेतकरी संघटना, कारखानदारांशी चर्चा करून ८०-२० टक्क्यांप्रमाणे एफआरपी देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार गुरुवारी झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या बैठकीत ८०-२० चा फॉर्म्युला मान्य केला आहे.’ यंदा एकरकमी एफआरपीवरच हंगाम सुरू झाला; पण साखरेचा दर व कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी ‘८०-२०’ टक्क्यांचा फॉर्म्युला मांडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन पावले माघार घेत त्यावर ११ डिसेंबरला शिक्कामोर्तब केले. मात्र, यापूर्वी सर्व कारखानदारांनी एकत्र येऊन बैठक घेत ‘एफआरपी’च्या ७० टक्क्यांप्रमाणे सरासरी १७०० रुपयांचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला. ‘८०-२०’ चा फॉर्म्युला ठरला तरी जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी १७०० रुपयेच पहिला हप्ता उत्पादकांच्या खात्यावर जमा केले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली. दोन दिवसांपासून संघटना आंदोलन करत असल्यामुळे अनेक ठिकाणी ऊस तोड बंद झाली होती. कारखाने बंद पाडण्याचे नियोजन ‘स्वाभिमानी’ने केले आहे. आंदोलनाची व्यापकता वाढते आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी जिल्हा बँकेत कारखानदारांची गुरुवारी बैठक झाली. बैठकीला सायंकाळी साडेसहा वाजता सुरुवात झाली. उपस्थित सर्वच कारखानदारांनी आपली आपली भूमिका मांडली. कारखानदारीसमोरील समस्या सांगितल्या. अन्य जिल्'ांतील साखर कारखानदारांशी बैठकीतच संपर्क साधून ‘८०-२० फॉर्म्युला’ मान्य आहे का, अशी विचारणा केली. त्यावेळी आम्ही १५०० रुपयांवर पहिला हप्ता देणार नाही, असे इतर जिल्'ांतील कारखानदारांनी सांगितले. या विषयावरही चर्चा रंगली. कोल्हापूर जिल्'ातही पहिला हप्ता १७०० रुपयांवर देणे शक्य नाही, असा कारखानदारांनी सूर काढला. आंदोलन तीव्र झाले तर कारखाने आठ दिवस बंद ठेवू मात्र १७०० रुपयांवर देणे शक्य नाही, असे बहुतांशी साखर कारखानदारांचे म्हणणे होते. कारखाने बंद ठेवल्यानंतर शेतकऱ्यांतून उठाव होईल नंतर आपोआप हंगाम सुरळीत होईल, असे मत काही कारखानदारांनी मांडले. बैठकीस शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, बिद्रीचे के. पी. पाटील, मंडलिक कारखान्याचे संजय मंडलिक, शरद साखर कारखान्याचे राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्त शिरोळचे गणपतराव पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, ‘वारणा समुहाचे नेते व जनसुराज्य’चे विनय कोरे, आजरा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यासह कारखानदार उपस्थित होते.