शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही मणेरमळा रस्त्यापासून वंचित

By admin | Updated: December 10, 2015 01:03 IST

खडकाळ रस्ता असल्याने बस किंवा रिक्षा या भागात येण्यास तयार होत नाहीत. वेळेवर उपचार मिळाले नसल्याने चार गरोदर मातांना आपला प्राण गमवावा लागला आहे

उचगाव : येथील यादववाडी, छत्रपती शिवाजीनगर परिसर विकास मंडळ (मणेरमळा) परिसरातील १२ कॉलन्यांतील रहिवासी, महिला मंडळ, युवक मंडळ, दहा ते १५ हजार नागरिकांच्यावतीने उचगावच्या सरपंच सुरेखा चौगुले यांना मणेरमळ््यातील रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यात आले. स्वांतत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही मणेरमळ््यात रस्ता नसल्याने ‘कुठे नेऊन ठेवलाय आमचा रस्ता’ असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. कोल्हापूर-हुपरी रोडला जोडला जाणारा यादववाडी, छत्रपती शिवाजीनगर परिसर, मणेरमळा हा रस्ता ४० वर्षे वहिवाट असणारा रस्ता व्हावा म्हणून गेली १२ ते १५ वर्षे येथील जनता उपोषण, रास्ता रोको, मोर्चा, आंदोलन करीत आहे. खासदार, आमदार, मंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारीयांनी वेळोवेळी रस्ता करतो म्हणून हमी दिली आहे; परंतु येथील जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न असणारा दक्षिणोत्तर जवळपास २०० मीटरचा रस्ता आजअखेर नागरिकांना मिळालेला नाही.‘वाडी-वस्ती तिथे रस्ता’ हा केंद्र सरकारचा नियम येथील जनतेला लागू होत नाही का? आदिवासी, दुर्गम भाग या ठिकाणी रस्ते केले जातात. मग कोल्हापूर शहरापासून दोन कि.मी.च्या अंतरावर असणारा हा भाग रस्त्यापासून अजूनही वंचित का रहिला, असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे. या रस्त्याने दररोज हजार ते दीड हजार मुले-मुली, नागरिक, वाहनधारक, नोकरदार ये-जा करीत आहेत. शाळा, कॉलेजला जाणारी मुले, मुली, युवक चिखलातून जात आहेत. आजारी रुग्ण, गरोदर मातांना रस्त्याअभावी चारचाकी वाहनातून वेळेत उपचारांसाठी पोहोचता येत नाही. यामुळे गेल्या काही दिवसांत पाच ते दहाजणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. खडकाळ रस्ता असल्याने बस किंवा रिक्षा या भागात येण्यास तयार होत नाहीत. वेळेवर उपचार मिळाले नसल्याने चार गरोदर मातांना आपला प्राण गमवावा लागला आहे. दहा ते १५ हजार लोकवस्तीच्या या मणेरमळ््यात वाहतुकीसाठी रस्ता नसल्याने व खासगी जमीनदारांकडून रस्त्याला अडवणूक होत असल्याने येथील रस्ता होणार तरी कधी? असा प्रश्न पडला आहे.गेली वीस वर्षे ग्रामपंचायतीला या भागातील नागरिक घरफाळा, इतर कर भरत आहेत. तरीही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी या रस्त्याविषयी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप जनतेतून होत आहे. वास्तविक ग्रामपंचायतीने येथील जनतेला विश्वासात घेऊन हा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक असताना गेली २० वर्षे दुर्लक्ष केल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर येथील जनतेने मोर्चाने येऊन ग्रामपंचातयीला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)