शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही मणेरमळा रस्त्यापासून वंचित

By admin | Updated: December 10, 2015 01:03 IST

खडकाळ रस्ता असल्याने बस किंवा रिक्षा या भागात येण्यास तयार होत नाहीत. वेळेवर उपचार मिळाले नसल्याने चार गरोदर मातांना आपला प्राण गमवावा लागला आहे

उचगाव : येथील यादववाडी, छत्रपती शिवाजीनगर परिसर विकास मंडळ (मणेरमळा) परिसरातील १२ कॉलन्यांतील रहिवासी, महिला मंडळ, युवक मंडळ, दहा ते १५ हजार नागरिकांच्यावतीने उचगावच्या सरपंच सुरेखा चौगुले यांना मणेरमळ््यातील रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यात आले. स्वांतत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही मणेरमळ््यात रस्ता नसल्याने ‘कुठे नेऊन ठेवलाय आमचा रस्ता’ असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. कोल्हापूर-हुपरी रोडला जोडला जाणारा यादववाडी, छत्रपती शिवाजीनगर परिसर, मणेरमळा हा रस्ता ४० वर्षे वहिवाट असणारा रस्ता व्हावा म्हणून गेली १२ ते १५ वर्षे येथील जनता उपोषण, रास्ता रोको, मोर्चा, आंदोलन करीत आहे. खासदार, आमदार, मंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारीयांनी वेळोवेळी रस्ता करतो म्हणून हमी दिली आहे; परंतु येथील जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न असणारा दक्षिणोत्तर जवळपास २०० मीटरचा रस्ता आजअखेर नागरिकांना मिळालेला नाही.‘वाडी-वस्ती तिथे रस्ता’ हा केंद्र सरकारचा नियम येथील जनतेला लागू होत नाही का? आदिवासी, दुर्गम भाग या ठिकाणी रस्ते केले जातात. मग कोल्हापूर शहरापासून दोन कि.मी.च्या अंतरावर असणारा हा भाग रस्त्यापासून अजूनही वंचित का रहिला, असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे. या रस्त्याने दररोज हजार ते दीड हजार मुले-मुली, नागरिक, वाहनधारक, नोकरदार ये-जा करीत आहेत. शाळा, कॉलेजला जाणारी मुले, मुली, युवक चिखलातून जात आहेत. आजारी रुग्ण, गरोदर मातांना रस्त्याअभावी चारचाकी वाहनातून वेळेत उपचारांसाठी पोहोचता येत नाही. यामुळे गेल्या काही दिवसांत पाच ते दहाजणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. खडकाळ रस्ता असल्याने बस किंवा रिक्षा या भागात येण्यास तयार होत नाहीत. वेळेवर उपचार मिळाले नसल्याने चार गरोदर मातांना आपला प्राण गमवावा लागला आहे. दहा ते १५ हजार लोकवस्तीच्या या मणेरमळ््यात वाहतुकीसाठी रस्ता नसल्याने व खासगी जमीनदारांकडून रस्त्याला अडवणूक होत असल्याने येथील रस्ता होणार तरी कधी? असा प्रश्न पडला आहे.गेली वीस वर्षे ग्रामपंचायतीला या भागातील नागरिक घरफाळा, इतर कर भरत आहेत. तरीही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी या रस्त्याविषयी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप जनतेतून होत आहे. वास्तविक ग्रामपंचायतीने येथील जनतेला विश्वासात घेऊन हा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक असताना गेली २० वर्षे दुर्लक्ष केल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर येथील जनतेने मोर्चाने येऊन ग्रामपंचातयीला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)