शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

राधानगरी अभयारण्यातील झाडांना खिळे ठोकून वेदना, खिळेमुक्त झाड मोहीम कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 13:04 IST

गौरव सांगावकर राधानगरी : महाराष्ट्रातील सर्वांत जुने अभयारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या राधानगरी अभयारण्यास सध्या एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावे ...

गौरव सांगावकर

राधानगरी : महाराष्ट्रातील सर्वांत जुने अभयारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या राधानगरी अभयारण्यास सध्या एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. अभयारण्य क्षेत्रातील झाडांची फांदी तोडणेही गुन्हा आहे; पण जाहिरातीचा नवीन फंडा या झाडांसाठी मरणयातना देत आहे. ही केवळ वन विभागाचीच जबाबदारी आहे असे म्हणून चालणार नाही. हा विपुल साठा जतन करणे आपलेही कर्तव्य आहे; पण आपल्या प्रगतीच्या हव्यासापोटी येथील विपुल संपत्तीचा ऱ्हास होत आहे.

शेतकऱ्यांना मात्र या ना त्या कारणासाठी हेच वन्यजीव विभाग वेठीस धरतात; पण या हॉटेल व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, कॉम्पुटर क्लास, सैनिक भरती अकॅडमी यांचा या जाहिरातींमध्ये जास्त भरणा आहे. माणसाला जशी दुखापत होते, वेदना होते, त्याचप्रमाणे झाडांनाही वेदना होतात. याच वेदना झाडांना देण्याचे काम माणूस करीत आहे. वन्यजीव विभाग या सर्वांवर कारवाई का करत नाही हा खरा प्रश्न पर्यावरणप्रेमींमध्ये आहे.

निपाणी-देवगड हा राज्यमार्ग राधानगरी अभयारण्यातून जातो. तसेच राधानगरी जलाशय, राऊतवाडी धबधबा, काळम्मावाडी धरण या परिसरातील बहुतांशी झाडांवर या वेगवेगळ्या जाहिराती खिळे ठोकून अडकवलेल्या दिसतात. राधानगरी वन्यजीव विभागाच्या कार्यालयापासून रस्त्याच्या दुतर्फा झाडे आहेत. कोणताही विचार न करता प्रत्येक झाडावर ३-४ जाहिरातींचे फलक अडकविण्यात आले आहेत. अतिशय दुर्मीळ असणाऱ्या आर्किड असलेल्या झाडांवरही खिळे ठोकून जाहिरात करण्यात आली आहे. शंभर वर्षांपेक्षा जुनी असलेली ही वृक्षसंपदा यामुळे नष्ट होत आहे. कोणताही विचार न करता पोस्टरबाजीसाठी मोठमोठे खिळे या झाडांवर ठोकले जात आहेत. वनविभागाच्या कार्यालयासमोरच हा प्रकार घडत आहे.

खिळेमुक्त झाड मोहीम कागदावरच..

जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त खिळेमुक्त झाड अशी मोहीम कोल्हापूर शहर व परिसरात राबवली होती; पण कोल्हापूर जिल्ह्याचे हृदय असणाऱ्या राधानगरीतील या झाडांचे पालकत्व वन्यजीव विभाग अगदी प्रामाणिकपणे स्वीकारणार का? फक्त दरवेळीप्रमाणे कागदी घोडे नाचवून कारवाईची भीती दाखवून पुन्हा या झाडांना मरण यातना झेलतच ठेवणार हा खरा मुद्दा आहे.

जैवविविधतेने नटलेले हे अभयारण्य याचे संगोपन केवळ वन्य विभागाने नव्हे तर नागरिकांनीही त्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. खिळे मारल्यामुळे ही झाडे काही दिवसांनंतर सुकलेली दिसतात. यामुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. वृक्षांवर खिळे मारणे हा प्रकार निसर्गासाठी नव्हे तर मानवासाठीही घातक ठरेल. - प्रा. पी. एस. पाटील. राधानगरी परिसर संवर्धन समिती सचिव

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरी