शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

प्रशासनाचे ठरेना, स्थलांतरितांना जाता येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 17:08 IST

नाशिकमध्ये अडकलेल्या परप्रांतियांना विशेष रेल्वेने शनिवारी रवाना करण्यात आले. कोल्हापुरात मात्र अजूनही नोंदणीचीच प्रक्रिया सुरू आहे. त्याला गती येत नसल्यामुळे स्थलांतरितांची घालमेल वाढली आहे. जिल्हाधिकारी कधी आदेश काढतात, गाडीची व्यवस्था कधी करतात याकडे स्थलातरितांचे डोळे लागले आहेत.

कोल्हापूर : स्थलांतरितांना आपापल्या गावी परतण्याची मुभा केंद्र सरकारने दिली खरी पण अजूनही जिल्हा प्रशासनाकडून त्याच्या अंमलबजावणीविषयीचे नियोजन केलेले नाही. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून १६ निवारा केंद्रात अडकलेल्या ८३१ जणांचा जीव टांगणीला लागला आहे. घराकडे जायची ओढ लागली आहे, पण जाणार कसे याबाबत काहीच सूचना आलेल्या नसल्यामुळे या स्थलांतरितांची घालमेल वाढली आहे.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर घराच्या ओढीने निघालेल्या स्थलांतरितांना सक्तीने क्वारन्टाईन केले गेले. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे नसली तरी पुढील धोका नको म्हणून निवारा केंद्र स्थापन करून त्यांची जेवण व निवासाची सोय सरकारने केली. गेल्या महिन्याभरापासून हे स्थलांतरित येथे रोजचा दिवस ढकलत आहेत. कोल्हापुरात सरकारने या स्थलांतरितांसाठी १६ निवारा केंद्रे स्थापन केली आहेत. त्यात ८३१ जण आहेत, त्यात १६८ जण राज्यातील तर तब्बल ६६३ जण परराज्यातील आहेत. यात कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, केरळ, पाँडेचरी, आंध्रप्रदेश, झारखंड, बिहार, हरियाणा या राज्यांतील नागरिकांचा समावेश आहे.या स्थलांतरितांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

त्यानुसार समन्वय कक्ष स्थापना आणि नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याचे प्रशासन सांगत असले तरी अजून कशाचा पायपोस कशाला नाही, अशी परिस्थिती आहे. नाशिकमध्ये अडकलेल्या परप्रांतियांना विशेष रेल्वेने शनिवारी रवाना करण्यात आले. कोल्हापुरात मात्र अजूनही नोंदणीचीच प्रक्रिया सुरू आहे. त्याला गती येत नसल्यामुळे स्थलांतरितांची घालमेल वाढली आहे. जिल्हाधिकारी कधी आदेश काढतात, गाडीची व्यवस्था कधी करतात याकडे स्थलातरितांचे डोळे लागले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस