शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाचे ठरेना, स्थलांतरितांना जाता येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 17:08 IST

नाशिकमध्ये अडकलेल्या परप्रांतियांना विशेष रेल्वेने शनिवारी रवाना करण्यात आले. कोल्हापुरात मात्र अजूनही नोंदणीचीच प्रक्रिया सुरू आहे. त्याला गती येत नसल्यामुळे स्थलांतरितांची घालमेल वाढली आहे. जिल्हाधिकारी कधी आदेश काढतात, गाडीची व्यवस्था कधी करतात याकडे स्थलातरितांचे डोळे लागले आहेत.

कोल्हापूर : स्थलांतरितांना आपापल्या गावी परतण्याची मुभा केंद्र सरकारने दिली खरी पण अजूनही जिल्हा प्रशासनाकडून त्याच्या अंमलबजावणीविषयीचे नियोजन केलेले नाही. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून १६ निवारा केंद्रात अडकलेल्या ८३१ जणांचा जीव टांगणीला लागला आहे. घराकडे जायची ओढ लागली आहे, पण जाणार कसे याबाबत काहीच सूचना आलेल्या नसल्यामुळे या स्थलांतरितांची घालमेल वाढली आहे.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर घराच्या ओढीने निघालेल्या स्थलांतरितांना सक्तीने क्वारन्टाईन केले गेले. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे नसली तरी पुढील धोका नको म्हणून निवारा केंद्र स्थापन करून त्यांची जेवण व निवासाची सोय सरकारने केली. गेल्या महिन्याभरापासून हे स्थलांतरित येथे रोजचा दिवस ढकलत आहेत. कोल्हापुरात सरकारने या स्थलांतरितांसाठी १६ निवारा केंद्रे स्थापन केली आहेत. त्यात ८३१ जण आहेत, त्यात १६८ जण राज्यातील तर तब्बल ६६३ जण परराज्यातील आहेत. यात कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, केरळ, पाँडेचरी, आंध्रप्रदेश, झारखंड, बिहार, हरियाणा या राज्यांतील नागरिकांचा समावेश आहे.या स्थलांतरितांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

त्यानुसार समन्वय कक्ष स्थापना आणि नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याचे प्रशासन सांगत असले तरी अजून कशाचा पायपोस कशाला नाही, अशी परिस्थिती आहे. नाशिकमध्ये अडकलेल्या परप्रांतियांना विशेष रेल्वेने शनिवारी रवाना करण्यात आले. कोल्हापुरात मात्र अजूनही नोंदणीचीच प्रक्रिया सुरू आहे. त्याला गती येत नसल्यामुळे स्थलांतरितांची घालमेल वाढली आहे. जिल्हाधिकारी कधी आदेश काढतात, गाडीची व्यवस्था कधी करतात याकडे स्थलातरितांचे डोळे लागले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस