शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: एका डोळ्याने अभ्यास...आदित्यने यूपीएससी परीक्षेत यश मिळवत पूर्ण केला स्वप्नांचा ध्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 16:59 IST

उत्तूरच्या बामणेचा असाही संघर्ष

कोल्हापूर : महाभारतातील अर्जुनाचे ध्येय एकच असल्याने त्याला पक्ष्याचा एकच डोळा दिसलेला. इथे तर याला जन्मजातच एकच डोळा..पण त्याने अथांग स्वप्न पाहत ते एकाच डोळ्याने पूर्ण करून अविरत संघर्षातून मिळवलेल्या यशाचा सोहळा साजरा करण्याचं भाग्य कुटुंबाला दिले आहे. उत्तूर (ता.आजरा) येथील आदित्य अनिल बामणे, असे या विद्यार्थ्याचे नाव.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात आदित्यने बाजी मारली अन् त्याच्या अविरत संघर्षाचा पट उलगडत गेला. आदित्यचे आई-वडील दोघेही शिक्षक. लहानपणीच आदित्यला पायाचे व डोळ्याचे अपंगत्व. त्यामुळे कुटुंब निराश झाले; पण त्याचा उत्साह, त्याचा स्वच्छंदीपणा, हसरा चेहरा या कुटुंबाला नवी उमेद देत गेला. पुढे दोन वर्षांनंतर तो बोलायला शिकला, नव्हे वाचायलाही शिकला. काळाचा महिमा अगाध असतो. पुढे शिष्यवृत्ती परीक्षेसह दहावी, बारावी परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवत या पोराने कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य आणले.आता तर थेट यूपीएससी परीक्षेत देशात १०१५ वी रँक मिळवत शारीरिक अपंगत्वावर आपला संघर्षच मात करू शकतो, याचा प्रत्यय दिला. उत्तूरमध्येच प्राथमिक शिक्षण घेतलेल्या आदित्यने कागलच्या नवोदय विद्यालयात माध्यमिक शिक्षणाचे धडे गिरवले. या शाळेतच खऱ्या अर्थाने घडल्याचे आदित्य सांगतो. मी अपंग असूनही या शाळेने सर्व उपक्रमांमध्ये मला सहभागी होण्याची संधी दिल्याचे त्याने सांगितले. दहावीत सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवलेल्या आदित्यने स्पर्धा परीक्षेतून अधिकारी बनायचे हे स्वप्न उराशी बाळगले.त्यामुळे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये कला शाखेतून अकरावी-बारावीचे शिक्षण घेतले. याच कॉलेजमधून राज्यशास्त्रातून बी.ए.ची पदवी संपादन केली. पदवीच्या दुसऱ्या वर्षात असतानाच स्पर्धा परीक्षेचा पूर्ण तयारीनिशी अभ्यास सुरू केला. पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र, कुटुंबाने पाठबळ दिल्याने दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत त्याने घवघवीत यश मिळवले.

डोळ्याचा त्रास पण..आदित्यला एकाच डोळ्याने दिसत असल्याने त्याला अभ्यास करताना अनेकदा त्रास जाणवला. मात्र, पुढे सरावाने याही समस्येवर मात केल्याचे तो आवर्जून सांगतो. कोणत्याही परिस्थितीला स्वीकारायला हवे या मानसिकतेतून मी माझे अपंगत्व विसरून केवळ ध्येय समोर ठेवले. रोज आठ तास अभ्यास सुरू ठेवला. त्यात खंड पडू दिला नाही. त्यामुळेच हे यश मिळवू शकल्याचे तो म्हणाला.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मानसिक ताण अधिक येतो. त्यामुळे आपली क्षमता ओळखून मुलांनी या परीक्षेचा अभ्यास करणे गरजेचे आहे. -आदित्य बामणे, उत्तूर 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरupscकेंद्रीय लोकसेवा आयोग