शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

Kolhapur: एका डोळ्याने अभ्यास...आदित्यने यूपीएससी परीक्षेत यश मिळवत पूर्ण केला स्वप्नांचा ध्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 16:59 IST

उत्तूरच्या बामणेचा असाही संघर्ष

कोल्हापूर : महाभारतातील अर्जुनाचे ध्येय एकच असल्याने त्याला पक्ष्याचा एकच डोळा दिसलेला. इथे तर याला जन्मजातच एकच डोळा..पण त्याने अथांग स्वप्न पाहत ते एकाच डोळ्याने पूर्ण करून अविरत संघर्षातून मिळवलेल्या यशाचा सोहळा साजरा करण्याचं भाग्य कुटुंबाला दिले आहे. उत्तूर (ता.आजरा) येथील आदित्य अनिल बामणे, असे या विद्यार्थ्याचे नाव.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात आदित्यने बाजी मारली अन् त्याच्या अविरत संघर्षाचा पट उलगडत गेला. आदित्यचे आई-वडील दोघेही शिक्षक. लहानपणीच आदित्यला पायाचे व डोळ्याचे अपंगत्व. त्यामुळे कुटुंब निराश झाले; पण त्याचा उत्साह, त्याचा स्वच्छंदीपणा, हसरा चेहरा या कुटुंबाला नवी उमेद देत गेला. पुढे दोन वर्षांनंतर तो बोलायला शिकला, नव्हे वाचायलाही शिकला. काळाचा महिमा अगाध असतो. पुढे शिष्यवृत्ती परीक्षेसह दहावी, बारावी परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवत या पोराने कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य आणले.आता तर थेट यूपीएससी परीक्षेत देशात १०१५ वी रँक मिळवत शारीरिक अपंगत्वावर आपला संघर्षच मात करू शकतो, याचा प्रत्यय दिला. उत्तूरमध्येच प्राथमिक शिक्षण घेतलेल्या आदित्यने कागलच्या नवोदय विद्यालयात माध्यमिक शिक्षणाचे धडे गिरवले. या शाळेतच खऱ्या अर्थाने घडल्याचे आदित्य सांगतो. मी अपंग असूनही या शाळेने सर्व उपक्रमांमध्ये मला सहभागी होण्याची संधी दिल्याचे त्याने सांगितले. दहावीत सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवलेल्या आदित्यने स्पर्धा परीक्षेतून अधिकारी बनायचे हे स्वप्न उराशी बाळगले.त्यामुळे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये कला शाखेतून अकरावी-बारावीचे शिक्षण घेतले. याच कॉलेजमधून राज्यशास्त्रातून बी.ए.ची पदवी संपादन केली. पदवीच्या दुसऱ्या वर्षात असतानाच स्पर्धा परीक्षेचा पूर्ण तयारीनिशी अभ्यास सुरू केला. पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र, कुटुंबाने पाठबळ दिल्याने दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत त्याने घवघवीत यश मिळवले.

डोळ्याचा त्रास पण..आदित्यला एकाच डोळ्याने दिसत असल्याने त्याला अभ्यास करताना अनेकदा त्रास जाणवला. मात्र, पुढे सरावाने याही समस्येवर मात केल्याचे तो आवर्जून सांगतो. कोणत्याही परिस्थितीला स्वीकारायला हवे या मानसिकतेतून मी माझे अपंगत्व विसरून केवळ ध्येय समोर ठेवले. रोज आठ तास अभ्यास सुरू ठेवला. त्यात खंड पडू दिला नाही. त्यामुळेच हे यश मिळवू शकल्याचे तो म्हणाला.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मानसिक ताण अधिक येतो. त्यामुळे आपली क्षमता ओळखून मुलांनी या परीक्षेचा अभ्यास करणे गरजेचे आहे. -आदित्य बामणे, उत्तूर 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरupscकेंद्रीय लोकसेवा आयोग