शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

कोल्हापुरातील टोल आंदोलकांवरील खटले रद्द न झाल्याने कार्यकर्ते बेजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 19:21 IST

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची जाहीर घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सार्वजनिक प्रश्र्नाच्या सोडवणुकीसाठी लढा दिलेल्या कार्यकर्त्यांना न्यायालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

कोल्हापूर : देशभर गाजलेल्या कोल्हापूरच्या टोल आंदोलनातील फुलेवाडी नाका उद्ध्वस्त करण्याच्या घटनेतील माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह ३२ कार्यकर्ते न्यायालयात हेलपाटे मारून बेजार झाले आहेत. या सगळ्यांनी न्यायालयाने दिलेल्या तारखेला हजर राहणे बंधनकारक असताना त्यातील अनेकजण हजर राहत नसल्याने न्यायालय अटक वॉरंट काढते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची जाहीर घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सार्वजनिक प्रश्र्नाच्या सोडवणुकीसाठी लढा दिलेल्या कार्यकर्त्यांना न्यायालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.आंदोलने होतात, गुन्हे दाखल होतात आणि नंतर जो काही मनस्ताप होतो तो त्या व्यक्तिगत कार्यकर्त्यांनाच. त्यावेळी कोणताही पक्ष, राजकीय नेता मदतीला धावून येत नाही, असाच अनुभव या प्रकरणात सामान्य कार्यकर्त्यांना येत आहे. ही घटना २०१४ची. फुलेवाडी नाक्यावर आंदोलन करून नाके उद्ध्वस्त करण्यात आले. याप्रकरणी २०१५ पासून नियमित फौजदारी खटला न्यायालयात सुरू आहे. त्यामध्ये माजी आमदार नरके, अजित नरके, माजी आमदार राजेश क्षीरसागर, तत्कालीन महापौर सुनीता राऊत, अजित राऊत, वसंतराव मुळीक, विजय देवणे, राजू लाटकर, रवी इंगवले, अशोक देसाई, बाबा पार्टे, दिलीप देसाई, दिलीप पवार, रमेश मोरे, जयकुमार शिंदे, हर्षल सुर्वे आदींसह ३२ जणांवर पोलिसांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वजण सुनावणीला हजर राहिले तर खटला चालवून त्याचा लवकर निकाल लागू शकतो. परंतु संशयितांपैकी अनेकजण सुनावणीला जात नाहीत. हेच लोक इतरवेळी सार्वजनिक जीवनात पोलिसांच्या समोरच वावरताना दिसतात. त्यामुळेही त्यांना अटक वॉरंट बजावले जाते. मग न्यायालयासमोर हजर राहून दंड भरावा लागतो. आता या खटल्याची सुनावणी शुक्रवारी (दि. २३) आहे.

कारण असेही..

  • टोल रद्द झाला. राज्य शासनाने आयआरबी कंपनीला ४८९ कोटी रुपये भरपाईपोटी दिले. भाजप सरकारने कोल्हापूरचा टोल आम्हीच रद्द केला, असे सांगून त्याचे श्रेय घेतले. टोल रद्द केल्याबद्दल कोल्हापूरकरांनी ७ जानेवारी २०१६ला प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा नागरी सत्कारही केला. या कार्यक्रमात त्यांनी टोल आंदोलकांवरील खटले मागे घेण्याची घोषणा केली.
  • परंतु त्यानुसार पुढे कार्यवाही झालेली नाही. आजी-माजी, आमदार-खासदारांवरील खटले काढण्यासाठी उच्च न्यायालयाची संमती लागते. जिथे खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे ५ लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान झालेे आहे, असेच खटले फक्त मागे घेता येतात. त्यामुळेही टोल आंदोलकांवरील खटले सुरू राहिले आहेत.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरtollplazaटोलनाकाCourtन्यायालय