शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील टोल आंदोलकांवरील खटले रद्द न झाल्याने कार्यकर्ते बेजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 19:21 IST

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची जाहीर घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सार्वजनिक प्रश्र्नाच्या सोडवणुकीसाठी लढा दिलेल्या कार्यकर्त्यांना न्यायालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

कोल्हापूर : देशभर गाजलेल्या कोल्हापूरच्या टोल आंदोलनातील फुलेवाडी नाका उद्ध्वस्त करण्याच्या घटनेतील माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह ३२ कार्यकर्ते न्यायालयात हेलपाटे मारून बेजार झाले आहेत. या सगळ्यांनी न्यायालयाने दिलेल्या तारखेला हजर राहणे बंधनकारक असताना त्यातील अनेकजण हजर राहत नसल्याने न्यायालय अटक वॉरंट काढते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची जाहीर घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सार्वजनिक प्रश्र्नाच्या सोडवणुकीसाठी लढा दिलेल्या कार्यकर्त्यांना न्यायालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.आंदोलने होतात, गुन्हे दाखल होतात आणि नंतर जो काही मनस्ताप होतो तो त्या व्यक्तिगत कार्यकर्त्यांनाच. त्यावेळी कोणताही पक्ष, राजकीय नेता मदतीला धावून येत नाही, असाच अनुभव या प्रकरणात सामान्य कार्यकर्त्यांना येत आहे. ही घटना २०१४ची. फुलेवाडी नाक्यावर आंदोलन करून नाके उद्ध्वस्त करण्यात आले. याप्रकरणी २०१५ पासून नियमित फौजदारी खटला न्यायालयात सुरू आहे. त्यामध्ये माजी आमदार नरके, अजित नरके, माजी आमदार राजेश क्षीरसागर, तत्कालीन महापौर सुनीता राऊत, अजित राऊत, वसंतराव मुळीक, विजय देवणे, राजू लाटकर, रवी इंगवले, अशोक देसाई, बाबा पार्टे, दिलीप देसाई, दिलीप पवार, रमेश मोरे, जयकुमार शिंदे, हर्षल सुर्वे आदींसह ३२ जणांवर पोलिसांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वजण सुनावणीला हजर राहिले तर खटला चालवून त्याचा लवकर निकाल लागू शकतो. परंतु संशयितांपैकी अनेकजण सुनावणीला जात नाहीत. हेच लोक इतरवेळी सार्वजनिक जीवनात पोलिसांच्या समोरच वावरताना दिसतात. त्यामुळेही त्यांना अटक वॉरंट बजावले जाते. मग न्यायालयासमोर हजर राहून दंड भरावा लागतो. आता या खटल्याची सुनावणी शुक्रवारी (दि. २३) आहे.

कारण असेही..

  • टोल रद्द झाला. राज्य शासनाने आयआरबी कंपनीला ४८९ कोटी रुपये भरपाईपोटी दिले. भाजप सरकारने कोल्हापूरचा टोल आम्हीच रद्द केला, असे सांगून त्याचे श्रेय घेतले. टोल रद्द केल्याबद्दल कोल्हापूरकरांनी ७ जानेवारी २०१६ला प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा नागरी सत्कारही केला. या कार्यक्रमात त्यांनी टोल आंदोलकांवरील खटले मागे घेण्याची घोषणा केली.
  • परंतु त्यानुसार पुढे कार्यवाही झालेली नाही. आजी-माजी, आमदार-खासदारांवरील खटले काढण्यासाठी उच्च न्यायालयाची संमती लागते. जिथे खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे ५ लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान झालेे आहे, असेच खटले फक्त मागे घेता येतात. त्यामुळेही टोल आंदोलकांवरील खटले सुरू राहिले आहेत.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरtollplazaटोलनाकाCourtन्यायालय