शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

कोल्हापुरातील टोल आंदोलकांवरील खटले रद्द न झाल्याने कार्यकर्ते बेजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 19:21 IST

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची जाहीर घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सार्वजनिक प्रश्र्नाच्या सोडवणुकीसाठी लढा दिलेल्या कार्यकर्त्यांना न्यायालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

कोल्हापूर : देशभर गाजलेल्या कोल्हापूरच्या टोल आंदोलनातील फुलेवाडी नाका उद्ध्वस्त करण्याच्या घटनेतील माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह ३२ कार्यकर्ते न्यायालयात हेलपाटे मारून बेजार झाले आहेत. या सगळ्यांनी न्यायालयाने दिलेल्या तारखेला हजर राहणे बंधनकारक असताना त्यातील अनेकजण हजर राहत नसल्याने न्यायालय अटक वॉरंट काढते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची जाहीर घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सार्वजनिक प्रश्र्नाच्या सोडवणुकीसाठी लढा दिलेल्या कार्यकर्त्यांना न्यायालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.आंदोलने होतात, गुन्हे दाखल होतात आणि नंतर जो काही मनस्ताप होतो तो त्या व्यक्तिगत कार्यकर्त्यांनाच. त्यावेळी कोणताही पक्ष, राजकीय नेता मदतीला धावून येत नाही, असाच अनुभव या प्रकरणात सामान्य कार्यकर्त्यांना येत आहे. ही घटना २०१४ची. फुलेवाडी नाक्यावर आंदोलन करून नाके उद्ध्वस्त करण्यात आले. याप्रकरणी २०१५ पासून नियमित फौजदारी खटला न्यायालयात सुरू आहे. त्यामध्ये माजी आमदार नरके, अजित नरके, माजी आमदार राजेश क्षीरसागर, तत्कालीन महापौर सुनीता राऊत, अजित राऊत, वसंतराव मुळीक, विजय देवणे, राजू लाटकर, रवी इंगवले, अशोक देसाई, बाबा पार्टे, दिलीप देसाई, दिलीप पवार, रमेश मोरे, जयकुमार शिंदे, हर्षल सुर्वे आदींसह ३२ जणांवर पोलिसांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वजण सुनावणीला हजर राहिले तर खटला चालवून त्याचा लवकर निकाल लागू शकतो. परंतु संशयितांपैकी अनेकजण सुनावणीला जात नाहीत. हेच लोक इतरवेळी सार्वजनिक जीवनात पोलिसांच्या समोरच वावरताना दिसतात. त्यामुळेही त्यांना अटक वॉरंट बजावले जाते. मग न्यायालयासमोर हजर राहून दंड भरावा लागतो. आता या खटल्याची सुनावणी शुक्रवारी (दि. २३) आहे.

कारण असेही..

  • टोल रद्द झाला. राज्य शासनाने आयआरबी कंपनीला ४८९ कोटी रुपये भरपाईपोटी दिले. भाजप सरकारने कोल्हापूरचा टोल आम्हीच रद्द केला, असे सांगून त्याचे श्रेय घेतले. टोल रद्द केल्याबद्दल कोल्हापूरकरांनी ७ जानेवारी २०१६ला प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा नागरी सत्कारही केला. या कार्यक्रमात त्यांनी टोल आंदोलकांवरील खटले मागे घेण्याची घोषणा केली.
  • परंतु त्यानुसार पुढे कार्यवाही झालेली नाही. आजी-माजी, आमदार-खासदारांवरील खटले काढण्यासाठी उच्च न्यायालयाची संमती लागते. जिथे खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे ५ लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान झालेे आहे, असेच खटले फक्त मागे घेता येतात. त्यामुळेही टोल आंदोलकांवरील खटले सुरू राहिले आहेत.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरtollplazaटोलनाकाCourtन्यायालय