शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

कमी दराने साखर विकणाऱ्या कारखान्यांवर होणार कारवाई : राजू शेट्टी यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:21 IST

केंद्र सरकारने साखरेचा किमान हमीभाव २९०० रुपये केलेला असून, जे साखर कारखाने यापेक्षा कमी दराने साखर विकतील, त्या साखर कारखान्यांची चौकशी करून कारवाई करा, असा निर्देश केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी

ठळक मुद्देरामविलास पासवान यांनी सचिवांना दिले निर्देश

जयसिंगपूर : केंद्र सरकारने साखरेचा किमान हमीभाव २९०० रुपये केलेला असून, जे साखर कारखाने यापेक्षा कमी दराने साखर विकतील, त्या साखर कारखान्यांची चौकशी करून कारवाई करा, असा निर्देश केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाचे सचिव रविकांत यांना दिला आहे. अशी माहिती बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

राज्यात काही साखर कारखाने २९०० रुपयांपेक्षा कमी दराने साखर विकत आहेत. सरकारने कायदा केला असला तरीही कमी दर्जाची साखर दाखवून सर्रास विक्री केली जात आहे. त्यामुळे साखरेच्या होलसेल दरामध्ये घट होत आहे. अशामुळे ज्या कारखान्यांची एफआरपी जास्त आहे, अर्थात त्यांना २९०० ते ३००० रुपयांची पहिली उचल द्यावी लागते. त्यामुळे त्या साखर कारखान्यांना कमी दरात साखर विकणे परवडत नाही. त्यामुळे एफआरपीची मोठ्या प्रमाणात थकबाकी राहण्याची शक्यता आहे. याचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकºयांना बसत आहे. केंद्राने तातडीने कमी दरात साखर विकणाºया साखर कारखान्यांची चौकशी करून कडक कारवाई करावी. तसेच २९०० रुपये हा भाव गेल्या वर्षीची एफआरपी डोळ्यासमोर धरून केला आहे.

यंदा वाढलेला उत्पादन खर्च लक्षात घेता यावर्षी साखरेच्या विक्रीचा दर किमान ३४०० रुपये प्रतिक्विंटल करण्याची आवश्यकता आहे. थकलेली एफआरपी लक्षात घेता सरकारने साखरेचे भाव तातडीने ३४०० रुपयांपर्यंत स्थिर करावेत, अशी मागणी केली असल्याचेही खा. शेट्टी यांनी सांगितले. यावेळी मंत्री पासवान यांनी साखरेचे भाव वाढविण्याचा सरकार विचार करीत असून, लवकरच निर्णय घेण्यात येईल. तसेच जे साखर कारखाने कमी दरामध्ये साखर विकतील, त्यांची चौकशी करून त्वरित कारवाई करण्याचे निर्देश सचिव रविकांत यांना दिले.कारखान्यांवर कारवाई कराअन्न नागरी पुरवठा मंत्रालयाचे सचिव रविकांत यांची भेट घेऊन वस्तुस्थितीची माहिती दिली असून, याप्रश्नी तत्काळ चौकशी केली जाईल. जे कमी दरामध्ये साखर विकलेले आढळून येतील, त्यांचा साखर विक्रीचा कोटा त्वरित रद्द करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.त्यामुळे ज्या साखर कारखान्यांनी कमी दरामध्ये साखर विकली आहे, त्याचे पुरावे देणार असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने