शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कमी दराने साखर विकणाऱ्या कारखान्यांवर होणार कारवाई : राजू शेट्टी यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:21 IST

केंद्र सरकारने साखरेचा किमान हमीभाव २९०० रुपये केलेला असून, जे साखर कारखाने यापेक्षा कमी दराने साखर विकतील, त्या साखर कारखान्यांची चौकशी करून कारवाई करा, असा निर्देश केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी

ठळक मुद्देरामविलास पासवान यांनी सचिवांना दिले निर्देश

जयसिंगपूर : केंद्र सरकारने साखरेचा किमान हमीभाव २९०० रुपये केलेला असून, जे साखर कारखाने यापेक्षा कमी दराने साखर विकतील, त्या साखर कारखान्यांची चौकशी करून कारवाई करा, असा निर्देश केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाचे सचिव रविकांत यांना दिला आहे. अशी माहिती बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

राज्यात काही साखर कारखाने २९०० रुपयांपेक्षा कमी दराने साखर विकत आहेत. सरकारने कायदा केला असला तरीही कमी दर्जाची साखर दाखवून सर्रास विक्री केली जात आहे. त्यामुळे साखरेच्या होलसेल दरामध्ये घट होत आहे. अशामुळे ज्या कारखान्यांची एफआरपी जास्त आहे, अर्थात त्यांना २९०० ते ३००० रुपयांची पहिली उचल द्यावी लागते. त्यामुळे त्या साखर कारखान्यांना कमी दरात साखर विकणे परवडत नाही. त्यामुळे एफआरपीची मोठ्या प्रमाणात थकबाकी राहण्याची शक्यता आहे. याचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकºयांना बसत आहे. केंद्राने तातडीने कमी दरात साखर विकणाºया साखर कारखान्यांची चौकशी करून कडक कारवाई करावी. तसेच २९०० रुपये हा भाव गेल्या वर्षीची एफआरपी डोळ्यासमोर धरून केला आहे.

यंदा वाढलेला उत्पादन खर्च लक्षात घेता यावर्षी साखरेच्या विक्रीचा दर किमान ३४०० रुपये प्रतिक्विंटल करण्याची आवश्यकता आहे. थकलेली एफआरपी लक्षात घेता सरकारने साखरेचे भाव तातडीने ३४०० रुपयांपर्यंत स्थिर करावेत, अशी मागणी केली असल्याचेही खा. शेट्टी यांनी सांगितले. यावेळी मंत्री पासवान यांनी साखरेचे भाव वाढविण्याचा सरकार विचार करीत असून, लवकरच निर्णय घेण्यात येईल. तसेच जे साखर कारखाने कमी दरामध्ये साखर विकतील, त्यांची चौकशी करून त्वरित कारवाई करण्याचे निर्देश सचिव रविकांत यांना दिले.कारखान्यांवर कारवाई कराअन्न नागरी पुरवठा मंत्रालयाचे सचिव रविकांत यांची भेट घेऊन वस्तुस्थितीची माहिती दिली असून, याप्रश्नी तत्काळ चौकशी केली जाईल. जे कमी दरामध्ये साखर विकलेले आढळून येतील, त्यांचा साखर विक्रीचा कोटा त्वरित रद्द करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.त्यामुळे ज्या साखर कारखान्यांनी कमी दरामध्ये साखर विकली आहे, त्याचे पुरावे देणार असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने